वन व पर्यावरण
बिबट्याने केली शेळी फस्त,ग्रामस्थांतून भीतीचे वातावरण

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी )
सुरेगाव तालुका कोपरगाव तालुक्यातील सूरेगाव येथील निकम वस्तीवर रात्री बिबट्याचा हल्ला केला असून यात एक शेळी फस्त केली असल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यांनी वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.

“सुरेगाव निकम वस्ती या भागात पंधरा दिवसापासून महावितरण कंपनीचे रोहित्रे बंद असून संबधित महावितरण कंपनीस वारंवार विनंती करूनही लाईटची व्यवस्था होत नसल्याने अंधाराचा गैरफायदा घेत बिबट्याने ही संधी साधत हा हल्ला केला आहे;या बिबट्याचा वन विभागाने बंदोबस्त करावा”-मोतीराम निकम,कार्यकर्ते,सुरेगाव.
अहील्यानगर जिल्ह्यात बिबट्याचे हल्ले वाढले आहेत.अकोले,संगमनेर,कोपरगाव,राहाता,राहुरी, पारनेर यांसारख्या तालुक्यांमध्ये बिबट्याचे हल्ले वाढत आहेत,ज्यामुळे पशुधन आणि मानवी वस्तीला धोका निर्माण झाला आहे.बिबट्याचे हल्ले वाढत असल्याने,वनविभाग आणि स्थानिक प्रशासन नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला देत आहे.अ.नगर जिल्ह्यात मागील पाच वर्षांत १४ हजार ४४२ हल्ले बिबट्यांनी केले असल्याची माहिती आहे.
कोपरगाव तालुक्यातही ऊस शेती आणि मका पिका खाली मोठे क्षेत्र निर्माण झाल्याने वाघ आणि बिबटे यांचा वावर वाढला आहे.परिणामी त्यांची दहशत वाढत चालली आहे.अशीच घटना कोपरगाव तालुक्यात सुरेगाव हद्दीत जिल्हा परिषद शाळेच्या मागील निकम वस्ती येथील मोतीराम दिनकर निकम यांच्या शेतातील वस्तीवर घडली आहे. मोतीराम निकम व भूषण दिलीप निकम यांच्या शेतातील वस्तीवर रात्री बिबट्याने हल्ला करून त्यात एक शेळी उसात नेऊन फस्त केली आहे.
दरम्यान त्यांनी या भागात पंधरा दिवसापासून महावितरण कंपनीचे रोहित्रे बंद असल्याचा आरोप केला आहे.संबधित कंपनीस वारंवार विनंती करूनही लाईटची व्यवस्था होत नसल्याने अंधाराचा फायदा घेत बिबट्याने ही संधी साधत हा हल्ला केला असल्याचा आरोप केला आहे.या शिवाय सुरेगाव ग्रामपंचायतलाही पथदिवे बंद असल्याची माहिती देऊनही उपयोग झाला नाही परिणामी त्या संधीचा फायदा घेत रात्रीच्या सुमारास वारंवार बिबट्या येत आहे.त्याच्यापासून मनुष्यहानी सारखी अप्रिय घटना होण्याची दाट शक्यता असल्याने यावर संबधित ग्रामपंचायतने व कोपरगाव वन विभागाने बिबट्याचा प्रतिबंध करण्याची कारवाई करावी अशी मागणी मोतीराम निकम यांनी शेवटी केली आहे.