जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगाव,जवळके परिसरात सर्वाधिक रुग्ण,पोलिसांनीं केली बेशिस्त नागरिकांवर कारवाई

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनीधी)

राज्यात कोरोनाचा कहर आता अलीकडील काळात अधिक वेग घेताना दिसत येत सरकारने आता पुन्हा एकदा दुकांनाचाही वेळ वाढवून ती रात्री दहा वाजेपर्यंत केली असून कोपरगावातून आज आलेल्या अहवालात ५२६ रॅपिड टेक्स्ट करण्यात आल्या असून त्यात १४ रुग्ण बाधित आढळले असून ५१२ निरंक आढळले आहे.तर नगर येथे ४९२ स्राव तपासणीसाठी पाठवले असून आर.टी.पी.सी.आर.तपासणीत ०५ तर अँटीजन तपासणीत १४ खाजगी प्रयोग शाळा तपासणीत ०५ असे एकूण अहवालात बरीच वाढ होऊन एकूण २४ रुग्ण या मोठ्या विश्रांतीनंतर पहिल्यांदा बाधित आढळले आहे.तर २२ जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे तर आज कोपरगाव शहर व तालुक्यात एकाचाही मृत्यू नोंदवला गेला नाही.तथापि कोरोना रुग्णांत नैऋत्येकडील गावात मोठी रुग्णवाढ झाली असून त्यात कोपरगाव शहर-सर्वाधिक-०८,त्या खालोखाल जवळके येथील रुग्ण सर्वाधिक ०५,बहादपूर-०३,रांजणगाव देशमुख-०२,अंजनापूर,पढेगाव,चास नळी,दहिगाव बोलका,कोळपेवाडी,माहेगाव देशमुख प्रत्येकी-०१,रुग्णआहे हि वाढ लक्षणीयरीत्या मानली जात आहे.दरम्यान आज एकही रुग्णाचे निधन झाले नाही.

दरम्यान कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी आज मुखपट्याविना फिरणाऱ्या बेशिस्त नागरिकांना आज आपल्या दंडुक्याचा धाक दाखवून शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे.त्यावेळी एका ठिकाणी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी हजेरी लावली आहे.

कोपरगाव तालुक्यात आज एक अखेर १३ हजार ७९६ बाधित रुग्ण आढ आढळले असून त्यातील १७९ रुग्ण सक्रिय आहे.तर आज पर्यंत २१५ जणांचा बळी गेला आहे.त्याचे प्रमाण टक्केवारीत १.५६ टक्के आहे.तर आज अखेर एकूण ०१ लाख ६० हजार ५९५ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.त्याची दर दहा लाखाला आकडेवारी ०६ लाख ४१ हजार ५८० इतकी आहे.त्याचा बाधित दर हा ०८.६० टक्के आहे.तर आज अखेर उपचारानंतर १३ हजार ४०२ रुग्ण बरे झाले आहे.त्यांचा आकडेवारीत दर ९७.१४ टक्के असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

दरम्यान नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०३ लाख १० हजार ७१४ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ०४ हजार ९२८ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०२ लाख ९९ हजार २२७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०६ हजार ५५८ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.दरम्यान आता नागरिक मुक्तपणे फिरण्याचा आनंद घेताना दिसत असून बरेच जण कोरोनाची साथ गायब झाल्याच्या अविर्भावात वावरताना दिसत आहे.लग्न,दहावे,तेरावे,सुपारी आदी कार्यक्रम जोरात सुरु असल्याने कोरोनाचा विषाणू पुन्हा उचल खाण्याच्या तयारीत तालुक्यासह राज्यात आणि देशात कोरोना पुन्हा उचल खाण्याच्या तयारीत आहे.त्यातून त्या बाबत केंद्र सरकारने राज्यांना दक्षतेचा इशारा दिला आहे.दुकाने पुन्हा रात्री दहा पर्यंत सुरु ठेवण्यास प्रारंभ केला आहे.त्यामुळे कोरोना रुग्ण बऱ्याच अंशी पुन्हा वाढु लागले आहेत. कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव,जवळके,बहादरपूर,अंजनापूर,रांजणगाव देशमुख आदी ठिकाणी रुग्ण लक्षणीयरित्या ०८ रुग्ण वाढले आहे हि चिंतेची बाब आहे.याबाबत प्रशासनाला तातडीने पावले उचलावी लागणार आहेत.त्या दृष्टीने आरोग्य विभागाने हालचाली सुरु केल्या असून घरोघरी तपासणी मोहीम राबविण्यास प्रारंभ केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close