गुन्हे विषयक
गुटखा खाऊन झेंडावंदन,दोन गटात हाणामारी,कोपरगावात आठ जणांवर गुन्हा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
नुकत्याच संपन्न झालेल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित झेंडा वंदन प्रसंगी,”गुटखा खाऊन झेंडा वंदन करू नका”असे उपसरपंच यांना म्हणाल्याचा राग येऊन कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार येथील आरोपी तान्हाजी गोरख जाधव,विजय पंडितराव जाधव यांचेसह आठ जणांनी आपल्याला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी संदीप बाबासाहेब क्षिरसागर (वय-३३) यांनी गुन्हा दाखल केल्याने सांगवी भुसारसह कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
सांगवी भुसार येथील ध्वजारोहन करण्यास गावचे रहिवासी संदीप क्षीरसागर हे आले असता त्यानी तेथील उपसरपंच यांना फिर्यादी यांनी हरकत घेतली व त्यांना हरकत घेताना त्यांनी,”त्यांनी गुटखा खाल्लेला असल्याने तुम्ही झेंडा वंदन करू नका” असे म्हटले होते.त्याचा राग येऊन आरोपी तान्हाजी जाधव,विजय पंडितराव जाधव,विलास कासार जाधव,किशोर बबन जाधव,हरिभाऊ शिंदे,साहेबराव जाधव,भाऊसाहेब संपत जाधव,सुनील प्रभात बंदे आदींनी फिर्यादिस काही तरी लोखंडी वस्तू,लाथा बुक्क्यांनी मारहाण करून वाईट्साईट शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो.२९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली.अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला.त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.कोपरगाव तालुक्यातही तो मोठ्या उत्साहात संपन्न झाला असताना सांगवी भुसार ग्रामपंचायतीचा अपवाद वगळता तो शांततेत संपन्न झाला आहे.
मात्र सांगवी भुसार हे गाव त्याला अपवाद झाले आहे.त्या ठिकाणी दोन गटात वाद निर्माण झाला आहे.फिर्यादी संदीप क्षीरसागर व आरोपी तान्हाजी जाधव हे एकाच गावचे रहिवासी असून त्यांच्यात किरकोळ कारणावरून वादविवाद आहेत.नेमक्या २६ जानेवारी रोजी सकाळी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण प्रसंगी सकाळी ९.१० वाजेच्या सुमारास हा वाद उफाळून आला आहे.
त्याचे झाले असे की,”सांगवी भुसार येथील ध्वजारोहन प्रसंगी गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.त्यावेळी ध्वजारोहन करण्यास गावचे रहिवासी भाऊसाहेब संपत वाघ हे आले असता त्यास संदीप क्षीरसागर यांनी हरकत घेतली व त्यांना हरकत घेताना त्यांनी,”त्यांनी गुटखा खाल्लेला असल्याने तुम्ही झेंडा वंदन करू नका” असे म्हटले होते.त्याचा राग येऊन आरोपी तान्हाजी जाधव,विजय पंडितराव जाधव,विलास कासार जाधव,किशोर बबन जाधव,हरिभाऊ शिंदे,साहेबराव जाधव,भाऊसाहेब संपत जाधव,सुनील प्रभात बंदे आदींनी फिर्यादिस काही तरी लोखंडी वस्तू,लाथा बुक्क्यांनी मारहाण करून वाईट्साईट शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
दरम्यान फिर्यादी क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलिसांनी वरील आठ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलीस अधिकाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून भेट दिली आहे.
सदर फिर्यादी हे प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष असल्याचे समजते.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रं.६१/२०२३ भा.द.वि कलम ३२४,३२३,१४३,१४७,१४८,१४९,४४७,५०४,५०६ प्रमाणे दाखल केला असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.या प्रकरणी तालुका पोलिसांनी दुजोरा दिला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.सुरेश बोटे हे करत आहेत.