कोपरगाव तालुका
राष्ट्रवादीत भुजबळापाठोपाठ…या नेत्यांचा भ्रमनिरास उघड !

न्युजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
गत पाच वर्षात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या निधी आणि लाडकी बहिण योजनेने आपला विजय सोपा गेला आहे.विधानसभेच्या प्रचारात कार्यकर्त्यांचे कष्ट कामी आले आगामी काळात अधिकची जबाबदारी निश्चितपणे पार पाडू असा विश्वास व्यक्त करताना आपल्याला मंत्रीपद मिळाले नाही याची कबुली देऊन आगामी काळात अजित पवार ती नक्की देतील असा विश्वास आ.आशुतोष काळे यांनी व्यक्त करून मुस्लिम मतदारांनी मते दिल्याने त्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात पूजन केले आहे.

मतदार संघाचा विकास व्हावा यासाठी आ.आशुतोष काळे पुन्हा आमदार व्हावेत यासाठी भोजडे येथील सलीम शेख या कार्यकर्त्याने पायात चप्पल न घालण्याचा नवस केला होता.त्या कार्यकर्त्याचे आ.आशुतोष काळे व चैताली काळे यांनी पाय धुवून मतदार संघातील मुस्लिम मतदराबाबत कृतज्ञता व्यक्त केली असल्याचे मानले जात आहे.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आ.आशुतोष काळे यांचे आज विधानसभेच्या मोठ्या विजयानंतर नागपूर येथील हिवाळी अधिवेशन आटोपून त्यांचे पहिल्यांदाच मतदार संघात आगमन झाले.यावेळी कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आलेल्या कृतज्ञता सोहळ्यात मतदार संघातील जनतेचे आभार व्यक्त करतांना ही बाब उघड झाली आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजीआ.अशोक काळे होते.

कोपरगाव तालुक्यासाठी सर्वात महत्वाचा असलेला सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी तसेच गोदावरी,पालखेड व एक्सप्रेस कालव्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्याचे जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे याची मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
सदर प्रसंगी महानंदाचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र जाधव,ज्येष्ठ कार्यकर्ते कारभारी आगवन,पद्माकांत कुदळे,कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे उपाध्यक्ष शंकर चव्हाण, नारायण मांजरे,धरमचंद बागरेचा,एम.टी.रोहमारे,बाबासाहेब कोते,डॉ.अजय गर्जे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर,शहराध्यक्ष सुनील गंगूले,काकासाहेब जावळे,आनंदराव चव्हाण,वसंतराव दंडवते,संजय शिंदे,सोमनाथ चांदगुडे,संभाजी काळे,तहसीलदार महेश सावंत आदींसह सर्व संचालक, संलग्न संस्थांचे चेअरमन,व्हा. चेअरमन,संचालक,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीचे पदाधिकारी,माजी जिल्हा परिषद*पंचायत समिती सदस्य,माजी नगरसेवक,कारखाना व संलग्न संस्थांचे अधिकारी, कार्यकर्ते बहु संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की,”नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीला आपण सहज घेतले नाही त्यामुळे प्रचारा दरम्यान आजारी असतांना देखील प्रचाराचा जोर कमी होवू न देता केलेल्या विकासकामांवर मते मागितली.कार्यकर्त्यांनी देखील शिस्तबद्ध प्रचार करून मतदान घडवून आणले व लाडक्या बहिणींनी देखील भरभरून मतदान दिल्यामुळे ऐतिहासिक विजय मिळाला.उपमुख्यमंत्री अजित पवार कोपरगाव दौऱ्यावर आले असता त्यांनी मोठ्या मताधिक्याने निवडून द्या मोठी जबाबदारी देतो असा शब्द दिला होता.त्यामुळे मतदार संघातील जनतेला मंत्रीपदाची अपेक्षा लागली होती.परंतु निवडणुका ह्या राजकीय नेतृत्वासाठी एक प्रकारची अग्निपरीक्षा असते आणि त्यांनतर मंत्रिमंडळात सहकारी सदस्यांची निवड करणे हि त्यापेक्षा मोठी अग्निपरीक्षा असते असे सांगून सावध भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ४१ आमदार निवडून आले.राज्यात महायुतीचे सरकार आहे.भाजपाचे १३२ व सहकारी शिवसेना पक्षाचे ५७ आमदार निवडून आले आहेत.४३ पेक्षा जास्त मंत्री होवू शकत नाही.महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या वाट्याला दहा मंत्रीपद आली.४१ आमदारांमध्ये १० मंत्रीपद कसे वाटणार हा मोठा प्रश्न होता.त्यावेळी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेवून अजित पवार यांच्यापुढे मांडल्या असून त्यांनी आपण दावा केला असल्याची कबुली दिली आहे.व आगामी काळात ते तो पूर्ण करतील असा विश्वास व्यक्त केला आहे.मात्र त्यांनी माजी मंत्री छगन भुजबळ यांचे सारखे आकांडतांडव केले नाही हे विशेष !
दरम्यान निवडणुकीवेळी महायुतीचा उमेदवार या नात्याने विरोधकांकडे (कोल्हे) गेलो त्यांनी मदत केली,सहकार्य केले त्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी व लोकप्रतिनिधी या नात्याने विकासाचे प्रश्न जाणून घेण्यासाठी जाणार आहे त्यावेळी कार्यकर्त्यांनी गैरसमज करू घेवू नये अशी सावध भूमिका घेतली आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर यांनी केले तर यावेळी पद्माकांत कुदळे,नारायणराव मांजरे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले आहे.तर सूत्रसंचालन गोरक्षनाथ चव्हाण यांनी केले तर आभार कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवन यांनी मानले आहे.