जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावच्या रुग्णवाढीने प्रशासन हैराण

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर व तालुक्यात शहरातील अनेक मान्यवरांना कोरोनाने गाठले असताना आज कोपरगाव तालुक्यात एकूण २१२ अँटीजन रॅपिड टेस्ट करण्यात आल्या असून त्यात ०६ रुग्ण बाधित तर नगर येथे तपासणीसाठी अन्य ५० स्राव पाठवले आहे तर येथुन आलेल्या अहवालात ०१ स्राव बाधित आले आहे.तर बाधित संख्येत खाजगी प्रयोग शाळेतील ०७ रुग्ण आढळले आहे असे एकूण १४ जण बाधित आले आहे.तर आधी भरती असलेल्या १४ रुग्णांस उपचारानंतर सोडून दिले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी कृष्णा फुलसौन्दर यांनी दिली आहे.शहरात आज विक्रमी चौदा रुग्ण आढल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा ६१ हजार ७५५ जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत ९२१ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील गत काही दिवसातील रुग्ण धरून ३८ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत काळात ग्रामीण भागात अधिक प्रमाणावर रुग्ण वाढ होत आहे.त्यामुळे आ.काळे यांनी उपाय योजनांसाठी नुकतीच तातडीची बैठक बोलावली होती.आता हीच स्थिती राहिल्यास प्रशासन टाळेबंदीचा विचार करू शकते.

दरम्यान कोपरगाव शहरात आज १२ रुग्ण आढळले आहे.त्यात सप्तश्रि मळा दोन पुरुष वय-७८,६७,गिरमे चाळ एक पुरुष वय-६०,लक्ष्मीनगर दोन पुरुष वय-३८,३८,कोपरगाव एक पुरुष वय-३१,श्रद्धा पॅराडाईज दोन पुरुष वय-३४,०३,एक महिला वय-३०,गोकुळनगरी एक पुरुष वय-२७,विवेकानंदनगर पुरुष वय-६२,टिळकनगर एक महिला वय-२४ आदींचा समावेश आहे.

तर ग्रामीण भागात ०२ रुग्ण बाधित आढळले आहे त्यात सुरेगाव येथील पुरुष रुग्ण वय-३४,तर जेऊर पाटोदा एक महिला वय-४५,आदीं रुग्ण बाधित आढळले आहे.त्यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान आज कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ०२ हजार ३५३ इतकी झाली आहे.त्यात ८१ रुग्ण सक्रिय आहेत,तर आज पर्यंत ३८ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.६१ टक्के आहे.आतापर्यंत १५ हजार ८०० जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला ६३ हजार २०० इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर १४.८९ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या ०२ हजार २३४ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ९४.९४ टक्के झाला आहे.दरम्यान आज शहरी भागात मोठी रुग्ण वाढ होण्याबरोबरच ग्रामीण भागात मात्र आज रुग्ण संख्या झपाट्याने कमी झाल्याचे दिसत आहे.तरी मात्र नागरिकांनी आगामी काळात प्रतिबंधात्मक उपायाबाबत अजून दक्षता घेतल्यास पूर्ण रुग्ण वाढ रोखता येईल असा विश्वास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी शेवटी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close