शैक्षणिक
सायबर सुरक्षा ही काळाची गरज-प्रा.ब्राह्मणे

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
“सायबर सुरक्षा म्हणजे संगणक प्रणाली,नेटवर्क,डेटा आणि माहिती तंत्रज्ञानाचे संरक्षण करणे असून वर्तमानात सायबर सुरक्षा ही तरुण पिढीसाठी आणि विशेषत: महिलांसाठी खूपच आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रा.विपुल ब्राह्मणे यांनी कोपरगाव येथे बोलताना केले आहे.

“विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींशी बोलताना किंवा सोबत वावरताना खबरदारी घेतली पाहिजे.नियमित अभ्यासासोबत आपल्याला महिलांसंदर्भातील कायद्यांविषयी माहिती असणे देखील आवश्यक आहे.महाविद्यालयात वावरताना आपले वर्तन सभ्य असावे”-डॉ.बी.डी.गव्हाणे,गणित विभाग प्रमुख.के.जे.सोमय्या महाविद्यालय.
सायबर सुरक्षा म्हणजे डिजिटल कवच.हे सायबर जगाला हॅकर्स,व्हायरस आणि सर्व प्रकारच्या सायबर गैरप्रकारांपासून वाचवेल.आजकाल गोष्टी इतक्या प्रगती झाल्या आहेत की,तुमचे सोशल मीडिया अकाउंट्स आणि तुमचे सर्व गुप्त बँकिंग तपशील ऑनलाइन तिजोरीत साठवले जातात;त्यामुळे,हे पूर्णपणे सुरक्षित ठेवणे हा सर्व गोष्टींपेक्षा प्राधान्यक्रम मानला पाहिजे.सायबर सुरक्षा म्हणजे डेटा,नेटवर्क आणि डिव्हाइसेसना तडजोड होण्यापासून वाचवण्यासाठी डिझाइन केलेल्या पद्धती आणि तंत्रज्ञान असे म्हणता येईल.तुमची वैयक्तिक माहिती एन्क्रिप्ट करणे असो,संशयास्पद क्रियाकलापांना ध्वजांकित करणे असो किंवा मालवेअरपासून बचाव करणे असो,सायबर सुरक्षा ही डिजिटल विश्वात तुमची संरक्षण प्रणाली आहे.म्हणून जर तुम्हाला तुमचे डिजिटल जीवन कसे सुरक्षित करायचे हे शिकायचे असेल,तर सायबर सुरक्षेबद्दल शिकणे हे वेबचे तंत्रज्ञान-जाणकार बनण्याच्या दिशेने तुमचे पहिले पाऊल आहे.यामुळेच कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीच्या के.जे.सोमैया महाविद्यालयांमध्ये अंतर्गत महिला तक्रार निवारण समितीच्या विद्यमाने ‘सायबर सुरक्षा’ विषयावर नुकतेच चर्चासत्र आयोजित केले होते त्यावेळी त्या बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे गणित विभाग प्रमुख डॉ.बी.डी.गव्हाणे होते.सदर व्याख्यानसत्रात वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद तसेच बहुसंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनी स्वयंस्फूर्तीने उपस्थित होते.
यावेळी प्रा.ब्राह्मणे यांनी रॅन्समवेअर,वॉर,व्हायरस,फ्रोजन यासारख्या टर्म आणि हानिकारक सॉफ्टवेअर आदी संदर्भात महत्वपूर्ण माहिती दिली आहे.त्याचबरोबर फिशिंग,डेटा उल्लंघन,रँसमवेअर,फायरवॉल,अँटीव्हायरस सॉफ्टवेअर आदी टर्म्स संदर्भातही महत्वपूर्ण माहिती दिली आहे.
त्यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,”सायबर गुन्ह्यांमध्ये महिलांना प्राधान्याने असुरक्षितता जाणवते.परिणामी सायबर सुरक्षा वाढविण्यासाठी महिलांनी आपल्या माहितीची काळजी घेणे,त्यासाठी मजबूत पासवर्ड वापरणे आणि संशयास्पद लिंक्स किंवा ई-मेल टाळणे गरजेचे आहे.
सदर प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.गव्हाणे म्हणाले की,”विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींशी बोलताना किंवा सोबत वावरताना खबरदारी घेतली पाहिजे.नियमित अभ्यासासोबत आपल्याला महिलांसंदर्भातील कायद्यांविषयी माहिती असणे देखील आवश्यक आहे.महाविद्यालयात वावरताना आपले वर्तन सभ्य असावे.शिस्त आणि नियमांबरोबरच सभ्यता आणि संस्कार देखील तितकेच मोलाचे आहेत.
सदर कार्यक्रमाच्या प्रारंभी अंतर्गत महिला तक्रार निवारण समिती प्रमुख डॉ.सुरेखा भिंगारदिवे यांनी मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन प्रा.मयुरी आहेर यांनी तर उपस्थितांचे आभार समिती सदस्य डॉ.नीता शिंदे यांनी मानले आहे.या व्याख्यानसत्रात प्रा.वर्षा आहेर,प्रा.निकिता नन्नवरे,प्रा.नेहा घोडके आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम केले आहे.