जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

साठवण तलावाबाबत १५ दिवसात म्हणणे सादर करा- उच्च न्यायालयाचे आदेश

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव(प्रतिनिधी)

कोपरगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याबाबत जिल्हा प्रशासनाने अद्यापही आपले म्हणणे सादर न केल्याने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांना आपले म्हणणे पंधरा दिवसात सादर करण्याचे आदेश दिल्याने याचिकाकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

कोपरगावच्या नागरिकांची पाण्यासाठी होत असलेली कुचंबना पाहून उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ४ व ५ नंबर साठवण तलावाचे काम कोपरगाव नगरपरिषदेने तातडीने सुरु करावे यासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक संदीप वर्पे, मंदार पहाडे,शहराध्यक्ष सुनील गंगूले यांनी आशुतोष काळे यांच्या सहकार्याने जनहित याचिका दाखल केली आहे.

कोपरगाव नगरपरिषदेने ४ व ५ क्रमांक साठवण तलावाचे काम सुरु करण्याचे लेखी आश्वासन देवूनही साठवण तलावाचे काम सुरु करण्याबाबत कोणतीही हालचाल केली नव्हती. परिणामस्वरूप कोपरगावच्या नागरिकांना उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते. पाणी टंचाई हा नित्याचाच विषय झाल्यामुळे नागरिक कोपरगाव नगरपरिषदेच्या कारभाराला कंटाळले होते. साठवण तलावाचे काम प्रलंबित असल्यामुळे आजही अनेक नागरिकांना विकत पाणी घ्यावे लागत आहे. त्यामुळे कोपरगावच्या नागरिकांची पाण्यासाठी होत असलेली कुचंबना पाहून उच्च न्यायालयात ४ व ५ नंबर साठवण तलावाचे काम कोपरगाव नगरपरिषदेने तातडीने सुरु करावे यासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक संदीप वर्पे, मंदार पहाडे,शहराध्यक्ष सुनील गंगूले यांनी आशुतोष काळे यांच्या सहकार्याने जनहित याचिका दाखल केली आहे. या जनहित याचिकेची सुनावणी नियमितपणे सुरु झाली असून सोमवार दि.२६ ऑगष्ट रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने प्रशासनाला शेवटची संधी देत जिल्हाधिकाऱ्यांना आपले म्हणणे दोन आठवड्याच्या म्हणजेच पंधरा दिवसाच्या आत सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात न्यायालयाच्या रेट्यामुळे चार व पाच नंबर साठवण तलावाचे काम नगरपरिषदेला सुरु करावे लागणार आहे. सदर जनहित याचिकेचे कामकाज अॅड. नितीन गवारे काम पाहत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close