जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

जिल्हा बँकेच्या शाखा प्रमुखांची अज्ञात कारणाने आत्महत्या !

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

वाकडी (प्रतिनिधी):

राहाता तालुक्यातील वाकडी येथील अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे शाखाध्यक्ष ज्ञानेश्वर मनोहर गायकवाड यांनी राहाता चितळी रस्त्यालगत वाकडी शिवारात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.

ज्ञानेश्वर गायकवाड यांनी सोसायटी मार्फत गरजू शेतकऱ्यांना जिल्हा बँकेकडून तात्काळ शेतीकर्ज, विविध योजना मिळवून दिल्या आहेत.त्यामुळे वाकडी परिसरातील शेतकऱ्यांच्या मनात गायकवाड यांनी घर केले होते.जिल्हा बँकेचे ज्ञानेश्वर गायकवाड यांचे कोणाशी कुठलेही वाद नव्हते, ज्या ठिकाणी गायकवाड हे बेशुद्ध अवस्थेत सापडले त्याठिकाणी रासायनिक औषध व एक शीतपेय बाटली आढळून आली आहे.

वाकडी येथील जिल्हा बँकेत शाखाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले ज्ञानेश्वर गायकवाड यांचा बुधवार दि.२४ मार्च रोजी दुपारपासून फोन बंद येत असल्यामुळे नातेवाईकांनी त्यांचा वाकडी परिसरात शोध सुरु केला या दरम्यान राहता चितळी रस्त्यावरून नातेवाईक जात असताना सायंकाळी उशिरा वाकडी शिवारातील कानिफनाथ फाटा लगत रस्त्याच्या कडेला जमावं दिसला म्हणून पाहणी केली असता त्या ठिकाणी गायकवाड यांची दुचाकी दिसली.तात्काळ नातेवाईकांनी त्या ठिकाणी धाव घेतली असता ज्ञानेश्वर गायकवाड हे बेशुद्द अवस्थेत आढळून आले होते. नातेवाईकांनी त्यांना तात्काळ शिर्डी येथील साई सुपर हॉस्पिटल येथे पुढील उपचारसाठी नेले मात्र उपचाराअगोदर ज्ञानेश्वर गायकवाड यांची प्राणज्योत मालवली होती.घटने अगोदर गायकवाड हे सकाळपासून मार्च महिना अखेर असल्याने बँकेच्या कामकाजात होते.दुपारी एक वाजता त्यांच्या सोबत असलेल्या एका सोसायटीच्या सचिवने त्यांना घरी सोडले जेवणाचा डबा घेऊन वाकडी शाखेत येतो असे सांगत गायकवाड यांनी त्या सचिवाला जाण्यास सांगितले होते.मात्र नंतर ज्ञानेश्वर गायकवाड हे वाकडी शाखेत न येता त्यांचा फोन बंद आला व सायंकाळी ज्ञानेश्वर गायकवाड हे संशयास्पद आढळून आले.ज्ञानेश्वर गायकवाड यांची १९९१ साली वाकडी येथील जिल्हा बँक शाखेत शाखाप्रमुख नियुक्ती झाली होती.मध्यन्तरी तीन वर्ष राहाता परिसरात बदली झाल्यावर पुन्हा त्यांची वाकडी शाखेत बदली झाली. त्यांच्या कामाची पद्धत अतिशय चांगली होती.वाकडी येथील जिल्हा बँकेच्या कार्यक्षेत्रात वाकडी येथील तीन, जळगाव येथील तीन,चितळी येथील एक व धनगरवाडी येथील एक अशा आठ सहकारी सोसायट्या आहेत. ज्ञानेश्वर गायकवाड यांनी सोसायटी मार्फत गरजू शेतकऱ्यांना जिल्हा बँकेकडून तात्काळ शेतीकर्ज, विविध योजना मिळवून दिल्या आहेत.त्यामुळे वाकडी परिसरातील शेतकऱ्यांच्या मनात गायकवाड यांनी घर केले होते.जिल्हा बँकेचे ज्ञानेश्वर गायकवाड यांचे कोणाशी कुठलेही वाद नव्हते, ज्या ठिकाणी गायकवाड हे बेशुद्ध अवस्थेत सापडले त्याठिकाणी रासायनिक औषध व एक शीतपेय बाटली आढळून आली, तसेच त्या ठिकाणी एक चिट्ठी देखील आढळून आली असल्याची परिसरात चर्चा आहे मात्र ती चिठ्ठी नातेवाईकांना मिळालेली नाही. गायकवाड हे दुपारी उशिरापासून त्या ठिकाणी पडून असल्याची देखील चर्चा आहे मात्र नातेवाईक आल्यावरच त्यांना दवाखान्यात नेण्यात आले, गायकवाड यांना त्याचवेळी दवाखान्यात नेले असते तर त्यांचे प्राण वाचले असते, गायकवाड हे वाकडी शाखेत न जाता त्या भागात कसे व का गेले तसेच त्यांच्या दिवसभरातील फोन कॉल वरून सर्व समोर येईल.शिर्डी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद असून घटना घडली ती राहाता पोलीस ठाणे हद्द असल्यामुळे हा तपास राहाता पोलिसांकडे वर्ग झाल्यावर,शवविच्छेदन अहवाल आल्यावर खरे प्रकरण समोर येईल मात्र ज्ञानेश्वर गायकवाड यांनी आत्महत्या केली की ,त्यांना आत्महत्तेस प्रवृत्त केले की त्यांची काही आर्थिक फसवणूक की अन्य काही कारण? तसेच त्यांनी या परिसरात ऑन ड्युटी आत्महत्या करण्याचे कारण काय याबाबत परिसरात उलटसुलट चर्चा सुरु आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close