पर्यटन व तीर्थक्षेत्र
श्री साई पदयात्रींनी शिर्डीत न येण्याचे संस्थानचे आवाहन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
देशातील व राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाच्या कोवीड-१९ संदर्भातील नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार दि.०५ एप्रिल २०२१ रोजीपासून पुढील आदेशापर्यंत श्री साईबाबा समाधी मंदिर दर्शनाकरीता बंद ठेवण्यात आले असून कोरोना विषाणू (कोव्हीड १९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिनांक २२ जुलै ते २४ जुलै २०२१ या कालावधीत येत असलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त पालखी घेऊन पदयात्रींनी शिर्डी येथे येण्याचे टाळावे असे आवाहन संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
“कोरोना विषाणूच्या संकटामुळे समाधी मंदिर बंद ठेवण्यात आल्यामुळे यापुर्वी पारपडलेले सर्व उत्सव अतिशय साध्या पध्दतीने साजरे करण्यात आलेले असून संस्थानच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सर्व पदयात्रींनी सहकार्य केलेले आहे तथापि दि.२२ जुलै ते २४ जुलै २०२१ रोजी श्री गुरुपौर्णिमा उत्सव येत असून या कालावधीत पदयात्री साईभक्तांनी कोरोना विषाणू (कोव्हीड-१९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालखी घेऊन शिर्डी येथे येऊ नये”-कान्हूराज बगाटे,मुख्य कार्यकारी अधिकारी,साईबाबा संस्थान शिर्डी.
सदर प्रसिद्धी पत्रकात पुढे बोलताना बगाटे म्हणाले,”श्री क्षेत्र शिर्डी हे देशातील नामांकित देवस्थान असून श्री साईबाबांच्या समाधीच्या दर्शनाकरीता देशाच्या व जगाच्या कानाकोप-यातुन भक्त दर्शनाकरीता शिर्डी येथे येत असतात.तसेच श्री साईबाबा संस्थानच्या वतीने दरवर्षी श्रीरामनवमी,श्री गुरुपौर्णिमा, श्रीपुण्यतिथी आदी प्रमुख उत्सवांचे आयोजन करण्यात येते.पालखीसह येणारे पदयात्री या उत्सवांचे प्रमुख्य वैशिष्टये असते.त्यामुळे राज्यासह देशाच्या कानाकोप-यातुन पालखीसह येणारे पदयात्रींची संख्या ही मोठयाप्रमाणात असते.त्यामुळे मंदिर व मंदिर परिसरात मोठी वर्दळ होत असते.
गेल्या वर्षी जगभरात व देशात आलेल्या कोरोना विषाणूच्या संकटामुळे दि १७ मार्च २०२० रोजी श्रीं चे समाधी मंदिर बंद करण्यात आले होते.त्यानंतर दि.१४ नोव्हेंबर २०२० रोजीच्या शासन आदेशान्वये दि.१६ नोव्हेंबर २०२० पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी काही अटी-शर्तींवर खुले करण्यात आले होते.परंतु सध्या पुन्हा राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने नवीन मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत. यामध्ये धार्मिक स्थळे,सामाजिक ठिकाणे आदि ठिकाणी गर्दी होवू नये अथवा करु नये,असे निर्देश देण्यात आलेले आहे.याच पार्श्वभूमीवर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने दि.०५ एप्रिल २०२१ रोजीपासुन श्री साईबाबा समाधी मंदिर दर्शनाकरीता साईभक्तांना बंद ठेण्यात आलेले आहे. या दरम्यान समाधी मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम सुरु ठेवण्यात आलेले आहेत.
कोरोना विषाणूच्या संकटामुळे समाधी मंदिर बंद ठेवण्यात आल्यामुळे यापुर्वी पारपडलेले सर्व उत्सव अतिशय साध्या पध्दतीने साजरे करण्यात आलेले असून संस्थानच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सर्व पदयात्रींनी सहकार्य केलेले असल्याचे सांगुन त्याचप्रमाणे दि.२२ जुलै ते २४ जुलै २०२१ रोजी श्रीगुरुपौर्णिमा उत्सव येत असून याकालावधीत पदयात्री साईभक्तांनी कोरोना विषाणू (कोव्हीड-१९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालखी घेऊन शिर्डी येथे येऊ नये व संस्थानला सहकार्य करावे असे आवाहन बगाटे यांनी शेवटी केले आहे.