जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

अवैध गोवंश कत्तल,कोपरगावात अतिक्रमण अखेर हटविले

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा


कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गोवंश हत्या कायद्याचे उल्लंघन होताना दिसत आहे.आता तर हा व्यवसाय थेट घरातून चालवला जात असल्याची गंभीर दखल अखेर नगरपरिषद व कोपरगाव शहर पोलिसांनी घेतली असून आज सकाळी ११ वाजता संजयनगर भागातील अतिक्रमण चोख पोलीस बंदोबस्तात हटविण्यास प्रारंभ झाला असून या कारवाईत सुमारे १५ अवैध गोवंश कत्तलखाने उध्वस्त करण्यात आले आहे.त्यामुळे अवैध गोवंश कत्तल करणाऱ्यांना चाप बसणार आहे.


अवैध कत्तलखान्याविरोधात अंमलबजावणी आज प्रत्यक्ष मुख्याधिकारी शांताराम गोसावी व पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या प्रमुख उपस्थितीसह सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड,पोलीस निरीक्षक रोहिदास ठोंबरे,भरत नागरे आदींसह ०५ अधिकारी व ४० ते ५० कोपरगाव शहर,तालुका पोलीस,शिर्डी पोलीस कर्मचारी असे विविध सशस्त्र पोलीस व नगरपरिषदेचे विविध विभागाचे विभागप्रमुखांसह १५ अधिकारी, व सुमारे १२५ आरोग्य तर अन्य ११० स्वच्छता विभागाचे कर्मचारी यात ३० महिला कर्मचारी आदींनी सुरू केली होती.ती तब्बल चार तासांनी पूर्ण केली आहे.त्या बद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.



राज्यात सन-२०१४ मध्ये पुन्हा भाजप-शिवसेनेचे सरकार आले आणि केंद्राकडे पडून असलेल्या कायद्याचा पाठपुरावा सुरू झाला.अखेर तब्बल १९ वर्षांनी राष्ट्रपतींनी त्या कायद्यावर मान्यतेची मोहोर उमटवली.गाय,बैल,वळू यांची कत्तल करता येणार नाही,त्या हेतूने त्यांची खरेदी,विक्री करता येणार नाही,विल्हेवाट लावता येणार नाही.असा कायदा करण्यात आला मात्र हा कायदा केवळ कागदावरच आहे.त्याचे वर्तमानात नगरपरिषद व पोलिसांच्या नाकावर टिच्चून संजयनगर,सुभाषनगर परिसरात सर्रास उल्लंघन सुरू होते.तीन वर्षांपूर्वी तर ऐन शिवरात्रीच्या दिवशी लाखो रुपयांचे गोवंश नगर येथील गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी धाड टाकून पकडून दिले होते.त्या नंतर वारंवार गोदावरी नदीत कोपरगावात होणाऱ्या गोवंशाच्या कत्तलीचा रक्ताचा महापूर येत असून त्याचा नदीकाठच्या हिंदू देवतावर रक्ताभिषेक होत आहे.मात्र शहर पोलीस व नगरपरिषद प्रशासन डोळेझाक करत असल्याचे आरोप विविध हिंदू संघटना व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी वारंवार केला होता.त्या निषेधार्थ कोपरगाव नगरपरिषदेवर कोपरगाव तालुका गोरक्षा समिती व हिंदुत्ववादी संघटनांनी दि.१२ ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाचा जोरदार निषेध केला होता.यावर निर्णय घेण्यासाठी ३१ ऑक्टोबरची अंतिम मुदत ठरवून दिली होती.मात्र तरीही मोठ्या शेडमधील कत्तल थांबली असली तरी आता या व्यवसायातील व कसाई व व्यापाऱ्यांनी आता थेट आपल्या घरातच कत्त्तलखाने बनवून त्या गोवंशाच्या रक्ताचे पाट थेट गोदावरी नदीत काढून दिले होते.त्यामुळे हे मुजोर खाटीक पोलीस आणि नगरपरिषद यांना वाकुल्या दाखवू लागल्याने नगरपरिषद व पोलिस प्रशासन संतापले होते. या पार्श्वभूमीवर नगरपरिषदही हताश झालेली दिसून आली होती अखेर संतप्त नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी या प्रकरणी शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे,शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांना एक निवेदन पाठवून याबाबत दाद मागितली होती.

