जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

..त्या शिक्षकांना ५० लाखांचे संरक्षण द्या-मागणी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

महाराष्ट्रात कोरोनाने शिरकाव केला त्या क्षणापासुन अनेक घटक केंद्र व राज्य सरकारला मदत करत आहेत.डाॅक्टर्स,पोलीस यंत्रणा,आरोग्य,शिक्षकांसह इतर खात्यातील अनेक कर्मचारी या कोरोना लढाईत जीव धोक्यात घालुन जीव वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत.त्यांना मदत करणे हे प्रत्येक नागरिकाचे व सरकारी कर्मचार्‍यांचे कर्तव्य आहे मात्र या मोहिमेत महत्वाची भूमिका निभावणाऱ्या शिक्षकांनाही ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण द्यावे व प्रतिष्टेला शोभेल असे काम द्यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते ज्ञानेश्वर माळवे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केली आहे.

गुरुजींची कोरोना संदर्भात शासनाने विविध ठिकाणी नेमणुक करतांना शिक्षकांच्या प्रतिष्ठेचा विचार केलेला दिसत नाही. दारुच्या गुत्त्यासमोर तळीरामांची रांग व्यवस्थित करणेसाठी अनेक शिक्षकांना नेमणुक देणे.रेशन दुकानात दुकानदारावर नजर ठेवणे.जिल्हा व तालुका सिमांवर असलेल्या तपासणी नाक्यावर नेमणूक करणे.वहातुक नियंत्रण करणे व अवैध वाहतुक थांबवणे.विलागीकरण केलेल्या ठिकाणी महिला शिक्षकांना रात्रीचे कर्तव्य देणे. कोरोना बाधित क्षेत्रात बाधीत कुटुंब व ईतर कुटुंबांना घरपोहोच किराणा,भाजीपाला पोहोच करणे.यासह अनेक तर्‍हेवाईक वाटणारी कामे करण्यासाठी गुरुजी व ताईंची वेळेचे भान न ठेवता नेमणुका केल्या गेल्या आहेत हे धक्कादायक आहे.

नाशिक-नगर तपासणी नाक्यावर पाथरे शिवारात शिक्षकांना ट्रकने उडवले.ते जखमी होऊन दवाखान्यात पडले आहे.त्यांच्या ऊपचाराचा खर्च कोणी करायचा.मार्च २०२० चे पंचवीस टक्के वेतन कपात केले.एप्रील व मे महिन्याच्या पगाराचा पत्ता नाही मग जखमी शिक्षकांच्या ऊपचारासाठी कुटुंबियांनी कुणासमोर हात पसरायचा याचा विचार शासनाने केला पाहीजे.दारुच्या गुत्यासमोर आपले गुरुजी उभे राहुन शिठ्ठी वाजवत आहे हे पालक व विद्यार्थ्यांनी पाहीले तर विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा काय आदर्श घ्यायचा ?

प्राथमिक शिक्षक म्हणजे गुरुजी अथवा गुरु हा शब्द समोर आला म्हणजे एक आदर्शवादी भूमिका वठवणारा माणूस उभा राहतो त्याला ग्रामीण भागात आजही देवत्व बहाल करणारे खूप आहेत.या गुरुजींना गावात मोठी प्रतिष्ठा असते.कोपरगांव तालुक्यातील करंजी नावच्या गांवात तर सेवानिवृत्त झालेल्या “कुंभार गुरुजींचे ” तेथील ग्रामस्थांनी मंदीर बांधलेले आहे.त्यांचे आजही मोठ्या भक्तीभावाने ग्रामस्थ दर्शन घेतात.या शिक्षकांच्या पेशाचे नेमणूक करताना विचार झालेला दिसत नाही हे दुर्दैव आहे.जत तालुक्यात नानासाहेब गोरे नावाच्या शिक्षकाला तपासणी नाक्यावर ट्रकने चिरडले! गतप्राण झालेल्या शिक्षकाचे कुटुंब रस्त्यावर आले.कोविड अंतर्गत कोरोना कर्तव्यावर असलेल्या शिक्षकांना ५० लाख विमा संरक्षण मिळावे यासाठी मंत्रीमहोदयांकडे खेटा घालुन संघटनेचे शिक्षक नेते थकले तरी विमा संरक्षण देण्यास असमर्थता दर्शवित आहे. मग शिक्षकांनी काम कुणाच्या भरवशावर करायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. गुरुजींना अशा नेमणुका देणार्‍या यंत्रणेने भानावर रहाण्याची व शिक्षकांना त्यांच्या सामाजीक प्रतिष्ठेप्रमाणे काम देण्यांची जबाबदारी ह्या यंत्रणांनी पाळली पाहिजे.ज्या गावात शिक्षणाचे धडे गिरवायचे.तेथील रेशन दुकानदारांवर नजर ठेवायला गुरुजींना सांगुन गावात त्यांचे संबंध बिघडवायचे.या कामी ग्रामसेवक,तलाठी,पोलीस पाटील,सरपंच यांची नेमणुक असणे गरजेचे असतांना बिचारे गुरुजी नाहक भरडले जात आहे.

या सर्व बाबी करतानांच विद्यार्थ्यांना आॅनलाईन धडे द्यायचे! “शाळा बंद पण शिक्षण चालु” ही अभिनव कल्पना कोणत्या सुपिक डोक्यातुन उगवली कळायला मार्ग नाही.”मे”महिन्यात आपल्या महाराष्ट्रात कधी लहान मुलांना शिक्षण देण्याची प्रक्रिया यापुर्वी बघीतली नव्हती.पण कोरोनाच्या नावाखाली “गुरुजींना” जेवढे पिळता येईल तेवढे पिळले जात आहे. या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व तहसिलदार व महसुल यंत्रणा अन् शिक्षण यंत्रणा यांना कळकळीची विनंती आहे की,समाज व राष्ट्र घडवणार्‍या प्राथमिक शिक्षक बांधवांना त्यांची प्रतिष्ठा जपणारी नेमणुक द्यावी व कोरोना अंतर्गत ५० लाखाचे विमा संरक्षण द्यावे अशी मागणीही ज्ञानेश्वर माळवे यांनी शेवटी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close