जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात रुग्णवाढ कमीच,नागरिकांत समाधान

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर व तालुक्यात शहरातील अनेक मान्यवरांना कोरोनाने गाठले असताना आज कोपरगाव तालुक्यात एकूण ३५ अँटीजन रॅपिड टेस्ट करण्यात आल्या असून त्यात एकही रुग्ण बाधित आढळला नाही तर नगर तेथून आलेल्या अहवालात ०४ रुग्ण बाधित आढळले आहे तर खाजगी तपासणीत एकही रुग्ण बाधित आढळला नाही तर आज आलेल्या अहवालात एकूण ०४ रुग्ण बाधित आढळले आहे.मात्र आज आलेल्या अहवालात शहरातील सुभाषनगर व काले मळा येथील दोन रुग्ण बाधित आढळले तर ग्रामीण भागात माहेगाव देशमुख येथे दोन असे चार रुग्ण आढळले असल्याची माहिती दिली असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी कृष्णा फुलसौन्दर यांनी दिली आहे.

नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा ५३ हजार ७०२ जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत ८१८ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील गत तीन दिवसातील तीन रुग्ण धरून ३७ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत काळात ग्रामीण भागात अधिक प्रमाणावर रुग्ण होते आता मात्र ते कमी झाले आहे.हि समाधानाची बाब आहे.

आज आलेल्या यादीत शहरात निच्चांकी म्हणजेच दोन रुग्ण अबाधित आढळले आहे त्यात एक सुभाषनगर येथील एक ५५ वर्षीय महिला तर काले मळा येथील एक ४० वर्षिय महिला असे दोन रुग्ण बाधित आढळले आहे.तर ग्रामीण भागात दोन रुग्ण आढळले असून त्यात माहेगाव देशमुख येथील दोन पुरुष वय-५८,३१ यांचा समावेश आहे. ग्रामीण व शहरी भागातील किमान रुग्ण संख्या पाहता रुग्ण संख्या कमी झाल्याने नागरिकांत समाधान व्यक्त केले आहे.

दरम्यान आज कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ०२ हजार १००इतकी झाली आहे.त्यात २३ रुग्ण सक्रिय आहेत,तर आज पर्यंत ३७ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.७६ टक्के आहे.आतापर्यंत ११ हजार ९७४ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला ४७ हजार ८९६ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर १७.५३ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या ०२ हजार ०४० इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ९७.१४ टक्के झाला आहे.दरम्यान ग्रामीण व शहरी भागातील बाधित आकडेवारी कमी झाल्यामुळे नागरिकांत समाधान निर्माण झाले आहे. तरी मात्र नागरिकांनी आगामी काळात प्रतिबंधात्मक उपायाबाबत अजून दक्षता घेतल्यास रुग्ण वाढ रोखता येईल असा विश्वास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी शेवटी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close