जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

शिक्षकांचीच भारत घडविण्यात महत्वाची जबाबदारी – अॅड. मनोज कडू

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव(प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांच्या उद्याची होणारी प्रगती वाटचाल शाळेतील शिक्षकांवर अवलंबून असते त्यामुळे शिक्षक केवळ विद्यार्थी घडवत नसून शिक्षक विद्यार्थ्यांच्या रूपाने उद्याचा भारत घडवत असल्याचे प्रतिपादन प्रेरणा फाउंडेशन चे अध्यक्ष अॅड . मनोज कडू यांनी कोपरगावात एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

कोपरगाव शहरात प्रेरणा फाउंडेशनचे वतीने शिक्षक दिनाचा कार्यक्रम कोपरगाव येथील श्री.गो. विद्यालय येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक रमेश गवळी हे होते.
सदर प्रसंगी प्रेरणा फाउंडेशनचे सदस्य विकास किर्लोस्कर , अॅड.निलेश कातकडे , अॅड. संदीप सांगळे , दीपक जाधव, मुस्तफा शेख शाळेचे शिक्षक तूपसुंदर सर , अमृतकर सर , अतुल कोताडे. , शिरसाळे सर, काले सर , गोसावी सर , वीरकर सर , लोंडे ताई , गायकवाड ताई , वडिल ताई , जाधव ताई , कोद्रे ताई , पाटील सर , आदि शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते .
सदर कार्यक्रम प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक गवळी सर , विकास किर्लोस्कर , आदीनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.यावेळी प्रत्येक शिक्षकांना भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रम प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व सरस्वती प्रतिमा पूजनाने करण्यात आली.त्या वेळी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close