जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सहकार

…या संस्थेची वार्षिक सभा उत्साहात संपन्न !

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   ऊस गळीत हंगामात ऊस तोडणी मजूरांच्या टंचाईचा प्रश्न गंभीर झाला असून साखर कारखान्यांना अडचणींचा सामना करावा लागत असून आगामी काळात हे आव्हान पेलण्यासाठी केन हार्वेस्टिंग यंत्रांचा वापर करून भविष्यात हे कार्य अधिक प्रभावी करता येऊ शकेल आहे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी कोळपेवाडी येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

गोदावरी खोरे केन व गौतम केन ट्रान्सपोर्ट कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलतांना आ.आशुतोष काळे.

“वर्तमानात मजुरांची संख्या कमी असल्याने कारखान्यांना वेळेत उस गाळप करता येत नाही.परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान होते आणि कारखान्यांच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होवून कारखान्याचे देखील नुकसान होते.केन हार्वेस्टरची किंमत जास्त असली तरी संयुक्तपणे चार-पाच ट्रक धारकांनी मिळून केन हार्वेस्टर घ्यावे त्यामुळे ऊस तोडणी मजुरांच्या भरवशावर राहावे लागणार नाही”-आ.आशुतोष काळे,अध्यक्ष,कर्मवीर काळे सहकारी साखर कारखाना.

   गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनी प्रा. लि; गौतमनगरची ५४ वी व गौतम केन ट्रान्सपोर्ट कंपनी प्रा.लिमिटेडची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

  सदर प्रसंगी गौतम केन ट्रान्सपोर्टचे ज्येष्ठ संचालक  छबुराव आव्हाड,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीण शिंदे,संचालक राजेंद्र घुमरे,वसंतराव आभाळे, सचिन चांदगुडे,अनिल कदम,दिलीपराव बोरनारे,श्रीराम राजेभोसले,मनोज जगझाप, डॉ.मच्छिंद्र बर्डे,सुधाकर रोहोम,सुनील मांजरे, प्रशांत घुले,अशोक मवाळ, शंकरराव चव्हाण, सूर्यभान कोळपे,दिनार कुदळे,राहुल रोहमारे,गंगाधर औताडे,श्रावण आसने,सुरेश जाधव, विष्णू शिंदे, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्टचे कार्यकारी संचालक दौलतराव मोरे, गौतम केन ट्रान्सपोर्टचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सुभाष गवळी,गोदावरी खोरे संचालक दिलीपराव शिंदे,विजयराव जाधव, विक्रम मांढरे,प्रदीप कुऱ्हाडे,कैलास आहेर, अशोक निळकंठ,रमेश कोळपे,विजय थोरात, विक्रम सिनगर,गौतम केनचे संचालक भिकाजी सोनवणे,अरुण घुमरे,बबनराव भारसाकळ, रामदास कोळपे,भाऊसाहेब जोरे,माणिकराव चंद्रे,गणेश आहेर,आप्पासाहेब निकम कारखान्याचे कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे,सरव्यवस्थापक सुनील कोल्हे,सचिव बाबा सय्यद,शेतकी अधिकारी निळकंठ शिंदे, आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  याप्रसंगी पुढे बोलतांना ते म्हणाले की,”मागील वर्षीचा गळीत हंगाम टंचाईचा होता.त्यामुळे सर्व प्रकारचा खर्च वाढला व ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक धारकांचा व्यवसाय देखील कमी झाला.वर्तमानात मजुरांची संख्या कमी असल्याने कारखान्यांना वेळेत उस गाळप करता येत नाही.परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान होते आणि कारखान्यांच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होवून कारखान्याचे देखील नुकसान होते.केन हार्वेस्टरची किंमत जास्त असली तरी संयुक्तपणे चार-पाच ट्रक धारकांनी मिळून केन हार्वेस्टर घ्यावे त्यामुळे ऊस तोडणी मजुरांच्या भरवशावर राहावे लागणार नाही.आपल्या कारखान्याची गाळप क्षमता काही प्रमाणात वाढणार आहे.गळीत हंगामाच्या दृष्टीने आवश्यक असलेली कारखान्याची तयारी अंतिम टप्यात आली आहे त्या दृष्टीने सर्व ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक धारकांनी सज्ज रहावे असे आवाहन आ.काळे यांनी शेवटी केले आहे.

   सदर प्रसंगी सभेचे प्रास्तविक गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यकारी संचालक दौलतराव मोरे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व अहवाल वाचन जनरल मॅनेजर संतोष पवार यांनी केले तर प्रारंभी गत आर्थिक वर्षात निधन झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.यावेळी उपस्थितांचे
आभार संचालक विजय जाधव यांनी मानले आहे.यावेळी सभेचे सर्व विषय संमत करण्यात आले असल्याची माहिती दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close