जाहिरात-9423439946
दळणवळण

कार्यकर्त्यांची संघटित शक्ती हीच आपली ताकद-…या नेत्याचा इशारा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची संघटित शक्ती हीच आपली ताकद असल्याचे प्रतिपादन कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनीही एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“गवारेनगर येथे घडलेला कार्यक्रम निंदनीय असून तो किरकोळ असल्याची बतावणी केली असून विरोधक काही उद्देश ठेवून आले होते म्हणून ते वाद झाले असल्याचा युक्तिवाद केला व “आपण मुद्दामहून कोणाच्या वाटेला जात नाही पण कोणी आडवा आला तर त्याला सोडाणार नाही”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.

कोपरगाव शहरातील सुमारे ०५ कोटी २० लाख रुपयांच्या हद्दवाढ झालेल्या भागात गवारेनगर तारांगण शॉप ते यमुना बिल्डिंग ते सिनगर बिल्डिंग ते साई यमुना बिल्डिंग कॉर्नर ते रॉयल ड्रीम सिटी रस्ता डांबरीकरण करणे,द्वारकानगरी काका कोयटे घरासमोरील सुतार लोहार समाज मंगल कार्यालय ते शंकरनगर मध्ये लोहार सर घर रस्ता डांबरीकरण करणे व शंकरनगर व द्वारकानगरी यांना जोडणारा पूल बनवणे आदी कामांचे भूमिपूजन सायंकाळी सहा नंतर पार पडले आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले हे होते.

सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे माजी गटनेते विरेंन बोरावके,मंदार पहाडे,राजेंद्र वाघचौरे,कर्मवीर काळे कारखान्याचे संचालक आनंद चव्हाण,फकीर कुरेशी,मुख्याधिकारी शांताराम गोसावी आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित नागरिकांनी आ.काळे यांचा शाल,श्रीफळ,पुष्पहार अर्पण केला आहे.सदर प्रसंगी अक्षय अहिरे यांने कोल्हे भाजप गटात जाऊन थेट घोषणा दिल्या त्यांचे गंगुले यांनी कौतुक केले आहे.विवेक कोल्हे यांचे नाव न घेता तुम्हाला आ.आशुतोष काळे होता येणार नाही.आ.काळे यांनी घटनास्थळी दोन तास थांबून उपस्थित कार्यकर्त्याना पाठिंबा दिला नाही तर परिस्थितीचा सामना केल्याबद्दल गंगूले यांनी कौतुक केले आहे.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”कोपरगाव शहर आणि तालुक्यातील विविध प्रलंबित विकास कामांची उदघाटन आपण विधानसभा निवडणुकीनंतर केली आहे.गवारेनगर येथे घडलेला कार्यक्रम निंदनीय असून तो किरकोळ असल्याची बतावणी केली असून विरोधक काही उद्देश ठेवून आले होते म्हणून ते वाद झाले असल्याचा युक्तिवाद केला व “आपण मुद्दामहून कोणाच्या वाटेला जात नाही पण कोणी आडवा आला तर त्याला सोडायचा नाही” असा इशारा दिला आहे.न केलेल्या कामांचे स्रेय घेण्याचा इतिहास त्यांचा ३५-४० वर्षांपासून सुरू आहे.आत्ताही तेच चालू आहे.आता पर्यंत कामे का झाली नाही आत्ताच का होत आहे.कार्यकर्त्यांचा जोश पाहून त्यांना काढता पाय घ्यावा लागला असल्याचा दावा केला आहे.

सदर प्रसंगी प्रास्तविक विरेंन बोरावके यांनी केले तर उपस्थितांना मार्गदर्शन माजी नगरसेवक मंदार पहाडे,शहराध्यक्ष सुनील गंगूले,आदींनी केले आहे.तर सूत्रसंचालन माजी नगरसेवक रमेश गवळी यांनी तर उपस्थितांचे आभार संदीप कपिले यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close