आंदोलन
आकारी पडीत जमीन प्रश्न,प्रांत कार्यालयाला ठोकणार कुलूप !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
श्रीरामपूर येथील प्रांत कार्यालयासमोर आकारी पडीत जमिनी सोडविण्यासाठी सुरु असलेला लढा तीव्र होताना दिसत असून या आंदोलनात पाचव्या दिवशी उपोषणकर्ते बाळासाहेब आसने,अॅड.सर्जेराव घोडे यांनी अन्नत्याग केलेला असताना या आंदोलनाची कुठलीही दखल घेतलेली दिसत नसून आंदोलकांनी सोमवार दि.१८ मार्च रोजी दुपारी बारा वाजता श्रीरामपूर प्रांत कार्यालयास कुलूप ठोकण्याचा इशारा दिला असल्याने खळबळ उडाली आहे.

दरम्यान राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी १५ मार्च २०२४ रोजी दुपारी एक वाजेपर्यंत नगर दक्षिणचे दौरे केले परंतु पाच दिवस उलटूनही आकारी पडित संवेदनशील व प्रलंबित प्रश्नाबाबत सुरू असलेल्या आंदोलनास भेट दिलेली नाही हे विशेष ! या वरून ते या प्रश्नकडे किती गांभीर्याने पाहतात हे स्पष्ट झाले आहे.त्याबाबत आंदोलनकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव,मुठे वाडगाव,माळ वाडगाव,खानापूर,ब्राम्हणगाव वेताळ,शिरसगाव,उंदीरगाव,निमगाव,खैरी आदी ०९ गावांची जमीन गॅझेट क्रं.७८८४ दि.०१ ऑगष्ट १९१८ अन्वये जमीन सुधारणा करून शेतकऱ्यांना पुन्हा परत करण्याच्या उद्देशाने विना मोबदला भूसंपादन केली होती.व ती पुढे भंडारदरा धरण झाल्यावर बेलापूर सिंडिकेट कंपनीस सन-१९२० च्या करारानुसार सुपूर्त केली होती.मात्र सदर कंपनी अवसायनात गेल्याने ती ०७ हजार एकर जमीन बेलापूर कंपनीस वर्ग केली होती.ती पुढे सरकारने सदर शेतकऱ्यांना परत केलीच नाही त्या साठी आजतागायत शेतकऱ्यांचा लढा सुरु आहे.त्याची राज्यातील बोलघेवड्या सरकारने अद्याप दखल घेतलेली नाही.त्यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांच्या नेतृत्वाखाली येथील कार्यकर्ते,शेतकरी आदींनी आपले आंदोलन तीव्र केले आहे.

दरम्यान राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी १५ मार्च २०२४ रोजी दुपारी एक वाजेपर्यंत नगर दक्षिणचे दौरे केले परंतु पाच दिवस उलटूनही आकारी पडित संवेदनशील व प्रलंबित प्रश्नाबाबत सुरू असलेल्या आंदोलनास भेट दिलेली नाही हे विशेष ! या वरून ते या प्रश्नकडे किती गांभीर्याने पाहतात हे स्पष्ट झाले आहे.त्यामुळेच संतापलेल्या उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी थेट तहसीलदार मिलिंद वाघ यांना निवेदन दिले आहे.
दरम्यान याबाबत शुक्रवारी दुपारी तहसीलदार मिलिंद वाघ श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री देशमुख आदींनी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे,तालुका अध्यक्ष युवराज जगताप,शरद आसने, दादासाहेब आदिक,सोपान नाईक,साहेबराव चोरमल यांच्यासोबत दि.१६ रोजी तीन वाजेपासून लागू होत असलेल्या आचारसंहिते बाबत चर्चा केली आहे.त्यात तहसीलदार मिलिंद वाघ यांनी दि.१६ मार्च रोजी ३ वाजे नंतर आंदोलनास प्रशासकीय इमारतीमध्ये बसता येणार नाही असे सूचित केले आहे.यावरून उद्या तीन वाजे नंतर आम्ही आचारसंहिता भंग प्रकरणी आपणावर गुन्हे दाखल करण्यात येतील असे अप्रत्यक्ष बजावले असल्याची माहिती हाती आली आहे.
आकारी पडित संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने सांगितले की,”आमचे आंदोलन हे १२ तारखेपासून सुरू असून त्यास उद्या पाच दिवस होत आहे या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये शासनाने उपोषणकर्त्या शेतकऱ्यांना भेट देऊन अकारि पडित प्रश्न लेखी देऊन आश्वासित करून विश्वसार्हता दर्शविणे गरजेचे होते.मात्र त्याची प्रशासनाने दखल घेतलेली नाही.उलट आचारसंहितेच्या नावाखाली सदर आंदोलन दडपण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. सदर बाब खपवून घेतली जाणार नाही शेतकऱ्यांचा लढा न्याय मिळेल पर्यंत लढू असा निर्धार अकारिपडित संघर्ष समितीने केला.
यावेळी आंदोलनास सुरेश गलांडे विरेश गलांडे चंद्रकांत उंडे,बाळासाहेब पटारे,भरत असणे,राजेंद्र पाऊलबुध्दे, विजय आदिक,अॅड.विष्णूपंत ताके,शरद पवार,राजेंद्र आदिक,मालन झुरळे,सागर मुठे,विठ्ठलराव आसने,डॉ. बबनराव आदिक,बाळासाहेब पगारे,सदाभाऊ उघडे,वैभव आढाव आदींनी सहभाग नोंदवून पाठिंबा दिला आहे.
दरम्यान श्रीरामपूर तालुक्यातील प्रलंबित असलेल्या आकारिपडीत प्रश्न तालुक्यातील सर्वच सामाजिक राजकीय पक्षातील कार्यकर्त्यानी आपला सहभाग नोंदविला आहे.तरी शासनाने उद्या तीन वाजेच्या आत आंदोलनास संवेदनशील मार्गाने विचार करून आकारी पडीत प्रश्न सोडविण्यासाठी लेखी आश्वासित करावे असे आकारी पडीत संघर्ष समितीच्या वतीने आवाहन शेवटी केले आहे.