गुन्हे विषयक
जवानांवर तरुणीचा अत्याचाराचा गुन्हा,आरोपी फरार

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
नाशिक जिल्ह्याच्या पूर्वेकडील तालुक्यातील रहिवासी असलेल्या तरुणीची शेजारी असलेल्या मैत्रिणीशी ओळख होती तिच्या पतीकडे वारंवार येत असलेला व लष्करात नोकरीस असलेल्या तरुणांची तिच्याशी ओळख झाली त्याचे रूपांतर प्रेमात झाले त्यातून त्याने तिला शिर्डीत व अज्ञात ठिकाणी घराचे कुलूप उघडून लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी शारीरिक अत्याचार केला असल्याचा गुन्हा वाईबोती ता.येवला येथील आरोपी तरुण मनोज बाळासाहेब पवार याचे विरुद्ध शिर्डीत दाखल झाला आहे त्यामुळे शिर्डीसह राहाता तालुक्यात खळबळ उडाली आहे.
फिर्यादी तरुणीच्या मैत्रिणीच्या घरी पतीकडे येत असलेल्या तरुणाने तरुणीस लग्नाची मागणी घातली होती.तो वारंवार लग्नाबाबत विचारात होता.आपण वारंवार होणाऱ्या मागणीचा विचार करून तो आपल्याच जातीचा असल्याने व लष्करात नोकरीस असल्याने होकार कळवला होता.प्रेमाच्या आणि लग्नाच्या आणाभाका घेतल्याने आपण त्यावर विश्वास ठेवला होता.त्यातून आळंदी येथे जाऊन लग्न करू” असे आश्वासन देऊन आपल्यावर शिर्डी व अज्ञात ठिकाणी नेऊन आरोपी मनोज पवार याने आपल्यावर अत्याचार केला असल्याचा गुन्हा शिर्डीत दाखल झाला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी तरुणी हि नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असून तिच्या घरी आई,भाऊ,असा परिवार आहे.तिचे वडीलांचे निधन झालेले आहे.ती वर्तमानात घरीच असून तिचे शेजारी एक मैत्रीण असून तिचा पती लष्करात नोकरीस आहे.तिच्या घरी तिचे येणे जाणे होते.
दरम्यान त्या मैत्रिणीच्या घरी तिच्या पतीच्या ओळखीचा लष्करात नोकरीस असलेल्या तरुण मनोज पवार याचे येणे-जाणे होते.त्यातून सदर तरुणीची त्याच्याशी ओळख झाली होती.तो सदर ठिकाणी वारंवार भेटीला येत होता.त्याचीही सदर फिर्यादी तरुणीची ओळख झाली होती.जुलै २०२२ दरम्यान तिच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले होते.त्यांनी पुढे जाऊन आपल्या भ्रमणध्वनीचे आदान-प्रदान केले होते.त्यातून व्हॉटसऍप वर संपर्क वाढला होंता.त्याने त्यातून सदर तरुणीस लग्नाची मागणी घातली होती.तो वारंवार लग्नाबाबत विचारात होता.आपण वारंवार होणाऱ्या मागणीचा विचार करून तो आपल्याच जातीचा असल्याने व लष्करात नोकरीस असल्याने होकार कळवला होता.प्रेमाच्या आणि लग्नाच्या आणाभाका घेतल्याने आपण त्यावर विश्वास ठेवला होता.तो नुकताच दि.०८ फेब्रुवारी रोजी सुट्टीवर आला होता.त्याने,”आपल्या लग्नास घरचे लोक तयार नाही” अशी बतावणी करून आपल्याला पळून जाऊन लग्न करण्याचे आमिष दाखवले व ‘आळंदी येथे जाऊन लग्न करू’ असे आश्वासन दिले होते व मनमाड रेल्वे स्थानकावर बोलावले होते.त्याने तेथे बोलावून त्याच्या ओळखीच्या योगेश आहेर नामक इसमाच्या ‘मारुती ओम्नी’ या गाडीत मला शिर्डीत आणले होते.व “येथे काही दिवस राहू व नंतर आळंदी येथे जाऊन लग्न करू” असे आश्वासन दिले होते.मात्र येथील एका हॉटेल मध्ये नेऊन त्याने बळजबरीने आपल्याशी लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले होते.त्यानंतर दुसऱ्या दिवशी तोच सहकारी तीच ओम्नी गाडी घेऊन आला व त्याने दि.०९ फेब्रुवारी २०२१ रोजी दुसऱ्या ठिकाणी रात्री ०९ वाजेच्या सुमारास घेऊन गेला मात्र त्या गाडीच्या काचा काळ्या असल्याने ते ठिकाण मला ओळखु आले नाही.त्या ठिकाणी एका घराचे कुलूप उघडून त्याने त्या ठिकाणीही चार दिवस ठेऊन त्या ठिकाणी बाहेरून जेवणाचा डबा आणून लग्नाचे आमिष दाखवून माझ्यावर शारीरिक अत्याचार केला आहे.
त्या नंतर दि.१४ फेब्रुवारी रोजी चाकण येथे त्याच्या गायत्री नामक मैत्रीणीच्या घरी घेऊन गेला होता.व घरी कागदपत्र राहिले आहे ते मी घेऊन सायंकाळ पर्यंत येतो असे सांगितले मात्र तो वारंवार फोन करूनही आला नाही.आपण दि.१५ फेब्रुवारी पर्यंत वाट पाहिली मात्र तो आला नाही.दि.१७ फेब्रुवारी रोजी आपण पून्हा एकदा फोन केला असता त्याने मला फोन करून सांगितले की,”माझे घरचे माणसे लग्नास तयार नसून मला तुझ्याशी लग्न करता येणार नाही.”मी,”परत माझ्या युनिटला चाललो आहे,”तू परत फोन करू नको”असे म्हणाल्याने आपण घरी न जात पुन्हा शिर्डीस आले असून आपल्या कल्याण येथील मैत्रिणीस बोलावून घेऊन तिच्या सहाय्याने फिर्यादी तरुणीने शिर्डी येथील पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपी तरुण मनोज पवार याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शिर्डी येथील पोलीस ठाण्यात पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.नोंद क्रं.११४/२०२३ भा.द.वि.कलम ३७६,३७६(२)(एन)३४३,३४७ अन्वये काल गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी हे करीत आहेत.