जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगाव तालुक्यात कोरोनाने एकाचे निधन

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर व तालुक्यात शहरातील अनेक मान्यवरांना कोरोनाने गाठले असताना आज कोपरगाव तालुक्यात एकूण १३३ अँटीजन रॅपिड टेस्ट करण्यात आल्या असून त्यात १२ रुग्ण बाधित तर नगर येथे तपासणीसाठी अन्य ८१ स्राव पाठवले आहे तर येथुन आलेल्या अहवालात एकही स्राव बाधित आला नाही तर बाधित संख्येत खाजगी प्रयोग शाळेत ०३ रुग्ण बाधित आढळले आहे. आज एकूण १५ जण बाधित आले आहे.तर आधी भरती असलेल्या २२ रुग्णांस उपचारानंतर सोडून दिले असून करंजी येथील एक साठ वर्षीय पुरुषाचे निधन झाले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी कृष्णा फुलसौन्दर यांनी दिली आहे.शहरात व ग्रामीण भागात आज रुग्ण मोठ्या संख्येने आढळल्याने चिंतेचा विषय निर्माण झाला आहे.

नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा ६३ हजार ९५७ जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत ९४० जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील गत काही दिवसातील रुग्ण धरून ४१ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत काळात ग्रामीण भागात अधिक प्रमाणावर रुग्ण वाढ होत आहे.त्यामुळे आ.काळे यांनी उपाय योजनांसाठी नुकतीच तातडीची बैठक बोलावली होती त्यामुळे गांभीर्य वाढले आहे.

दरम्यान कोपरगाव शहरात आज ०४ रुग्ण आढळले आहे.त्यात बँक रोड एक पुरुष वय-५८,श्रद्धानगरी एक पुरुष वय-२३,सेवानिकेतन एक महिला वय-७९,निवारा परिसर एक पुरुष वय-३० आदींचा समावेश आहे.

तर ग्रामीण भागात ११ रुग्ण बाधित आढळले आहे त्यात करंजी दोन पुरुष वय-४५,६२,एक महिला वय-२५,जेऊर पाटोदा पुरुष वय-६१,रवंदे एक पुरुष वय-१६,पोहेगाव येथील पुरुष रुग्ण वय-४०,महिला दोन वय-३०,५५,कोकमठाण एक पुरुष वय-४१,आत्मा मलिक एक महिला वय-३८,चांदगव्हाण पुरुष वय-५१,आदीं जास्त संख्येने रुग्ण बाधित आढळले आहे.त्यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान आज कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ०२ हजार ४७३ इतकी झाली आहे.त्यात १०१ रुग्ण सक्रिय आहेत,तर आज करंजी येथील ६० वर्षीय इसमाचे निधन झाले आहे त्यामुळे आज पर्यंत ४१ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.६५ टक्के आहे.आतापर्यंत १७ हजार २३१ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला ६८ हजार ९२४ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर १४.३५ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या ०२ हजार ३३२ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ९४.२९ टक्के झाला आहे.दरम्यान आज शहरी भागात मोठी रुग्ण वाढ होण्याबरोबरच ग्रामीण भागात मात्र आज रुग्ण संख्या झपाट्याने होत असल्याचे दिसत आहे.तरी मात्र नागरिकांनी आगामी काळात प्रतिबंधात्मक उपायाबाबत अजून दक्षता घेतल्यास पूर्ण रुग्ण वाढ रोखता येईल असा विश्वास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी शेवटी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close