जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राष्ट्रविकासास उपयुक्त’-डॉ.जोशी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
“जग प्रचंड वेगाने पुढे जात आहे या बदलत्या जगाबरोबर भारताला वाटचाल करायची असेल तर आपल्याला त्याच्यासोबत राहावे लागेल,तरच आपण जागतिक स्पर्धेमध्ये टिकू असे प्रतिपादन राज्याचे उच्चस्तर शिक्षा अभियानाचे मुख्य सल्लागार प्राचार्य डॉ.विजय जोशी यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“देशाच्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये काही सकारात्मक गोष्टी आहे त्या नव्या पिढीस बहुआयामी व कौशल्याभिमुख शिक्षण देणाऱ्या असून त्यापुढे काही राजकीय,सामाजिक,आर्थिक व नैसर्गिक अडथळे आहेत.मात्र त्यांना पार करण्याएवढी शक्ती आजच्या तरुणांमध्ये व भारतामध्ये नक्कीच आहे”-के.सी.मोहिते,प्राचार्य,शिरूर महाविद्यालय,जिल्हा पुणे.

पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व के.जे.सोमैया महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने,’नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०:आंतरविद्याशाखीय अध्ययन’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते ते बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे हे होते.

सदर प्रसंगी संस्थेचे सचिव एड.संजीव कुलकर्णी,विश्वस्त संदीप रोहमारे,महाराष्ट्राच्या विभिन्न महाविद्यालयातील उच्च शिक्षणातआवड असलेले अनेक मान्यवर प्राध्यापक,संशोधक व शिक्षण तज्ञ सहभागी झाले होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”भावी पिढीच्या असणाऱ्या क्षमता आणि त्यांचे भविष्य यांचा विचार करून शिक्षण क्षेत्रातील सर्वांनाच पुढे जावे लागेल.अलीकडे सामाजिक प्रसार माध्यमांच्या गैरवापरामुळे तरुण पिढीची दिशाभूल होते आहे.त्यावर जे येते तेच सत्य समजण्याची चूक ही पिढी करीत आहे.या पिढीला त्यातून वेळीच सावरण्याची गरज आहे.नवीन शैक्षणिक धोरण त्या दृष्टीने यथार्थ आहे.या शैक्षणिक धोरणामध्ये जवळपास ३०-३५ वर्षांनी अमुलाग्र परिवर्तन होते आहे ही आश्वासक बाब असून सर्वांनी त्याचे स्वागत करावयास हवे.पूर्वीची भारतीय ज्ञान-परंपरा यांचे पुनरूज्जीवन यानिमित्ताने होणार आहे.तसेच हे शैक्षणिक धोरण मानवी जीवन आणि शिक्षण यांचा समन्वय साधणारे आहे.आजच्या शिक्षण पद्धतीतील ज्या त्रुटी आहेत,त्याही यामुळे दूर होणार असून विद्यार्थी हा केंद्रबिंदू कल्पून हे धोरण तयार करण्यात आले आहे व त्याची अंमलबजावणी करणे हे आता महाराष्ट्र शासनाने सक्तीचे केल्यामुळे काही दिवसात तुमचे महाविद्यालय हे स्वतंत्र विद्यापीठात रूपांतरित होण्याची शक्यता आहे.आजच्या स्पर्धेत टिकू शकेल अशी आपल्या शिक्षणसंस्थेची व प्राध्यापकांची क्षमता आहे.

सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक संस्थेचे अध्यक्ष अशोक रोहमारे यांनी केले आहे.तर उपस्थितांना मार्गदर्शन प्राचार्य डॉ.बी.एस.यादव,प्रा.डॉ.विजय ठाणगे यांनी केले आहे.तर सूत्रसंचालन प्रा.वर्षा आहेर यांनी केले आहे.तर वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.एस.आर.पगारे यांनी उपस्थितांचे आभार मानले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close