जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगावात तरुणांची आत्महत्या,अकस्मात मृत्यूची नोंद

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील दत्तनगर या उपनगरातील रहिवासी असलेला तरुण राजू मुरलीधर कसाब (वय-३०) याने आपल्या घराच्या छताला सुती दोरीच्या सहाय्याने आज सकाळी आठ वाजेपुर्वी कधीतरी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली असल्याची खबर मयताचा भाऊ व कोपरगाव नगरपरिषदेचा सफाई कर्मचारी संजय मुरलीधर कसाब (वय-३९) यांनी दिल्याने कोपरंगाव शहरात खळबळ उडाली आहे.

देशात आणि राज्यात आता १५ ते २५ वर्षांमधील वयोगटांत आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे ही चिंतेची बाब आहे.या वयोगटात अभ्यासाचा ताण,परीक्षेत अपयश आणि प्रेमभंग ही तीन प्रमुख कारणे आहेत.आणखी एक म्हणजे जगाच्या तुलनेच भारतात स्त्रियांमधील आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे. सामाजिकदृष्टय़ा दुय्यम स्थान आणि हुंडाबळी ही दोन कारणे यासाठी सांगितली जातात.रागीट,आततायी,हट्टी,टोकाचा परफेक्शनिस्ट आणि अप्रगल्भ असलेल्या व्यक्तींमध्ये आत्महत्येची वृत्ती जास्त असते.अशीच दुर्दैवी घटना कोपरगाव शहरात घडली आहे.

देशात आणि राज्यात आता १५ ते २५ वर्षांमधील वयोगटांत आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे ही चिंतेची बाब आहे.या वयोगटात अभ्यासाचा ताण,परीक्षेत अपयश आणि प्रेमभंग ही तीन प्रमुख कारणे आहेत.आणखी एक म्हणजे जगाच्या तुलनेच भारतात स्त्रियांमधील आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे. सामाजिकदृष्टय़ा दुय्यम स्थान आणि हुंडाबळी ही दोन कारणे यासाठी सांगितली जातात.रागीट,आततायी,हट्टी,टोकाचा परफेक्शनिस्ट आणि अप्रगल्भ असलेल्या व्यक्तींमध्ये आत्महत्येची वृत्ती जास्त असते.मानसिक आजारांमध्येही आत्महत्या घडू शकते.याचे सर्वात जास्त प्रमाण नैराश्यात असते.अशीच घटना कोपरगाव शहरातील दत्तनगर भागात आज सकाळी आठ वाजे पूर्वी घडली आहे.

मयताचा भाऊ संजय कसाब यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात याबाबत खबर दिली असून त्यात म्हटले आहे की,आपला भाऊ राजू कसाब याने आपल्या राहत्या घरात सकाळी आठ वाजेपुर्वी लोखंडी पाईपला सुती दोरीच्या साहाय्याने आत्महत्या केली आहे.मात्र याचे कारण समजू शकले नाही.या प्रकरणी नजीकच्या नातेवाईकांनी उपचारार्थ कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यानी त्यास मृत घोषित केले आहे.सदर ठिकाणी तरुणांचा मोठा घोळका आढळून आला आहे.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान आज सकाळी सदर मयत इसम हा सुस्थितीत होता.मात्र त्याला एक अज्ञात दूरध्वनी आल्याने त्याचे वैचारिक सूत्र बिघडल्याने समजते त्या नंतर काही मिनीटात त्याने आपली जीवन यात्रा संपवल्याची माहिती आहे.त्याच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते.तर त्याची दोन मुले सासुरवाडीस होते.त्याच्या पच्छात आई वडील,दोन मुले,भाऊ असा परिवार आहे.त्याच्यावर कोपरगाव वैकुंठ भूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.०७/२०२१ अकस्मात मृत्यू रजिस्टर सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली आहे.घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे,पोलीस नाईक कोरेकर यांनी भेट दिली आहे.

या प्रकरणी पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बी.एस.कोरेकर हे करित आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close