जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावची टाळेबंदीकडे वाटचाल!

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर व तालुक्यात शहरातील अनेक मान्यवरांना कोरोनाने गाठले असताना आज कोपरगाव तालुक्यात एकूण ७७ अँटीजन रॅपिड टेस्ट करण्यात आल्या असून त्यात ०६ रुग्ण बाधित तर नगर येथे तपासणीसाठी अन्य ४९ स्राव पाठवले आहे तर येथुन आलेल्या अहवालात ०० स्राव बाधित आले आहे.तर बाधित संख्येत खाजगी प्रयोग शाळेतील ०७ रुग्ण आढळले आहे असे एकूण १४ जण बाधित आले आहे.तर आधी भरती असलेल्या ०१ रुग्णांस उपचारानंतर सोडून दिले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी कृष्णा फुलसौन्दर यांनी दिली आहे.

नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा ६१ हजार ४१६ जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत ९२१ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील गत काही दिवसातील रुग्ण धरून ३८ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत काळात ग्रामीण भागात अधिक प्रमाणावर रुग्ण वाढ होत आहे.त्यामुळे आ.काळे यांनी उपाय योजनांसाठी नुकतीच तातडीची बैठक बोलावली होती.

दरम्यान कोपरगाव शहरात आज ०७ रुग्ण आढळले आहे.त्यात बँक रोड पुरुष वय-६१,गांधीनगर महिला वय-६५,सराफ बाजार तीन पुरुष वय-३३,०६,३३,महिला वय-०२,जिजामाता उद्यांपुरुष वय-३९ आदींचा समावेश आहे.

तर ग्रामीण भागात ०६ रुग्ण बाधित आढळले आहे त्यात धारणगाव येथील पुरुष रुग्ण वय-३५,तर दहिगाव बोलका पुरुष वय-२४,येसगाव येथील एक पुरुष रुग्ण वय-३८,महिला वय-३२,भोजडे येथील पुरुष वय-४९,महिला वय-५४,आदीं रुग्ण बाधित आढळले आहे.त्यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान आज कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ०२ हजार ३३९ इतकी झाली आहे.त्यात ८३ रुग्ण सक्रिय आहेत,तर आज पर्यंत ३८ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.६२ टक्के आहे.आतापर्यंत १५ हजार ५३८ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला ६२ हजार १५२ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर १५.०५ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या ०२ हजार २१८ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ९४.८२ टक्के झाला आहे.दरम्यान आज शहरी भागात रुग्ण कमी होण्याबरोबरच ग्रामीण भागात मात्र आज रुग्ण संख्या झपाट्याने वाढल्याचे दिसत आहे.तरी मात्र नागरिकांनी आगामी काळात प्रतिबंधात्मक उपायाबाबत अजून दक्षता घेतल्यास पूर्ण रुग्ण वाढ रोखता येईल असा विश्वास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी शेवटी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close