जाहिरात-9423439946
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर व तालुक्यात गत तीन दिवसात शहरातील अनेक मान्यवरांना कोरोनाने गाठला असताना आज कोपरगाव तालुक्यात एकूण २१४ अँटीजन रॅपिड टेस्ट करण्यात आल्या असून त्यात २५ बाधित आढळले आहे.तर ३१ संशयित रुग्णांना उपचारानंतर घरी सोडून दिले आहे. तर खाजगी प्रयोग शाळेतील ०४ तर नगर येथील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवलेल्या अहवालात ०२ बाधित असून आज एकूण बाधित ३३ रुग्ण आढळले असल्याची माहिती दिली असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी कृष्णा फुलसौन्दर यांनी दिली आहे.दरम्यान आज आढळलेली रुग्ण वाढ आज पर्यंत मोठी असून ग्रामीण भागात १५ तर शहरी भागात १९ रुग्ण वाढले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.दरम्यान वाणी सोसायटीत एका इसमाचा (वय-७२) मृत्यू झाला आहे.
नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा ३८ हजार ९६२ जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत ६४० जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील गत तीन दिवसातील तीन रुग्ण धरून २९ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत दोन दिवसात तीन बळी गेल्याने त्यामुळे अधिकची चिंता वाढली आहे.
आज आलेल्या यादीत शहरात १४ बाधित रुग्णांची संख्या तर ग्रामीण भागात १७ असे ३१ रुग्ण बाधित निघाले आहे तरी एकूण रुग्ण संख्या पाहता नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
आज कोपरगाव ग्रामीण भागात आढळलेल्या बाधित रुग्णांची यादी पुढील प्रमाणे कोपरगाव बेट पुरुष वय-५२,शिवाजी रोड तीन पुरुष वय-१५,३०,२०,एक महिला वय-२०,लक्ष्मीनगर चार महिला वय-२६,३४,६६,२९ तर तीन महिला वय-५०,७०,७०,सह्याद्री कॉलनी पुरुष वय-६८,टिळकनगर पुरुष वय-६० आदींचा समावेश आहे.
तर शहरी भागातील बाधित रुग्ण पुढील प्रमाणे संजीवनी कारखाना एक महिला वय-५५,कोळपेवाडी एक पुरुष वय ४२,जेऊर पाटोदा एक महिला वय-४७, शिंगणापूर दोन पुरुष वय-५५,३२,शहाजापूर चार पुरुष वय-६७,१३,११,१५, तर दोन महिला वय-४०,३४,साखरवाडी एक पुरुष वय-४२,संवत्सर एक पुरुष वय-६३,तर सुरेगावात एक रुग्ण आहे मात्र तो पुरुष की महिला याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून खुलासा झाला नाही.
दरम्यान आज कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ०१ हजार ७३४ इतकी झाली आहे.त्यात १६० रुग्ण सक्रिय आहेत,तर आज पर्यंत ३१ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.७८ टक्के आहे.आतापर्यंत ०७ हजार ७९५ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला ३१ हजार १८० इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर २२.४३ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या १५४२ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ८८.७७ टक्के झाला आहे.दरम्यान ग्रामीण भागातील मोठ्या बाधित आकडेवारीमुळे नागरिकांत पुन्हा एकदा भीती निर्माण झाली असली तरी मात्र नागरिकांनी आगामी काळात प्रतिबंधात्मक उपायाबाबत अजून दक्षता घेतल्यास रुग्ण वाढ रोखता येईल असा विश्वास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी शेवटी म्हटले आहे.