जाहिरात-9423439946
निवडणूक

कोपरगाव बाजार समितीचे…इतके अर्ज दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील राजकीयदृष्टया महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या कोपरंगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आज नामनिर्देशन पत्र भरण्याच्या अखेरच्या दिवशी सहकारी संस्था सर्वसाधारण मधून-४४,सहकारी संस्था महिला विभागातून मधून-०९,सहकारी संस्था इतर मागास वर्ग मधून-०८,सहकारी संस्था भटक्या व विमुक्त जमाती मधून- ०३,ग्रामपंचायत सर्वसाधारण मधून-१६,ग्रामपंचायत अनुसूचित जाती-जमाती मधून-०३,ग्रामपंचायत दुर्बल घटक मधून-०४,व्यापारी आडते मतदार संघातून-१७,हमाल-मापारी मतदार मधून-०७ असे एकूण-१११ जणांनी आपले नामनिर्देशन दाखल केले आहे.त्यामुळे आता हि निवडणूक बिनविरोध होणार,तिरंगी होणार,बहुरंगी होणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.

गत बाजार समिती निवडणूक हि सन-२०१५-१६ ते सन-२०२०-२१ या कालावधीसाठी झाली होती.त्या निवडणूकीच्यावेळी १५ जागा पैकी आ.काळे गट व माजी आ.कोल्हे गटास प्रत्येकी-०६ जागा परजणे गटास-०२ जागा तर शिवसेना (नितीन औताडे) गटास-०१ (मागासवर्गीय) जागा बिनविरोध देण्यात आल्या होत्या.तर सन-२०२० साली कोरोना साथीचे देशभरात आगमन झाल्याने व मोठी मनुष्यहाणी झाल्याने सदर निवडणुका या लांबणीवर टाकल्या होत्या व मुदत संपल्याने दि.१५ सप्टेंबर २०२१ रोजी कोपरगाव बाजार समितीवर प्रशासक राज येऊन त्यावर कोपरगाव येथील सहकार विभागाचे सहाय्यक निबंधक नामदेव ठोंबळ हे कार्यरत झाले होते.

दरम्यान अ.नगर जिल्ह्यातील १४ बाजार समितीच्या निवडणुकीचा निडणुकांचा शिमगा पाडवा झाल्यानंतर नवीन वर्षात पेटला असून निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून आठवडा उलटला आहे.जिल्ह्यात दोन टप्प्यात बाजार समित्यांचा निवडणूका होत आहेत.कोविडच्या दोन लाटा आणि त्यानंतर अतिवृष्टी यामुळे या बाजार समित्यांच्या निवडणूका दोन वर्ष रखडल्या होत्या.दुसरीकडे जिल्हा परिषद,पंचायत समिती आणि नगर पालिका,नगर परिषदाच्या निवडणूक पुढील अनिश्चित काळासाठी पुढे ढकल्या गेल्या आहेत.यामुळे कोपरगाव राहात्यासह सर्व तालुक्यात राजकीय पक्षांनी आता आपले लक्ष बाजार समितीच्या निवडणुकीवर केंद्रीत केलेले आहे.यामुळे या सन-२०२३-२०२८ या कालावधीसाठी निवडणुकीतील चुरस वाढली आहे.यात पारंपरिक आ.आशुतोष काळे सह माजी आ.स्नेहलता कोल्हे गट व महानंदचे अध्यक्ष राजेश परजणे हे पारंपरिक तीन गट आमने-सामने राहतात की मागील वेळे प्रमाणे बिनविरोध लढणार हे लवकरच कळणार आहे.आज नामनिर्देशन भरण्याचा अखेरचा दिवस होता.त्यात हे चित्र स्पष्ट झाले आहे.

दरम्यान आगामी ०५ एप्रिल-अर्जांची होणार छाननी,६ एप्रिल-अर्ज मागे घेण्यास सुरुवात,२० एप्रिल-अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.तर २१ एप्रिल-अंतिम यादी प्रसिद्ध व निशाणी वाटप होणार आहे.तर ३० एप्रिल रोजी मतदान सकाळी ०८ ते दुपारी ०४ वाजे पर्यंत संपन्न होत आहे.त्यानंतर तीन दिवसांच्या आत मतमोजणी स्थळ नंतर घोषित करण्यात येणार आहे.आता तालुक्यातील शेतकऱ्यांचे आगामी छाननी कडे लक्ष लागून राहिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close