जाहिरात-9423439946
आंदोलन

…या प्रकल्प भूसंपादनाच्या मोबदल्यास ठेंगा !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)


   कोपरगाव मतदार संघाच्या पूर्व भागातून जाणाऱ्या नांदूर मध्यमेश्वर एक्स्प्रेस कालव्याच्या वितरिका आणि लघु वितरीकांसाठी तळेगाव मळे आदी गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत करण्यात आल्या मात्र खरेदीसह त्यांना अद्याप मोबदला मिळालेला नाही.त्याबाबत या शेतकऱ्यांनी नुकतीच आ.आशुतोष काळे यांची भेट घेवून त्यांच्यापुढे आपल्या मागण्या मांडल्या असता त्यांनी जमिनीचा मोबदला मिळवून देण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

नांदूर मध्यमेश्वर एक्स्प्रेस कालव्याच्या वितरिका आणि लघु वितरीकांची भरपाई मिळण्यासाठी शेतकरी शिष्टमंडळाने आ.काळे यांची घेतलेली भेट.
नांदूर मध्यमेश्वर एक्स्प्रेस कालव्याच्या वितरिका क्रमांक १ व वितरिका क्रमांक २ च्या वितरिका आणि लघु वितरीकांसाठी २००३ साली तब्बल २२ वर्षापूर्वी तळेगाव मळे गावातील शेतकऱ्यांच्या कालव्याच्या उजव्या बाजूने ६.३१ हेक्टर आर व ७८ आर असे एकूण ७.०९ हेक्टर जमीनी अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत.मात्र सदरच्या जमिनीची खरेदी न झाल्यामुळे त्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळालेला नाही.याबाबत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.


    कोपरगाव मतदार संघाच्या पूर्व भागातून जाणाऱ्या नांदूर मध्यमेश्वर एक्स्प्रेस कालव्याच्या वितरिका क्रमांक १ व वितरिका क्रमांक २ च्या वितरिका आणि लघु वितरीकांसाठी २००३ साली तब्बल २२ वर्षापूर्वी तळेगाव मळे गावातील शेतकऱ्यांच्या कालव्याच्या उजव्या बाजूने ६.३१ हेक्टर आर व ७८ आर असे एकूण ७.०९ हेक्टर जमीनी अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत.मात्र सदरच्या जमिनीची खरेदी न झाल्यामुळे त्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळालेला नाही.आजवर या शेतकऱ्यांनी अनेक वेळा पत्र व्यवहार करूनही जलसंपदा विभागाने त्यांना ठेंगा दाखवला होता.महाराष्ट्र शासनाच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने देखील राहीलेल्या भू-संपादनासाठी निधी मिळावा अशी मागणी केलेली आहे.फेब्रुवारी २०२४ मध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचे तात्कालीन जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ,प्रांताधिकारी माणिकराव आहेर,नांदूर मध्यमेश्वर एक्स्प्रेस कालव्याचे कार्यकारी अभियंता गुजरे यांच्या समवेत बैठक झाली होती.त्या बैठकीत प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या जमिनीचे मुल्यांकन निश्चित करण्यात आले होते. बाधित शेतकऱ्यांच्या जमिनी तीन महिन्याच्या आत सरळ खरेदी करून त्यांच्या मोबदल्याची रक्कम वितरीत करण्याचे आदेशही पाटबंधारे विभागाला मा.जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी दिले होते.परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी झाल्या नाहीत त्यामुळे खात्यात अद्याप मोबदल्याची रक्कम जमा झालेली नाही व शेतकरी मोबदल्यापासून वंचित असल्याचे बाधित शेतकऱ्यांनी आ.काळे यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

  सदर प्रसंगी कोपरगाव तालुका जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार तसेच प्रकल्पबाधित शेतकरी मंजाहारी टूपके,दिगंबर टूपके,नसीर सय्यद आदी उपस्थित होते.

    आ.काळे यांनी सर्व शेतकऱ्यांची सविस्तर माहिती जाणून घेवून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्यातून तुमचा प्रश्न मार्गी लावून जमिनीचा मोबदला लवकरात लवकर मिळवून देणार तसेच धोत्रे,घोयेगाव,तळेगाव आदी गावातील शेतकऱ्यांच्या जमिनींची मोजणी करून जमिनी अधिग्रहीत करण्यासाठी तातडीने कार्यवाही होवून त्यांनाही लवकरात लवकर मोबदला मिळावा यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close