जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

…’त्या’ पी.ए.च्या जामीन अर्जाचा झाला हा निर्णय!

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

   कोपरगाव शहराचे उपनगर असलेल्या मोहिनीराजनगर येथे शारदीय नवरात्र उत्सवात तीन गटात तुंबळ हाणामारीतील एकूण १८ जणांना अटक करण्यात आली होती.यातील फरार प्रमुख आरोपी अरुण जोशी,त्याचा भाऊ राजेंद्र जोशी व त्यांचा पुतण्या शुभम जोशी आदी तीन जण एक महिन्यापासून फरार असून त्यांची जामिनासाठी धावपळ सुरू आहे.मात्र त्यांनी अटक टाळण्यासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामिनासाठी अर्ज केला होता तो न्यायालयातून मागे घेण्याची नामुष्की ओढवली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यामुळे आता त्यांना कधीही अटक होऊ शकत असल्याचे माहिती उपलब्ध झाली आहे.

दरम्यान या गुन्ह्यात नवीन भारतीय न्याय संहिता कलम 132 व गंभीर मारहाण कलम 109 हे दाखल असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याने हे प्रकरण आ.आशुतोष काळे आणि त्यांच्या स्विय सहाय्यक आणि कंपनीला चांगलेच शेकले असल्याचे दिसत आहे.

   याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव शहरात मागील महिन्यात दि.२५ सप्टेंबर रोजी रात्री ११.१५ वाजेच्या सुमारास सत्ताधारी राष्ट्रवादीचे आ.काळे गट,मनसे विरूध्द शिवसेना (ऊ.बा.ठा.) गटात राहाता येथील इसमाने रस्त्यावरून गाडी घालण्याच्या कारणावरून दोन गटात तलवार,लोखंडी रॉड,क्रिकेटचे स्टंप,लाकडी काठ्या,दगड विटांनी तुंबळ हाणामारी होऊन त्यात यमानाजी सुंबे व द्यानेश्वर भांगरे आदी दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह विवेक राजेंद्र आव्हाड,गौरव सुनील मोरे,अविनाश नामदेव गीते,दत्तात्रय रंगनाथ पंडोरे,हिराबाई राजेंद्र आव्हाड तर दुसऱ्या गटातील सुनील योगेश गोर्डे,वनिता नारायण गोर्डे,अरुण बाजीराव जोशी,राजेंद्र बाजीराव जोशी,शुभम राजेंद्र जोशी आदी १० जण गंभीर जखमी झाले होते.यातील ४१ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता तर त्यानंतर सरकारी कामात अडथळा आणला प्रकरणी अन्य १९ आरोपीवर असे एकूण ६० हून अधिक आरोपींवर  गुन्हे दाखल करण्यात आले होते.या हाणामारीचे स्वरूप इतके गंभीर होते.या प्रकरणी पोलिसांवर हात उचलण्याने पोलिस अधिकाऱ्यांनी जोशी बंधूंना आपला विशेष चमत्कार दाखवला असल्याचे बोलले जात आहे.

  

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने त्यांना,”तुम्ही अर्ज काढून घेणार की,मला तो फेटाळावा लागेल” असा स्पष्ट भाषेत इशारा दिला होता.त्यावेळी त्यांनी उच्च न्यायालयात काही तासांचा वेळ मागून घेतला व मोठा खल केला होता व त्यानंतर काही वकील आणि आरोपी यांनी वेळाने तो अर्ज अखेर काढून घेण्याची नामुष्की ओढवली असल्याचे माहिती उपलब्ध झाली आहे.त्यामुळे अरुण जोशी आणि कंपनीला मोठी चपराक बसली असल्याची मानले जात आहे.त्यामुळे त्यांना आता कधीही अटक होऊ शकते.

