जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

महाविद्यालयीन तरुणांत हाणामारी,दोन जखमी,कोपरगावात गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहराच्या ईशान्येस साधारण तीन कि.मी.अंतरावर असलेल्या संजीवनी महाविद्यालयातील तरुणांच्या दोन गटात महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या समोर विद्यार्थ्यांत भांडण मिटविण्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत अभिषेक राजेश छत्रबंद व जगन्नाथ कार्तिक दास
दोन जण गंभीर रित्या जखमी झाले असून या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी आदित्य बजरंग लासुरे रा.कोपरगाव याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे पालकवर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.

दि.१२ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास या ठिकाणी विद्यार्थ्यांचे दोन गट पूर्वी झालेली हाणामारी मिटविण्याच्या बहाण्याने महाविद्यालय प्रवेशद्वाराच्या बाहेर आले होते.मात्र सदर भांडण मिटण्या ऐवजी त्याची पुन्हा पुनरावृत्ती झाली ते वाढले आहे व त्या झालेल्या भांडणात धारदार वस्तूने (चॉपरणे असे म्हणतात) एकमेकावर वार करण्यात आले आहे.त्यात दोघांना बरगडी व हातावर गंभीर वार झाले आहे.त्यात अभिषेक राजेश छत्रबंद व जगन्नाथ कार्तिक दास (दोघांचे वय-२३) हे दोन जण गंभीर जखमी झाले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव शहरात संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सभासदांच्या उसातून टन निहाय विशिष्ट रक्कम कपात करून शेतकऱ्यांच्या व सभासदांच्या मुलांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी तत्कालीन मंत्री शंकरराव कोल्हे यांनी संजीवनी महाविद्यालय स्थापन केले होते.त्यात उत्तरोत्तर भर पडत जाऊन आज या संस्थेचा मोठा विस्तार झाला आहे.यात सभासदांच्या मुलांना शिक्षण मिळते की नाही आज वादाचा विषय आहे.मात्र सदर महाविद्यालय आज वेगळ्याच विषयाने चर्चेत आले आहे.या महाविद्यालयात राज्य व देशभरातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत आहेत.पालकांनी त्यानां विश्वासाने पाठवले असताना यात विद्यार्थी शिक्षण घेतात की नाही असे म्हणण्यास या भांडणावरून जागा आहे.

सदर संजीवनी महाविद्यालयांच्या समोर विद्यार्थ्यांच्या दोन गटात यापूर्वी हाणामारी झालेली होती.त्यानंतर दि.१२ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या दोन गटांनी सदरची हाणामारी मिटविण्याच्या बहाण्याने सदर विद्यार्थीं महाविद्यालय प्रवेशद्वाराच्या बाहेर आले होते.मात्र सदर भांडण मिटण्या ऐवजी त्याची पुन्हा पुनरावृत्ती झाली ते वाढले आहे व त्या झालेल्या भांडणात धारदार वस्तूने (चॉपरणे असे म्हणतात) एकमेकावर वार करण्यात आले आहे.त्यात दोघांना बरगडी व हातावर गंभीर वार झाले आहे.त्यात अभिषेक राजेश छत्रबंद व जगन्नाथ कार्तिक दास (दोघांचे वय-२३) हे दोन जण गंभीर जखमी झाले आहे.यात आरोपी आदित्य बजरंग लासुरे रा.कोपरगाव याने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी अभिषेक छत्रबंद रा.ओमनगर कोपरगाव याने गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान घटनास्थळी पोलीस उप निरीक्षक रोहिदास ठोंबरे यांनी भेट दिली आहे परिस्थिती नियंत्रणात आहे.यापूर्वीही सदर संस्था सैनिकी स्कूल मधील येवला तालुक्यातील विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने चर्चेत आली होती.

कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.२८३/२०२२ भा.द.वि.कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करित आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close