जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

दारू पाजण्याचा कारणावरून एकास मारहाण,कोपरगावात चार जणांवर गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील दत्तनगर येथील रहिवासी असलेल्या तरुणास दारू पाजण्याच्या कारणावरून आरोपी गणेश शांताराम पावले रा.ब्रिजलाल नगर व अन्य तीन अनोळखी तरुणांनी दि.०८ ऑगष्ट रोजी सायंकाळी ०६.३० वाजेच्या सुमारास हॉटेल अशोका समोर शिवीगाळ करून त्यातील प्रमुख आरोपीने काही तरी धारदार हत्याराने डोक्यावर व पाठीवर हाणमार करून गंभीर दुखापत केल्याची फिर्याद सागर नाना गवळी (वय-२८) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.त्यामुळे या मित्रांना गटारी अमावस्या चांगलीच भोवल्याचे दिसून आले आहे.

गटारीच्या दिवशी लोक मोठ्या प्रमाण मद्यप्राशन देखील करतात हि बाब कोणापासूनही लपून राहिलेली नाही.यंदा गटारी अमावस्येला रविवार देखील आल्याने अनेकांची अनासाये मोठी (?) सोय झाली होती.यामुळं मांसाहार प्रेमींची गर्दी मांस,मच्छी घेण्यासाठी ठिकठिकाणी झाली होती.त्यातून काहींनी ती केवळ मद्य प्राशन करून साजरी केली तर काहींनी आपल्या मित्रमंडळींना (तो) मार्ग दाखवून त्यांनाही आपल्या (नको त्या) वाटेला लावण्याचा प्रयत्न केलेला दिसून आला आहे.अशीच घटना कोपरगाव शहरात घडली आहे.

राज्यात नुकतीच गटारी अमावस्या संपन्न झाली आहे.श्रावण महिन्याची सुरुवात होण्याच्या आधीचा दिवस म्हणजे गटारी साजरी करण्याचा दिवस.या दिवशी गटारी अमावस्या किंवा दीप अमावस्या असते.हिंदू धर्मात विशेष महत्व असलेला श्रावण महिना हा सणवार,व्रतवैकल्यांचा महिना असतो.पूजा पाठ करण्यासाठी या महिन्याला विशेष महत्व आहे.यामुळं श्रावण महिन्यात मांसाहारी खाणपान टाळलं जातं.त्यामुळे श्रावण महिना पाळणारी मांसाहारी मंडळी मास सुरु होण्यापूर्वी मांसाहारावर मस्त ताव मारतात.या निमित्ताने गटारी उत्सव साजरा करणाऱ्यांची कमी नाही.
महाराष्ट्रात प्रत्येक वर्षी गटारीचा हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.तसा तो रविवारी देखील सगळीकडे मांस,मासे खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती.प्रथा,परंपरेत लिहिलेलं नसलं तरी गटारीच्या दिवशी लोक मोठ्या प्रमाण मद्यप्राशन देखील करतात हि बाब कोणापासूनही लपून राहिलेली नाही.यंदा गटारी अमावस्येला रविवार देखील आल्याने अनेकांची अनासाये मोठी (?) सोय झाली होती.यामुळं मांसाहार प्रेमींची गर्दी मांस,मच्छी घेण्यासाठी ठिकठिकाणी झाली होती.त्यातून काहींनी ती केवळ मद्य प्राशन करून साजरी केली तर काहींनी आपल्या मित्रमंडळींना (तो) मार्ग दाखवून त्यांनाही आपल्या (नको त्या) वाटेला लावण्याचा प्रयत्न केलेला दिसून आला आहे.अशीच घटना कोपरगाव शहरात घडली असून जमलेला मित्र मंडळींचा जमावडा थेट दुसऱ्या मित्राला दारू पाजण्याच्या फंदात पडला आणि तेथेच फसला.त्यावर हि घटना थांबली नाही तर यावर थेट कोपरगाव शहरात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.यात फिर्यादी सागर पावले याने गुन्हा दाखल केला असून त्यात त्याने आरोपी गणेश शांताराम पावले व त्याच्या अन्य तीन अनोळखी मित्रांनी गटारी अमावस्याचा मुहूर्त साधून पर्वणी साधली व फिर्यादीला दारू पाजण्याचा प्रयत्न चांगलाच अंगाशी आला आहे.व हॉटेल अशोका समोर रविवारी सांयकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला असून त्याने नकार दिला असता त्यास शिवीगाळ करून प्रमुख आरोपी गणेश पावले याने अज्ञात हत्याराने मारहाण केली आहे.त्यात तो जखमी झाला आहे.त्याने खाजगी रुग्णालायत उपचार घेतल्यावर हा गुन्हा आज दाखल केला आहे.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.२५२/२०२१ भा.द.वि.कलम ३२४,३२३,५०४,५०६ प्रमाणे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला। आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.या घटनेची शहरात उलटसुलट चर्चा सुरु आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close