जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यातील खुनातील आरोपीचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील महावितरण च्या सबस्टेशन नजीक शेतात दि.२६ जानेवारी २०२० शेतात हरभरा पिकास पाणी भरत डोक्यात वार करून खून केलेल्या संजय भाऊसाहेब खालकर (वय-२९) याच्या खुनाबाबत याच प्रकरणातील आधी साक्षीदार व नंतर आरोपी बनलेला ज्ञानदेव भाऊसाहेब खालकर यास नुकतेच जिल्हा व सत्र न्यायालयापुढे जामिनासाठी हजर करण्यात आले असता जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री भागवत यांनी त्याचा जामीन अर्ज फेटाळला असल्याची माहिती सरकारी वकील अड्.अशोक वहाडणे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

या प्रकरणी अतिरिक्त मुख्य न्यायमूर्ती श्री डोईफोडे यांनी दि.८ फेब्रुवारी रोजी आरोपीस चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.दरम्यान या प्रकरणी आरोपी वकीला मार्फत कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात या सुनावणी प्रकरणी अपिलात गेला होता.त्याची सुनावणी सोमवारी दि.८ मार्च रोजी संपन्न झाली होती.मात्र जिल्हा व सत्र न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता तो नुकताच दिला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख शिवारात दि.२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास गट क्रं.११२ मध्ये रांजणगाव देशमुख येथे शेतात पाणी भरत असताना तरुण संजय बाळासाहेब खालकर या शेतकऱ्याचा डोक्यात घाव घालून खून करण्यात आला होता.हि घटना कोपरगाव-संगमनेर रस्त्यालगत घडल्याने रांजणगाव देशमुख सह कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली होती.मयत संजय बाळासाहेब खालकर शेतकरी रात्रीचा विद्युतपुरवठा असल्याने शेतातील हरभरा व कांद्याला पाणी देण्यसाठी रात्री वस्तीवरून गावाकडील कोपरगाव-संगमनेर रस्त्याला रांजणगाव देशमुख विद्युत उपकेंद्राच्या पूर्वेला असलेल्या शेतात आले होते.शेतात पाणी चालू असताना साडेअकरा ते पावणेबारा वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने घाव घालून त्यांचा खून केला होता.जवळच त्यांचा चुलतभाऊ ज्ञानदेव भाऊसाहेब खालकर पाणी भरत होता.त्यांने पाणी भरत असताना रस्त्याकडे बॅटरी लावून पाहिले तर तिघे जण तोंड बांधून उभे दिसले व रस्त्याला पांढऱ्या रंगाची मोटार उभी दिसली.बॅटरी लावल्यामुळे तो त्यांच्या दिशेने धावला,ज्ञानदेव खालकर यांना चुलत भाऊ संजय खालकर हे खाली पडलेले दिसले असा बनाव केला होता. ही घटना त्यांनी घरी जाऊन चुलतभाऊ व इतरांना सांगुन शिर्डी पोलिसांना कल्पना दिली होती.संजय खालकर यांना तातडीने शिर्डी येथे साईबाबा रुग्णालयात नेले मात्र त्या अगोदरच त्यांचा मृत्यू झाला होता.घटनेची माहिती कळताच शिर्डीचे पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आपला तपास सुरु केला होता मात्र वर्षाचा कालखंड होऊनही त्या खुनाला वाचा फुटत नव्हती.त्यामुळे या घटनेत पोलिसही चक्रावून गेले होते.अखेर हे प्रकरण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे नुकतेच सोपवले होते.सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.के.देशमुख यांनी या प्रकरणी संशयित आरोपी व घटनेचा साक्षीदार ज्ञानदेव खालकर याला दि.८ फेब्रुवारी २०२१ रोजी अटक केली होती.पोलिसानी या प्रकरणी सखोल तपास केला असता मयत व आरोपी यांचा जमीन वाटपावरून वाद असल्याचे निष्पन्न झाले होते.व गट.क्रं.११२ मध्ये त्यांचे ०१.८० हे.असे सामायिक वाटप होऊन त्यातील एक सामायिक ०.३० आर क्षेत्र सामायिक ठेवण्यावरून वाद होता.व त्यांचा २०१३ पासून मयत संजय खालकर,सुनील तुळशीराम खालकर,बाबासाहेब तुळशीराम खालकर यांच्यात चिंचोली रोड वरील जमिनीचा वाद होऊन त्यावरून अनेकवेळा मयतास व त्याचे भावास आरोपी ज्ञानदेव खालकर याने मारहाण केलेली होती.व अलीकडील काळात प्रतिवादी असलेल्या अशोक रामभाऊ खालकर यांचेशी संबंध ठेऊ लागला होता.त्यामुळे पोलीसांनीं संशय बळावल्याने या प्रकरणी आरोपी व फिर्यादी यांचे मोबाईल सी.डी.आर.तपासले असता घटनास्थळी मयत,साक्षिदार व आरोपी हे एका ठिकाणी आल्याचे आढळून आले असल्याने त्याला दुजोरा मिळाला होता.शिवाय मयताचा झालेला मृत्यू बाबतचा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालात त्या घटनेला दुजोरा मिळाला होता.व एकाच हत्याराने व मयत स्थिर असताना हा खून झाला असल्याचे निष्पन्न झाले होते.या घटनेतील फावडे अद्याप जप्त करावयाचे असल्याने त्यास न्यायालयापुढे आरोपीविरुद्ध सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती.दोन्ही बाजूचा युक्तिवाद एकूण अतिरिक्त मुख्य न्यायमूर्ती श्री डोईफोडे यांनी आरोपीस चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.दरम्यान या प्रकरणी आरोपी आपल्या वकीला मार्फत कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात या सुनावणी प्रकरणी अपिलात गेला होता.त्याची सुनावणी सोमवारी दि.८ मार्च रोजी संपन्न झाली होती.मात्र जिल्हा व सत्र न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता.तो काल सायंकाळी सात वाजे नंतर दिला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.यात न्यायालयाने त्याचा जामीनाचा अर्ज फेटाळला असल्याचे निष्पन्न झाले आहे.त्यामुळे आता या गुन्ह्याचा पूर्ण अहवाल येईपर्यंत तरी त्याच्या जामीनाचा प्रश्न निकालात निघाला आहे.त्यामुळे किमान दोन महिने आरोपीस पोलीस कोठडीत राहावे लागणार असल्याची माहिती विधी क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close