गुन्हे विषयक
…या ठिकाणी पुन्हा गोवंश कत्तल,दोन जणांवर गुन्हा !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
ऐन श्रावण सोमवार व कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील समृध्दी महामार्गावर पहाटेच्या सुमारास चार हजार किलो गोवंश जातीच्या जनावरांचे मांस वाहतूक करणाऱ्या आयशर गाडीवर कोपरगाव शहर पोलिसांनी गोरक्षकांच्या मदतीने धडक कारवाई करत जवळपास नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.सदर कारवाईने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.या प्रकरणी दोन जणांला ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरचे गोवंश हे संगमनेर येथून छत्रपती संभाजीनगर येथे जात असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.दरम्यान या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी पातळीवर फोनाफोनी सुरू असल्याची माहिती मिळाली असून त्यामुळे अधिकाऱ्यांची धांदल उडाली असल्याचे दिसून आले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”महाराष्ट्रात नऊ वर्षा पूर्वी भाजप सरकारने गोवंश हत्या बंदी कायदा लागू करण्यात आला होता.राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी या कायद्यावर स्वाक्षरी केली होती.तोपासून ‘गोहत्या’ हा दंडनीय अपराध मानला जात आहे.गोहत्या करणार्या गुन्हेगाराला कठोर शिक्षाही होण्याची तरतूद आहे.गाय ही हिंदू धर्म आणि संस्कृतीचे प्रतिक मानले जाते.मात्र भाजप महायुतीच्या राज्यात या घटनांत कमी येताना दिसत नाही हे विशेष ! कोपरगाव शहरातील गोरक्षक समितीचे अध्यक्ष मयूर विधाटे याचे घरावर स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी शहरातील सुमारे 150- 200 असामाजिक तत्वांनी हल्ला चढवला असताना आज पहाटेच्या सुमारास अ.नगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरालगत समृद्धी महामार्गावरून संगमनेर येथून छत्रपती संभाजीनगर कडे एक आयशर गोमांस भरून घेऊन जात असल्याची खात्रीलायक माहिती शहर पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल बी.एस.कोरेकर यांना मिळाली होती.सदर बाब त्यांनी मोबाईल फोन द्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर दिनांक 26 ऑगस्ट रोजी पहाटे सव्वा चारच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोबरे,पोलीस हेड कॉन्स्टेबल बी.एस.कोरेकर,श्री.जाधव,पोलीस कॉन्स्टेबल बाळू धोंगडे यांनी जेऊर कुंभारी समृद्धी टोल नाक्यावर सापळा रचत आयशर (क्रमांक- एम.एच.17 बी. वाय.0489) ला ताब्यात घेऊन चालकास विचारपूस केली असता त्यांनी उडवा उडवीचे उत्तरे दिली होती.शहर पोलिसांनी तेथे उपस्थिती असलेल्या बजरंग दल व गोरक्षकांच्या मदतीने आयशरची तपासणी केली असता आयशर मध्ये जवळपास 04 हजार किलो गोमांस आढळून आले आहे.दरम्यान सदर घटनास्थळी शहर पोलिसांनी गोमांस भरलेल्या आयशरसह दोन जणांना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान यातील गोरक्षा दलाच्या कार्यकर्त्यांनी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यासोबतच ज्यांनी या गोवंशाची कत्तल केली आहे व ज्या ठिकाणी सदर गोवंश जात होते त्यांची चौकशी करून त्यांच्यावरही कारवाई करावी अशी महत्वपूर्ण मागणी केली आहे.त्यामुळे पोलिस अधिकारी आता काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.सदरचे गोवंश हे संगमनेर येथून छत्रपती संभाजीनगर येथे जात असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.दरम्यान या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी पातळीवर फोनाफोनी सुरू असल्याची माहिती मिळाली असून त्यामुळे अधिकाऱ्यांची धांदल उडाली असल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव येथील पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.दहे यांनी सदर मांसचे सॅम्पल तपासणीसाठी नेले आहे.या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल बाळू
धोंगडे यांच्या फिर्यादीवरून जाकिरखान नसिरखान पठाण (वय 49 वर्ष) रा.देविगल्ली,मोगलपुरा ता.संगमनेर जि.अ.नगर,फारूक कासम शेख (वय 59 वर्ष) रा.कुर्ला वेस्ट, मुंबई,हल्ली रा.जमजम कॉलनी संगमनेर जि.अ.नगर यांच्या विरोधात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सदरचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव हे करीत आहे.ऐन श्रावण सोमवार व कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गो मांस मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.