जलसंपदा विभाग
…’त्या’ दुष्काळी बंधाऱ्यात येणार निळवंडेचे पाणी,शेतकऱ्यांत समाधान

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्याच्या जिरायती भागातील १३ गावात निळवंडे कालव्याचे पाणी पाझरतलावात पोहोचविण्यात बंदिस्त जलवाहिन्या पूर्ण नसल्याने येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी निळवंडे कालव्याच्या बोडखेवाडी पॉइंटपासून बुजवलेला सरकारी चर खोदण्याच्या कामास आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला आहे.त्यामुळे जिरायती परिसरातील भागवतवाडी,रांजणगाव देशमुख,अंजनापूर,बहादरपूर आदी गावातील शेतकऱ्यांना पाणी मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

निळवंडे कालवा कृती समितीचे कार्यकर्ते गंगाधर रहाणे,बाबासाहेब गव्हाणे,सचिव कैलास गव्हाणे,साहेबराव रहाणे,आदींनी दुष्काळी भागातील सायाळे भागातील व खोकडविहीर ठिकाणचा चर उकरून द्यावा अशी मागणी लावून धरली होती.तर बहादरपुर येथील पश्चिम बाजूकडील नदीस लोकवर्गणीतून १३ लाख रुपये खर्चूनही अद्याप पाणी पोहचू शकलेले नाही.त्याबाबत लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.
केंद्र व राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जलजीवन मिशन अभियानातील पाणी पुरवठ्याचे कोपरगाव तालुक्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची कामे पूर्ण करण्यासह विविध पाणी योजनांची कामे पूर्ण करण्यासाठी काल तहसील कार्यालयात टंचाई आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी कालवा कृती समितीचे कार्यकर्ते रंगनाथ गव्हाणे,बहादरपुरचे सरपंच गोपीनाथ रहाणे,अंजनापुरचे माजी सरपंच ज्ञानेश्वर गव्हाणे आदींनी निळवंडे धरणाचे कालवे पूर्ण झाले आहे.मात्र बंदिस्त वितरिका व अतिक्रमित चर अद्याप अपूर्ण आहे.त्यामुळे बहादरपूर आणि अंजनापुर आदी गावात तलाव भरण्यास बुजवलेल्या चराची अडचण आल्याची तक्रार संगमनेर व कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी संगमनेर तहसीलदार यांचेकडे शेतकऱ्यांनी केली होती.त्यामुळे रांजणगाव देशमुख गावाच्या नैऋत्येस असलेला पाझर तलाव,अंजनापुर दक्षिण पाझरतलाव भरण्यास अडचणी येत होत्या.त्याबाबत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता.

दरम्यान अद्याप अंजनापुर पूर्व भाग,जवळके,धोंडेवाडी,बहादराबाद,शहापूर आदी गावांना निळवंडे धरणाचे पाणी पोहचले नाही त्यासाठी वेस बंधारा ते हॉटेल मनोदीप पर्यंत चर खोदाई करणे गरजेचे आहे मात्र त्यास तीन वर्षापासून अद्याप यश आलेले नाही त्यामुळे दुष्काळी शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान सन-२०१४ च्या अटीतटीच्या विधानसभा निवडणुकीत आशुतोष काळे यांना आमदार करण्यात व त्यांच्या विजयात निळवंडे कालवा कृती समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते व दुष्काळी तेरा गावातील मोठे योगदान राहिले आहे.त्याची आठवण ठेवून वरील कार्यकर्त्यांनी आ.काळे यांचेकडे या भागात तळेगाव दिघे नजीक असलेल्या बोडखेवाडी येथील ठिकाणाहून प्रस्तावित अतिक्रमित व बूजवलेला चर काढला तर पाणी येऊ शकते याची माहिती देऊन गत तीन वर्षापासून पाठपुरावा केला होता.त्या पाठपुराव्याला यश येऊन आज दुपारी त्यांनी या कामाचा शुभारंभ केला आहे.

सदर प्रसंगी गजानन मते,संतोष वर्पे,रवींद्र वर्पे,संदीप गोर्डे,शिवाजी वामन,संपत खालकर,के.डी.खालकर,रंगनाथ गव्हाणे,द्यानदेव गव्हाणे,विजय कोटकर,रामेश्वर गव्हाणे,दत्तात्रय गव्हाणे,प्रकाश गोर्डे,अशोक चव्हाण आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान निळवंडे कालव्याचे कालवा कृती समितीच्या न्यायिक व रस्त्यावरील लढ्याच्या रेट्याने कालव्यांचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाट न पाहता घाईघाईने दिनाक ३१ मे २०२३ रोजी पूर्ण होऊन उद्घाटन केले होते.त्यानंतर कालवा कृती समितीचे कार्यकर्ते गंगाधर रहाणे,बाबासाहेब गव्हाणे,सचिव कैलास गव्हाणे,साहेबराव रहाणे,आदींनी दुष्काळी भागातील सायाळे भागातील व खोकडविहीर येथील चर उकरून द्यावा अशी मागणी लावून धरली होती.तर बहादरपुर येथील पश्चिम बाजूकडील नदीस लोकवर्गणीतून १३ लाख रुपये खर्चूनही अद्याप पाणी पोहचू शकलेले नाही.त्याबाबत लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.
दरम्यान अद्याप अंजनापुर पूर्व भाग,जवळके,धोंडेवाडी,बहादराबाद,शहापूर आदी गावांना पाणी पोहचले नाही त्यासाठी वेस बंधारा ते हॉटेल मनोदीप पर्यंत चर खोदाई करणे गरजेचे आहे मात्र त्यास तीन वर्षांपासून अद्याप यश आलेले नाही त्यामुळे दुष्काळी शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे व सदर काम लोकप्रतिनिधी आ.काळे यांनी तत्काळ पूर्ण करावे अशी मागणी निळवंडे कालवा कृती समितीचे कार्यकर्ते गंगाधर रहाणे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केली आहे.