जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुकाशैक्षणिक

शिक्षक परिषदेच्या विविध मागण्या तहसिलदारांना सादर

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

सावळीविहीर-(प्रतिनिधी)

अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुका महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने राज्य कार्यकारिणीतील निर्णयानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन नुकतेच राहाता तहसीलदार कुंदन हिरे यांना देण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या राहाता तालुका. उपशाखेच्या वतीने कोविड-१९ संसर्ग आजाराची परिस्थिती लक्षात घेत प्रशासनाचे सर्व नियम अटी पाळून राहाता तहसिलदार यांना हे निवेदन सादर करण्यात आले आहे.

शासकीय सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांचा अपघाती,नैसर्गिक मृत्यू झाला त्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना दहा लाखांची विशेष आर्थिक मदत तातडीने मिळावी.सर्व जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांना त्रिस्तरीय वेतन श्रेणी सातव्या वेतन आयोगाप्रमाणे नवीन लाभाची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना (१०:२०:२०) वर्षे तात्काळ लागू करावी,विस्ताराधिकारी (शिक्षण) केंद्र प्रमुख पदे अभावितपणे शिक्षकांमधून तात्काळ भरावीत.राज्यातील सर्व शिक्षकांना कॅशलेस विमा योजना तात्काळ लागू करावी.आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

या निवेदनात राज्यातील सर्व डी सी पी एस धारकांना तात्काळ जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करण्यात यावी.१ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांचा अपघाती,नैसर्गिक मृत्यू झाला त्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना दहा लाखांची विशेष आर्थिक मदत तातडीने मिळावी.सर्व जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांना त्रिस्तरीय वेतन श्रेणी सातव्या वेतन आयोगाप्रमाणे नवीन लाभाची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना (१०:२०:२०) वर्षे तात्काळ लागू करावी,विस्ताराधिकारी (शिक्षण) केंद्र प्रमुख पदे अभावितपणे शिक्षकांमधून तात्काळ भरावीत.राज्यातील सर्व शिक्षकांना कॅशलेस विमा योजना तात्काळ लागू करावी.जिल्हा परिषद शाळांची विद्युत देयके शासनाने भरावीत कोविड-१९ साथरोग नियंत्रण कर्तव्य करत असताना ज्या शिक्षक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.अशा शिक्षकांच्या कुटुंबीयांना तातडीने पन्नास लाखाचे विमा संरक्षण मिळावे,सदरील पन्नास लक्ष रुपयांचे अनुदान रक्कम त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ अदा करावी,२७ फेब्रुवारीच्या जिल्हा अंतर्गत बदलीच्या शासन निर्णयानुसार जिल्हा अंतर्गत विनंती बदल्या प्रक्रिया सर्व जिल्हा परिषदांनी तात्काळ राबवावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
या निवेदनावर परिषदेचे तालुकाध्यक्ष दत्ता गायकवाड,जिल्हा सरचिटणीस दत्ता गमे,गुरुमाऊली मंडळ अध्यक्ष सुधाकर अंत्रे,जिल्हा प्रतिनिधी संजय वाघमारे,राजू बनसोडे,रामकीसन असावा,राजेंद्र थोरात,ज्योती पवार,सुलभा भोसले,विनोद तोरणे,सोमनाथ वैद्य,चंद्रकांत महाडुळे,शांताराम शेळके,मनोहर वहाडणे यांच्या सह्या आहेत. यावेळी तहसीलदार कुंदन हिरे यांनी आपल्या मागण्या शासनाला कळविण्यात येतील असे आश्वासन दिले आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close