दरम्यान एका माहितीनुसार कोपरगाव नगरपरिषदेने या बाबत वर्तमानपत्रात जाहिरात देऊन संबधित खाटकांना कोपरगाव शहर पोलिसांनी नगरपरिषदेस दि.२६ ऑक्टोबर रोजी संजयनगर,सुभाषनगर,आयशा कॉलनी,बैलबाजार रोड येथील अवैध कत्तल खान्याच्या बांधकामाबाबत कळवले असून त्या नुसार अवैध बांधकामे तात्काळ काढून घेण्याचे फर्मान काढले होते.व ते न काढल्यास नगरपरिषद याबाबत कायदेशीर कारवाई करील असा सक्त ताकीद मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी दिली होती. मात्र तरी त्याची दखल या मुजोर गोवंश कत्तल खाणे चालविणाऱ्या असामाजिक तत्त्वांनी घेतली नव्हती.

    यावर प्रशासन चालढकल करत असेल तर त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा इशारा अध्यक्ष वहाडणे यांनी शेवटी दिला होता.व या लढाईत आपणही उतरणार असल्याचे बजावले होते.त्याचा जो परिणाम व्हायचा तो अपेक्षित परिणाम आज समोर आला असून अखेर कोपरगाव शहर पोलिसांना नगरपरिषदेने मदतीला घेण्याचा व या अवैध कत्तलखान्यांचा बिमोड करण्याचा निर्धार केला होता.व त्याची जय्यद तयारी तीन दिवसापासून सुरू होती.त्याची अंमलबजावणी आज प्रत्यक्ष मुख्याधिकारी शांताराम गोसावी व पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी दोन जे.सी.बी.यंत्रे,४ ट्रॅक्टर,२ डंपर,०८ आपे मालवाहू रिक्षा,०२ अग्निशामक गाड्या व त्यांचे दल,पोलीस गाड्या आदींच्या मदतीने पूर्ण केली आहे.

   काही दिवसांपूर्वी या प्रकरणी कोपरगाव तालुका गोरक्षा समितीचे अमित जैन,कोपरगाव शहर शिवसेना,कोपरगाव शहर मनसे.,कोपरगाव वकील संघ,महिला संघटना आदी मिळून जवळपास ८२ संघटनांनी या विरोधात आवाज उठवला कारवाईची मागणी केली होती.गोदावरी नदीचे पावित्र्य भंग करणाऱ्या विरुद्ध कारवाईची मागणी केली होती.

   दरम्यान या प्रकरणी सराला बेटांचे महंत श्री रामगिरीजी महाराज यांनी तर “या बेताल गोवंशाची कत्तल करणाऱ्यांना भाषा समजत नसेल तर,त्यांना ज्या भाषेत समजेल त्या भाषेत उत्तर देण्याचा” इशारा दिला होता.त्यांच्या सुरात सूर श्री क्षेत्र मंजूर येथील श्री शिवानंदगिरीजी महाराज यांनीही मिळवला होता.त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य खूपच वाढले होते.त्याची दखल पालिकेला घ्यावी लागली होती.

   दरम्यान राज्यात सर्वाधिक गोवंशाची कत्तल ही संगमनेर येथे होत असून त्या पाठोपाठ सर्वाधिक कत्तल ही कोपरगाव शहरात संजयनगर,सुभाषनगर आदी ठिकाणी होत असल्याची धक्कादायक माहिती आहे.आजच्या कारवाईत पोलिसांनी कारवाई केलेल्या व गुन्हे दाखल झालेले सुमारे पंधरा अवैध कत्तलखाने उध्वस्त करण्यात आले आहे.विशेष म्हणजे ही मोहीम गुप्तपणे प्रशासनाने राबवली असून यात कोणतीही अनुचित घटना घडली नाही.




दरम्यान या धडक मोहिमेमुळे कोपरगाव नगरपरिषद अध्यक्ष विजय वहाडणे,मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांचे कौतुक होत आहे ते कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले हे नुसतेच “दिसले” नाही तर “चमकले” असल्याची जोरदार चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close