   यातील काही आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाली होती तर काही आरोपी नाशिक रोड कारागृहात खास सरकारी पाहुणचार घेत होते.अशा 18 आरोपींना नुकताच म्हणजे 17 ऑक्टोंबर रोजी कोपरगाव येथील न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.यातील प्रमुख आणि जबाबदार पद असलेली व्यक्ती आ.आशुतोष काळे यांचे स्वीय सहाय्यक अरुण जोशी त्याचा भाऊ राजेंद्र जोशी आणि त्यांचा पुतण्या शुभम जोशी आदी तीन जणांनी आधी कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अटक पूर्व जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला होता.मात्र या गुन्ह्यात कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलिस कर्मचारी यांनाच मारहाण झाल्याने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली होती.त्यामुळे सदर नावे आरोपींच्या यादीतून काढण्यासाठी आ.आशुतोष  काळे यांनी मोठी यातायात करूनही स्विय सहाय्यक अरुण जोशी,राजेंद्र जोशी,शुभम जोशी आदींचे गुन्ह्यात आली होती.तरीही या आरोपींना अटकपूर्व जामीन मिळावा या साठी नाशिक येथील विशेष वकिलाची नेमणूक करून त्यांनी जिल्हा व सत्र न्यायालय येथे प्रयत्न केले होते.मात्र जिल्हा व सत्र  न्यायालयाने तो अटकपूर्व जामीन फेटाळला होता.त्यामुळे दिवाळी आधीच फटाके फुटले होते.ऐन कोपरगाव नगरपरिषद निवडणूक पूर्व हा अकाली शिमगा साजरा असल्याने आता मतदार याबाबत काय विचार करतात व आ.काळे विरोधक याचा कसा फायदा उचलणार हे लवकरच समजणार आहे.

   दरम्यान त्यानंतर त्यांनी संभाजीनगर येथे उच्च न्यायालयात अटक पूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.त्यासाठी एक ज्येष्ठ वकिलाची मदत घेऊन हा अटक पूर्व जामीन मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न दिवाळीच्या आदल्या दिवशी आणि ऐन दिवाळीच्या दिवशी केले होते.मात्र त्या ठिकाणी उच्च न्यायलयाने त्यांच्या दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून त्यांचा जामीन फेटाळला असल्याची माहिती हाती आली आहे.त्यावेळी न्यायालयाने त्यांना,”तुम्ही अर्ज काढून घेणार की,मला तो फेटाळावा लागेल” असा स्पष्ट भाषेत इशारा दिला होता.त्यावेळी त्यांनी उच्च न्यायालयात काही तासांचा वेळ मागून घेतला व मोठा खल केला होता.व त्यानंतर काही वकील आणि आरोपी यांनी वेळाने तो अर्ज अखेर काढून घेण्याची नामुष्की ओढवली असल्याचे माहिती उपलब्ध झाली आहे.त्यामुळे त्यांना मोठी चपराक बसली असल्याची मानले जात आहे.त्यामुळे अरुण जोशी,राजेंद्र जोशी,शुभम जोशी आदी तीन जणांना कधीही अटक होऊ शकत असल्याचे मानले जात आहे.मात्र ही बातमी होई पर्यंत त्यांना अटक झालेले नव्हती.या घटनाक्रमास कोपरगाव शहर पोलिसांनी दुजोरा दिला आहे.त्यामुळे या घटनेला एक महिना उलटत आला असताना त्यांना पोलिसांनी त्यांना मुद्दाम अटक केली नाही की मुद्दाम पळवत ठेवले आहे असा सवाल निर्माण झाला आहे.या घटनेतील अद्याप दहा आरोपी अटक होण्याची बाकी असल्याचे माहिती कोपरगाव शहर पोलिसांनी दिली आहे.

   दरम्यान या प्रकरणी अरुण जोशी यांचे वतीने ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.रमेश धोर्डे यांनी काम पाहिले होते तर अनिल आव्हाड यांचे वतीने ॲड.सपकाळ यांनी काम पाहिले आहे.तर सरकारच्या वतीने अड.डी.जे.पाटील यांनी काम पाहिले आहे.दरम्यान या प्रकरणात जिल्हा न्यायालयात त्या नंतर उच्च न्यायालयात या प्रकरणी लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या स्वीय सहाय्यकाचा खिसा या विधी खर्चावर मोठ्या प्रमाणावर गार झाला असल्याची माहिती आहे.

  दरम्यान या गुन्ह्यात सरकारी कामात अडथळा आणणे नवीन भारतीय न्याय संहिता कलम 132 व गंभीर मारहाण कलम 109 हे दाखल असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याने हे प्रकरण आ.आशुतोष काळे आणि त्यांच्या स्विय सहाय्यक आणि कंपनीला चांगलेच शेकले असल्याचे दिसत आहे.मात्र या प्रकरणाने शहरात गुन्हेगारी कमी होण्यास मोठी मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.

               ——————————

*पत्रकार नानासाहेब जवरे यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी ‘न्यूजसेवा‘ वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा*.

https://bit.ly/newsseva2025

*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close