जाहिरात-9423439946
आंदोलन

दिवसा पूर्ण दाबाने वीज द्या अन्यथा आंदोलन-यांचा इशारा,कोपरगावात खळबळ

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

आगामी काळात रब्बी हंगाम सुरु होत असून या कालखंडात शेतकऱ्यांना विद्युत महावितरण कंपनीने दिवसा ढवळ्या वीज पुरवठा करून शेतकऱ्यांना माणूस असल्याची जाणीव करून द्यावी अशी महत्वपूर्ण मागणी कोपरगाव तालुक्यातील शेतकरी व शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख प्रवीण शिंदे,तुषार विध्वंस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नुकतीच विद्युत कंपनीकडे केली होती मात्र सदर मागणीला वीज वितरण कंपनीने वाटाण्याच्या अक्षदा दाखवल्याने संतप्त शेतकऱ्यांनी येत्या दि.२ डिसेंबर रोजी महावितरण कंपनीच्या कोपरगाव कार्यालयासमोर एकदिवसीय आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.त्यामुळे महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

“थंडी आणि कडक उन्हाळा वाढला की,सरकारी,खाजगी कार्यालयीन कामकाजाची कामगारांना वेळ वाढवून वा कमी करन दिली जाते.मात्र शेतकऱ्यांना रात्री वीज पुरवठा करून सरकार वेठीस धरत असून त्यांना वाघ आणि बिबट्याच्या हवाली करत आहे हा कुठला न्याय आहे.शेतकऱ्यांचा कळवळा फक्त निवडणुकीपुरता व केवळ तोंडी लावण्यासाठी  सर्व पक्षीय पुढारी करताना दिसत आहे.”-पद्माकांत कुदळे,शेतकरी नेते, कोपरगाव.

शेतकरी अन्नदाता असताना त्याला शेतमालाला भाव मिळत नाहीच पण त्याला सरकार वीज पुरवठा पूर्ण दाबाने करत नाही.केवळ तोंडी लावण्यासाठी व निवडणूक काढण्यासाठी शेतकऱ्याचा वापर सर्व पक्षीय पुढारी करताना दिसत आहे.त्यामुळे शेतकऱ्यास कोणीही वाली नाही हे वारंवार सिद्ध होत आहे.पंजाब आणि हरियाणात सरकार संपूर्ण वीज मोफत देत असताना राज्यात ती विकतही धड मिळत नाही.त्यामुळे यावर्षीही यात बदल करून शेतकऱ्यांना दिवस व पूर्ण दाबाने वीज पुरवठा करावा अशी मागणी मुळीच वावगी नाही.

रब्बी हंगाम आगामी काळात सुरु होत आहे.अनेक ठिकाणी तर तो सुरु झाला आहे.शेतकऱ्यांची गत खरीप हंगामात अतिरिक्त पावसाने वाट लागली आहे.आगामी रब्बी हंगामाकडे आता त्यांचे संपूर्ण लक्ष लागले आहे.व त्यावरच त्यांची संपूर्ण मदार आहे.मात्र शेतकरी अन्नदाता असताना त्याला शेतमालाला भाव मिळत नाहीच पण त्याला सरकार वीज पुरवठा पूर्ण दाबाने करत नाही.थंडी आणि कडक उन्हाळा वाढला की,सरकारी,खाजगी कार्यालयीन कामकाजाची कामगारांना वेळ वाढवून वा कमी केली जाते.मात्र शेतकऱ्यांना मात्र रात्री वीज पुरवठा करून अन्नदात्यास सरकार वेठीस धरत असून त्यांना वाघ आणि बिबट्याच्या हवाली करत आहे हा कुठला न्याय आहे.शेतकऱ्यांचा कळवळा फक्त निवडणुकीपुरता व केवळ तोंडी लावण्यासाठी  सर्व पक्षीय पुढारी करताना दिसत आहे.त्यामुळे शेतकऱ्यास कोणीही वाली नाही हे वारंवार सिद्ध होत आहे.पंजाब आणि हरियाणात सरकार संपूर्ण वीज मोफत देत असताना राज्यात ती विकतही धड मिळत नाही.या पाबसाळ्यात जून ते ऑक्टोबर पाच महिने शेतकऱ्यांनी विजेचा वापर केलेला नाही त्यामुळे या काळातील वीजबिल माफ करणे गरजेचे आहे.यावर्षी रात्री वीज बंद करून यात  शेतकऱ्यांना दिवसभर पूर्ण दाबाने वीज पुरवठा करावा अशी मागणी मुळीच वावगी नाही.मंजूर येथील उपकेंद्राचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे,सर्व रोहित्रावर पूर्ण दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा,शेतकऱ्यांना तीन फेज पुरवठा करण्यात यावा आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत.त्या बाबत निवेदन देऊन तीस दिवसाहून अधिक काळ लोटला असूनही महावितरण कंपनीने कोणतेही उत्तर न दिल्याच्या निषेधार्थ हे एक दिवसीय उपोषण कोपरगाव महावितरण कार्यालयासमोर शुक्रवार दि.२ डिसेंबर रोजी संपन्न होत आहे.

या आंदोलसाठी प्रवीण शिंदे,अनिल शेवते,तुषार विध्वंस,संतोष गंगवाल,नितीन शिंदे,अड्.नितीन पोळ,नंदकुमार बोरावके,कैलास देवकर,विलास पांढरे,सुरेश देवकर,हेमंत गिरमे,शुभम नवले,अमित टिळेकर,गिरीधर पवार आदींनी तयारी केली असल्याची माहिती प्रावीण शिंदे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close