जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

गुणवंतांचा गौरव हि भविष्यासाठी प्रेरणा-आ.डॉ.लहामटे

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

अकोले-(प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा १० वी,१२ वी तसेच स्पर्धा परीक्षा गुणवंत विद्यार्थी गौरव हा त्यांच्या भविष्यासाठी प्रेरणा देणारा आहे.आपल्या पुढील भविष्यासाठी गौरव रूपी ऊर्जा घेवुन हे पुरस्कारार्थी तालुक्याचे व देशाचे नाव उज्ज्वल करतील असे प्रतिपादन अकोल्याचे आमदार डॉ.किरण लहामटे यांनी केले आहे.

“पत्रकार संघ दरवर्षी राज्यभरात दहावी बारावी तसेच एम.पी.एस.सी.,यू.पी.एस.सी.,इतर स्पर्धा परीक्षा मधील गुणवंतांचा सत्कार करत असतो.अकोल्यातील कार्यक्रम हा ग्रामीण आदिवासी भागातील असूनही राज्याला दिशादर्शक आहे.सर्व गरजू विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके,दप्तर,रेनकोट,छत्री यांचे वाटप करण्यात येणार आहे”-विश्वास आरोटे,सचिव,राज्य मराठी पत्रकार संघ.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभात ते बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे होते.व्यासपीठावर साईबाबा संस्थानचे विश्वस्त डॉ.जालिंदर भोर,तहसीलदार सतिष थेटे,गटशिक्षणाधिकारी जालिंदर खताळ,अमृतसागर दुध संघाचे कार्यकारी संचालक दादाभाऊ सावंत,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव अनिल रहाणे,जिल्हाध्यक्ष राजेश जाधव,प्रसिध्दी प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे,पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सुभाष डोके, अध्यक्ष अशोक उगले,मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनिल धुमाळ,सचिव तुकाराम कानवडे,सरपंच राजेंद्र गवांदे , सरपंच संतोष आंबरे,माजी सरपंच बाबासाहेब उगले,लिंगदेव ग्रामपंचायत सदस्या कल्पनाताई फापाळे या मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह,प्रशस्ती पत्र व शालेय साहित्य देवून गौरविण्यात आलेआहे.प्राचार्य दिलीप रोंगटे,मुख्याध्यापक गोपिनाथ हाडवळे,मुख्याध्यापक अशोक नेरकर यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.शाल पुष्पगुच्छ,सन्मानपत्र,सन्मानचिन्ह,विठ्ठल रुक्मिणी मूर्ती,पुणेरी पगड़ी देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

आ.लहामटे बोलताना पुढे म्हणाले की,”गुणवंतांच्या पाठीवर गौरवरुपी थाप टाकून पत्रकार संघ अतिशय महत्वाची भूमिका बजावत आहे.पत्रकार संघ सामाजिक बांधिलकी जपून आपले कार्य करत आहे पण; आपले आई,वडील, शाळा गाव,तालुका व देशाचे नाव उज्ज्वल करण्याचे काम यापुढे आपल्याला करायचे असल्याचे डॉ.लहामटे म्हणाले. १३ ते २१ या वयात मुला मुलींपुढे अनेक प्रलोभने येत असतात पण यातून तावून सुलाखून बाहेर पडला तर तो नक्कीच यशस्वी होईल.आपल्या आई वडील व शाळेचे नाव कमी होणार नाही असे कोणतेही काम करू नका असे आवाहन त्यांनी केले.

डॉ.जालिंदर भोर यांनी आषाढी एकादशी निमित्ताने पत्रकार संघाने कार्यक्रमाचे आयोजन केले त्यामूळे पंढरपूर ला न जाता अकोले हेच पंढरपूर व सर्व विद्यार्थी शिक्षक व पत्रकार संघाचे पदाधिकारी यांच्या रूपात पांडुरंग भेटीचा आनंद भेटल्याचे प्रतिपादन केले.विद्यार्थ्यांनी शिक्षकी ज्ञानाबरोबरच संस्कार व अध्यात्माचाही अंगिकार करावा असा आशावाद व्यक्त केला.

गटशिक्षणाधिकारी जालिंदर खताळ यांनी तालुका आदिवासीं असूनही शैक्षणिक गुणवत्तेत आज अव्वल स्थानी असल्याचे सांगितले.पत्रकार संघाचे कार्य प्रेरणादायी असून शिक्षण विभागास पूरक काम होत असल्याचे सांगितले.यावेळी विठुरायाच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल रहाणे यांनी केले आहे.स्वागत व पाहुण्यांचा सत्कार भाऊसाहेब वाकचौरे व अशोक उगले यांनी केले.सूत्रसंचालन कार्याध्यक्ष दत्ता जाधव,सचिन लगड यांनी तर आभार प्रविण धुमाळ यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close