जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

येवल्यामूळे कोपरगावच्या नागरिकांवर जोखीम वाढली

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरंगाव शहर व तालुक्यात वर्तमानात एकही रुग्ण नाही मात्र नजीकच्या येवला शहरात व तालुक्यात मोठ्या संख्येने कोरोना बाधित रुग्ण आढळत असल्याने कोपरगाव शहर व तालुक्यातील नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे बनले आहे.त्यामुळे नागरिकांनी या पुढील काळात आणखी खबरदारी घ्यावी असे आवाहन कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी केले आहे.

राज्यात आज अखेर कोरोना बाधितांची संख्या १६ हजार ७५८ वर पोहचली आहे. या विषाणूने राज्यात ६५१ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या ५३ वर जाऊन पोहचली आहे तर दोघांचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.कोपरंगाव नजीक येवला,मालेगाव हि कोरोनाची नवी केंद्रे ठरली आहेत.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

राज्यात आज अखेर कोरोना बाधितांची संख्या १६ हजार ७५८ वर पोहचली आहे. या विषाणूने राज्यात ६५१ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या ५३ वर जाऊन पोहचली आहे तर दोघांचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.कोपरंगाव नजीक येवला,मालेगाव हि कोरोनाची नवी केंद्रे ठरली आहेत.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील टाळेबंदी तिसऱ्यांदा वाढवून १७ मे पर्यंत केली आहे.कोपरगाव तालुक्यात दोन बळी गेले आहे.नागरिकांत अद्यापही या साथीबाबत भय दिसून येत आहे.१० एप्रिल पासून अद्याप एकही रुग्ण नसल्याने कोपरगाव शहर व तालुका हरित पट्यात येण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच येवला या भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने काळजी करण्याचे कारण निर्माण झाला आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये हे आवाहन केले आहे.

त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे आहे की,शासनाच्या वेळोवेळी येणाऱ्या सूचना व स्थानिक पातळीवरील परिस्थिती नुसार कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना कोपरगांव नगरपरिषद करत आहे.मात्र येवला व कोपरगाव शहर व तालुक्यातील नागरिकांची दवाखाने औषधोपचार,व्यापार व नातेवाईक या कारणांमुळे जाणे येणे असल्याने कोपरगावची व्यक्ती येवला व येवला येथील व्यक्ती कोपरगावकरांच्या संपर्कात येवू देऊ नये.या साठी सुरक्षेचे उपाय योजनेसाठी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाने व पोलीस प्रशासन यांच्या सहाय्याने पथक तयार करून कोपरगाव शहर टाकळी नाका,येवला नाका व साईबाबा कॉर्नर या प्रवेशाच्या ठिकाणी सदर पथके येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे ओळख व राहण्याचा पत्ता तपासून त्यांना शहरात सोडत आहे.तर जे येवला येथिल नागरिक होते त्यांना परत जाण्याबाबत विनंती करत आहे.या कार्यासाठी शहरातील नागरिकांनी दखल घेवून नगरपरिषद व पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष वहाडणे व मुख्याधिकारी सरोदे यांनी शेवटी केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close