जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

अभ्यास करून आपले भविष्य घडवा-आवाहन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   शिक्षण घेत असताना अभ्यास करून आपले भविष्य आपण घडवायचे असून त्या प्रयत्नांना परमेश्वर आपल्या यश देत असतो.कोणतीही गोष्ट प्रतिकूल घडली तरी त्याचा संकोच न करता धैर्याने त्याचा सामना करण्याचे धारिष्ट्य ठेवणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन दहिगाव बोलका येथील वीर जवान पत्नी मंगलताई वलटे यांनी उक्कडगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

   “तुम्ही या शाळेत असताना तुम्हाला पुस्तकी ज्ञान मिळेल पण जेव्हा तुम्ही समाजात जाल तेव्हा त्या सामाजिक शाळेत तुम्हाला समाजाची वर्तणूक दिसेल.त्या शाळेत द्वेष,क्लेश,स्पर्धा असल्याचे दिसेल त्यातून आपण काय निवडायचे ते आपल्यावर अवलंबून आहे”-शिवाजीराव लावरे,संस्थापक,शिवामृत महाविद्यालय,उक्कडगाव.



    कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव येथील शिवबालक व शिवअमृत महाविद्यालयात ‘विरपत्नी सन्मान सोहळा’ मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला होता त्या प्रसंगी त्या बोलत होत्या.त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक शिवाजीराव लावरे हे होते.

   सदर प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लावरे सर,दहिगाव येथील विरपत्नी मंगलताई वल्टे,जाधव सर देशमुख सर,पिंपळे सर,बागुल सर,सोनवणे मॅडम,वारकर मॅडम,होन मॅडम,गोरखा मॅडम,बागुल मॅडम,परदेशी मॅडम माळवे मॅडम, बगणर मॅडम,जाधव मॅडम आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

   त्यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,”विद्यार्थी दशेत असताना पुस्तकी ज्ञानाबरोबरच अध्यात्मिक ज्ञानाची जोड ठेवल्यास तुमचे जिवन आनंदायी होईल.आपल्याला येथे आल्यावर व सन्मान केल्यावर आपलेपणाची जाणीव झाली असल्याचे शेवटी सांगितले आहे.

   सदर प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष लावरे यांनी,”तुम्ही या शाळेत असताना तुम्हाला पुस्तकी ज्ञान मिळेल पण जेव्हा तुम्ही समाजात जाल तेव्हा त्या सामाजिक शाळेत तुम्हाला समाजाची वर्तणूक दिसेल.त्या शाळेत द्वेष,क्लेश,स्पर्धा असल्याचे दिसेल.एखाद्याच्या जीवनात आई,वडील व पती हरपल्यानंतर त्या कुटुंबाची वाताहत होते व समाज एक वेगळ्या भावनेने बघतो हे मी स्वतः अनुभवलं आहेत असे कटू अनुभव त्यांनी विषद केले आहे.

सदर प्रसंगी श्री भुजाडे यांनी शिवबालक व शिवअमृत महाविद्यालयात हा सन्मान सोहळा ठेवायचा हे लावरे सरांचे स्वप्न आज पूर्ण साक्षी ठरले असे सांगून आमचे शैक्षणिक संकुल हा श्रीमती वल्टेताई यांच्या पाठीशी कायम उभा राहील असे आश्वासन शेवटी दिले आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पगारे सर यांनी केले व आभार प्रदर्शन सोनवणे मॅडम यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close