कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यात कोरोनाने महिलेचा मृत्यू,अर्धशतक ओलांडले
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या ०४ हजार १८४ इतकी आहे.तर सक्रिय रुग्णांची संख्या ४६५ असून आज पर्यंत ५१ जणांचे कोरोनाने निधन झाले आहे.त्यांचा मृत्यूचा दर हा १.२२ टक्के आहे.तर एकूण २४ हजार ०९० जणांचे श्राव तपासणी करण्यात आली आहे.त्यांचा दर दहा लाखांचा दर हा ९६ हजार ३६० असा राहिला आहे.त्या तपासणीचा बाधित दर हा १७.३७ टक्के आहे.तर उपचारानंतर बरे होणारी संख्या हि ०३ हजार ६६८ इतकी आहे. तर त्यांचा बरे होण्याचा दर ८७.६७ टक्के इतका असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी दिली आहे.आज आलेल्या आकडेवारीने काहीसा दिलासा मिळाला आहे.
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ८७ हजार ३९९ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ०५ हजार ९४६ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ८० हजार २६४ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०१ हजार १८८ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.
कोपरगाव शहर व तालुक्यात आज आलेल्या एकूण-५२ बाधित रुग्णांत पुढील रुग्णांचा समावेश आहे.
कोपरगाव शहरातील रुग्ण पुढीलप्रमाणे कोपरगाव पुरुष वय-५४,१६,४१,३२,६८,१७,७५,५०,महिला वय-७८,आयेशा कॉलनी महिला वय-३०,राम मंदिर महिला वय-३६,अंबिकानगर पुरुष वय-६१,७५,गांधीनगर महिला वय-४८,लक्ष्मीनगर पुरुष वय-२७,३०,रिद्धीसिद्धिनगर महिला वय-१५,गांधी चौक पुरुष वय-४८,कापडबाजार महिला वय-५३,इंदिरा पथ पुरुष वय-४०,गुरुद्वारा रोड पुरुष वय-६०,धारांगाव रोड पुरुष वय-४६,द्वारकांगरी पुरुष वय-१४,आदींचा समावेश आहे.
कोपरगाव तालुक्यातील बाधित रुग्ण पुढील प्रमाणे-चांदेकसारे महिला वय-२१,संजीवनी कारखाना महिला वय-३९,कोळपेवाडी पुरुष वय-३६,६१,३३,२२,५२,महिला वय-६०,संवत्सर पुरुष वय-६२,२८,कान्हेगाव पुरुष वय-२२,महिला वय-१९,वेळापूर पुरुष वय-३८,महिला वय-३५,करंजी पुरुष वय-४५,३८,महिला वय-४०,कासली पुरुष वय-१७,महिला वय-५५,बोलकी महिला वय-३०,ओगदी पुरुष वय-४५,धामोरी महिला वय-६५,सांगवी भुसार पुरुष वय-३७,ब्राम्हणगाव पुरुष वय-६५,महिला वय-४७,कोकमठाण पुरुष वय-५५,४०.महिला वय-६५,लक्ष्मीवाडी पुरुष वय-२७ आदींचा समावेश आहे.
आजपर्यंत कोरोना नीचांकी पातळीवर होता,मात्र आता या पुढील काळात सरकारने जाहीर केल्याप्रमाणे नागरिकांना लग्न,दहावे,अंत्यविधी आदी ठिकाणी गर्दीत जाण्याचे टाळावे लागणार आहे.या खेरीज बाहेर हॉटेल मध्ये जेवण गर्दीची ठिकाणी टाळावे लागणार असून गर्दीवर नियंत्रण आणण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले असल्याचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी सांगितले आहे.सरकारने तसे नुकतेच नवीन नियम जाहीर केले आहे.