कोपरगाव तालुका
बोली भाषा जतन करणे आवश्यक आहे – माजी नगराध्यक्ष कुदळे
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी भाषा कमकुवत होत आहे घरातही मराठी भाषा कमी प्रमाणात वापरात असून खरे मराठीपण ग्रामीण बोलीभाषेत असून ती जतन केली जावी असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष पदमकांतजी कुदळे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात केले आहे.
“मराठी भाषा दिनानिमित्त अनेक ठिकाणी अनेक प्रकारे विचारमंथन व प्रबोधन केले जाते मराठी भाषा जतन संवर्धन करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत परंतु कालौघात बदल घडतात आणि आपली मराठी भाषा आपल्या पासून दुरावत जात आहे”-पद्माकांत कुदळे,माजी अध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.
कवी कुसुमाग्रज जयंती मराठी भाषा दिन म्हणून साजरी केली जाते या प्रसंगी शब्द गंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य कोपरगाव शाखेच्या वतीने कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.
या वेळी कवी कुसुमाग्रजांच्या प्रतीमेचे पूजन करण्यात आले त्यावेळी माजी नगराध्यक्षा ऐश्वर्या सातभाई, राजेंद्र कोयटे,संतोष तांदळे,एड.पुनम गुजराथी,शैलजा रोहोम, कैलास साळगट आदि मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की,”मराठी भाषा दिनानिमित्त अनेक ठिकाणी अनेक प्रकारे विचारमंथन व प्रबोधन केले जाते मराठी भाषा जतन संवर्धन करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत परंतु कालौघात बदल घडतात आणि आपली मराठी भाषा आपल्या पासून दुरावत जाते असल्याचेही ते शेवटी म्हणाले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास साळगट यांनी केले तर मराठी भाषेविषयी कवी संतोष तांदळे वात्रटिकाकार राजेंद्र कोयटे डॉ.दादासाहेब गलांडे, कुलकर्णी मॅडम श्वेतांबरी राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.
कविसंमेलन प्रसंगी नंदकिशोर लांडगे सोमनाथ मंडाळकर दत्तात्रय विरकर,प्रमोद येवले, हेमचंद्र भवर,सुनीता इंगळे, प्रा.मधुमिता निळेकर,बालकवयित्री पावले,आदिंनी आपल्या कविता सादरीकरण केले.
समारंभासाठी अजीत कसाब,ग्रंथपाल कोळगे,राऊत कवी बाळासाहेब देवकर आदि मान्यवर उपस्थित होते. सुत्रसंचलन प्रा मधुमिता निळेकर यांनी आभार राजेंद्र कोयटे यांनी मानले आहे.