जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कृषी विभाग

…या कारखान्याची पहिली उचल जाहीर !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी )

राज्यातील २०२४-२५ चा गळीत हंगाम सुरु होवून जवळपास एक महिन्याचा कालावधी पूर्ण होत आहे.मात्र अहिल्यानगर जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकाही साखर कारखान्याकडून ऊस दराबाबत निर्णय घेतलेला नाही.परंतु कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने सन – २०२४-२५ च्या गळीतास येणाऱ्या ऊसाला पहिली उचल प्र.मे.टन २हजार ८०० रुपये देण्याचे जाहीर करून गाळप झालेल्या ऊसाचे पंधरवाडानिहाय देयके ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले असल्याची माहिती कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील नुकतीच कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना व धावरवाडी (ता.कराड) येथील जयवंत शुगर्सने २०२४-२५ या ऊस गाळप हंगामासाठी येणार्‍या उसाला प्रतिटन ३२०० रुपयांची पहिली उचल जाहीर केली आहे.तर वारणा सहकारी साखर कारखान्यांचे पहिली उचल ३२२० रुपये जाहीर केली आहे.

   राज्यातील सहकारी साखर कारखान्याचा १८१ गळीत हंगाम सुरू होऊन महिना उलटला आहे.मात्र अद्याप बरेच सहकारी साखर कारखाने आपली पहिली उचल जाहीर करण्यास राजी दिसत नाही त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात स्वाभिमानी,बळीराजा व रयत शेतकरी संघटना ऊस दरासाठी आक्रमक झाले आहे.नुकतीच कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना व धावरवाडी (ता.कराड) येथील जयवंत शुगर्सने २०२४-२५ या ऊस गाळप हंगामासाठी येणार्‍या उसाला प्रतिटन ३२०० रुपयांची पहिली उचल जाहीर केली आहे.तर वारणा सहकारी साखर कारखान्यांचे पहिली उचल ३२२० रुपये जाहीर केली आहे.

“साखरेचा किमान विक्री दर रु.३,६०० प्रतीं क्विंटल करावा अशी मागणी केंद्र सरकारकडे केलेली आहे.परंतु २०२४-२५ चा गळीत हंगाम सुरु होवून जवळपास एक महिन्याचा कालावधी पूर्ण होत असतांना अद्यापपर्यंत ग्राहक व्यवहार,अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने त्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही”-आ.आशुतोष काळे,अध्यक्ष कर्मवीर काळे सहकारी साखर कारखाना.

त्यामुळे नगर जिल्ह्यातील सहकार साखर कारखाने काय दर देणार याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून होते.त्यात प्रथम शंकर राव काळे सहकारी साखर कारखान्याचे वाचा फोडली आहे.त्या कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी आपली  पहिली उचल काय देणार याबाबत वाचा फोडली आहे.

  त्यांनी आपल्या प्रसिध्दी पात्रकात म्हंटले आहे की,”साखरेचा किमान विक्री दर रु.३,६०० प्रतीं क्विंटल करावा अशी मागणी केंद्र सरकारकडे केलेली आहे.परंतु २०२४-२५ चा गळीत हंगाम सुरु होवून जवळपास एक महिन्याचा कालावधी पूर्ण होत असतांना अद्यापपर्यंत ग्राहक व्यवहार,अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने त्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही.साखरेचे दर हे २०० ते ३०० रुपयांनी कमी झाले आहेत.त्यामुळे साखर उद्योगाला अवघड परिस्थितीचा सामना करावा लागत असून साखर कारखान्यांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे.

    चालू गळीत हंगाम हा मागील गळीत हंगामापेक्षा कमी दिवसांचा व कमी ऊस गाळपाचा राहणार आहे.अशा प्रतिकूल परिस्थितीत कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने ऊस दराबाबत धाडसी निर्णय घेवून पहिली उचल प्र.मे.टन ०२ हजार ८०० रुपये देण्याचा जिल्ह्यात सर्वप्रथम निर्णय घेवून प्रत्यक्षात अंमलबजावणी देखील केली आहे.कारखान्याने गळीत हंगाम सुरु झाल्यापासून १५ डिसेंबर अखेर १,३८,४२१ मे.टन ऊसाचे गाळप करून १,२०,३२५ साखर पोती उत्पादन केले असून साखर उतारा १०.४१ एवढा मिळाला आहे.

   चालू वर्षी पर्जन्यमान समाधानकारक झालेले असून सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत व उन्हाळ्यात गोदावरी कालव्यांना समाधानकारक आवर्तन मिळणार आहेत.त्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील सभासदांनी जास्तीत जास्त ऊस लागवडी कराव्यात.जेणेकरून कारखाना कार्यक्षेत्राबाहेरील ऊसावरचे अवलंबित्व कमी होवून ऊस वाहतूक खर्चात बचत होण्यास मदत होईल व त्याचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस दरामध्ये होवू शकतो.त्यासाठी जास्तीत जास्त ऊस लागवडी कराव्या असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close