जलसंपदा विभाग
गोदावरी कालव्यातून…इतकी आवर्तने सोडणार-माहिती

न्युजसेवा
शिर्डी (प्रतिनिधी )
गोदावरी खोऱ्यात डावा व उजवा कालवा खोऱ्यात तीन आवर्तने सोडण्यात येतील.अतिरिक्त पाणी बचत झाल्यास चौथे आवर्तन सोडण्याचा विचार करण्यात येईल,अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज राहता येथे एका कार्यक्रमात बोलताना दिली आहे.

राहाता येथे झालेल्या गोदावरी डावा व उजवा कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत अध्यक्षपदावरून ते बोलत होते याप्रसंगी खा.भाऊसाहेब वाकचौरे,आ.आशुतोष काळे,आ. हेमंत ओगले,माजी आ. स्नेहलता कोल्हे,समितीचे सदस्य तसेच शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर,नाशिक विभाग मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ,अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने,कार्यकारी अभियंता सोनल शहाणे आदी उपस्थित होते.

“समन्यायी पाणी वाटपाचा जो अन्यायकारक कायदा कऱण्यात आला आहे त्याने आपल्या भागातील शेतकऱ्याचे मोठया प्रमाणावर नुकसान होत आहे,तसेच घाटमाथ्याचे वाहून जाणारे पाणी अडवून नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून दुष्काळी भागाला निश्चितच फायदा होईल.सदर काम प्रगतीपथावर आहे परंतु कामाला आणखी वेग देऊन हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण कसा होईल यावर अग्रक्रमाने काम करावे”- खा.भाऊसाहेब वाकचौरे,शिर्डी लोकसभा मतदार संघ.

दरम्यान चालू वर्षी सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत.त्यामुळे पाटबंधारे विभागाने एक रब्बी व दोन उन्हाळी आवर्तन देण्यास सहमती दिली आहे.मात्र पाण्याची जास्तीत जास्त बचत करून तीन आवर्तनाचे चार आवर्तन करा अशी आपण केली असल्याची माहिती कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.
जलसंपदा मंत्री विखे पुढे बोलताना म्हणाले की,”शेतकऱ्यांनी पाण्याची बचत करून अधिकचे पाणी शेतील कसे उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करावेत,गोदावरी उजव्या कालवा नूतनीकरणासाठी १९१ कोटींची मान्यता शासनाने दिली आहे.डावा व उजवा कालव्याच्या चारी दुरूस्ती करिता २६० कोटींचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे.त्यास मान्यता देण्यात येईल.साधारणतः ४५० कोटी फक्त गोदावरी खोऱ्यावर शासन खर्च करणार आहे.पश्चिम वाहिनीनदीचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याच्या सर्वेक्षणासाठी ६५ कोटी मंजूर करण्यात आले आहेत.गोदावरी खोऱ्यात नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून अतिरिक्त पाणी वळविणे हे जलसंपदा विभागाचे सर्वोच्च प्राधान्य आहे.सर्वांना समप्रमाणात पाणी मिळावी ही शासनाची भूमिका असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मंत्री विखे पाटील म्हणाले,”शिर्डी नगरपालिकेच्या वाया जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी चारी क्र.११, १२ व १३ मध्ये सोडण्यात येणार आहे.त्यामुळे येथील शेतकऱ्यांना बारामाही पाणी मिळणार आहे.पिंपळवाडी चारी क्र.१४ स्वतंत्र पाइपलाइन करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
जलसंपदा विभागाकडून शेतकऱ्यांना असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल,अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
दरम्यान समन्यायी पाणी वाटपाचा जो अन्यायकारक कायदा कऱण्यात आला आहे त्याने आपल्या भागातील शेतकऱ्याचे मोठया प्रमाणावर नुकसान होत आहे,तसेच घाटमाथ्याचे वाहून जाणारे पाणी अडवून नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून दुष्काळी भागाला निश्चितच फायदा होईल.सदर काम प्रगतीपथावर आहे परंतु कामाला आणखी वेग देऊन हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण कसा होईल,यादृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.कालव्यानां पाणी आल्यानंतर अनियमीत स्वरूपाचा होणारा वीज पुरवठा यावर देखील लवकर तोडगा काढण्याच्या सूचना शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिल्या असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
यावेळी खा.भाऊसाहेब वाकचौरे,आ.आशुतोष काळे,विवेक कोल्हे यांचीही भाषणे झाली आहेत.गोदावरी कालव्यातील रब्वी- खरीप हंगाम २०२४-२५ च्या आवर्तन नियोजनाबाबत श्री.गोवर्धने यांनी प्रास्ताविकात माहिती दिली. रब्बी १ व उन्हाळ्यात २ आवर्तन देण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले आहे.