जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात नीचांकी पातळीवर कोरोना रुग्ण

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनीधी)

राज्यात कोरोनाचा कहर आता अलीकडील काळात हि वाढ आता कमी अधिक वेग घेताना दिसत येत सरकारने आता पुन्हा एकदा दुकांचाही वेळ वाढवून ती रात्री दहा वाजेपर्यंत केली असून कोपरगावातून आज आलेल्या अहवालात ५४४ रॅपिड टेक्स्ट करण्यात आल्या असून त्यात ०१ रुग्ण बाधित आढळले असून ५४३ निरंक आढळले आहे.तर नगर येथे ४३८ स्राव तपासणीसाठी पाठवले असून आर.टी.पी.सी.आर.तपासणीत ०५ तर अँटीजन तपासणीत ०१ खाजगी प्रयोग शाळा तपासणीत ०४ असे एकूण अहवालात बरीच वाढ होऊन एकूण १० रुग्ण अनेक महिन्यात किमान पातळीवर पहिल्यांदा बाधित आढळले आहे.तर २९ जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे तर आज कोपरगाव शहर व तालुक्यात एकाचाही मृत्यू नोंदवला गेला नाही.

कोपरगाव तालुक्यात आज एक अखेर १३ हजार ४८८ बाधित रुग्ण आढ आढळले असून त्यातील १४४ रुग्ण सक्रिय आहे.तर आज पर्यंत २१३ जणांचा बळी गेला आहे.त्याचे प्रमाण टक्केवारीत १.५८ टक्के आहे.तर आज अखेर एकूण ०१ लाख ४५ हजार ०१४ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.त्याची दर दहा लाखाला आकडेवारी ०५ लाख ८० हजार ०५६ इतकी आहे.त्याचा बाधित दर हा ०९.३० टक्के आहे.तर आज अखेर उपचारानंतर १३ हजार १३१ रुग्ण बरे झाले आहे.त्यांचा आकडेवारीत दर ९७.३५ टक्के असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०३ लाख ०० हजार १९१ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ०५ हजार ३६० झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०२ लाख ८८ हजार ४४८ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०६ हजार ३८२ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.दरम्यान आता नागरिक मुक्तपणे फिरण्याचा आनंद घेताना दिसत असून बरेच जण कोरोनाची साथ गायब झाल्याच्या अविर्भावात वावरताना दिसत आहे.कोरोनाचा वर्तमानात डेल्टा प्लस हा विषाणू पुन्हा उचल खाण्याच्या तयारीत राज्यात आणि देशात कोरोना पुन्हा उचल खाण्याच्या तयारीत आहे.त्यातून त्या बाबत केंद्र सरकारने राज्यांना दक्षतेचा इशारा दिला असून राज्याने आता पुन्हा एकदा निर्बंध उठवले आहे.दुकाने पुन्हा रात्री दहा पर्यंत सुरु ठेवण्यास प्रारंभ केला आहे.कोरोना रुग्ण काही अंशी पुन्हा वाढु लागले आहे.त्यामुळे काळजी घेणे गरजेचे बनले आहे.तर काही भागात तरुण आपले वाढदिवस भर रस्त्यात करून कोरोना साथीला निमंत्रण देताना दिसत आहे.तर राजकीय नेत्यांनी कथनी करणीला अंतर देत आगामी नगरपरिषद व जिल्हा परिषद,पंचायत समीतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध समारंभ समारंभ सुरु केल्याने चिंता वाढली असून त्यातून रुग्ण वाढण्याचा क्रम वाढला आहे.त्यामूळे आता नगरपरिषद व शहर पोलिसांनी आता कडक धोरण अवलंबण्याची गरज निर्माण झाली असून कोरोना मृत्यूदारात वाढ झाली आहे हि चिंतेची बाब आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close