जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात कोरोना वाढ थांबेना

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर व तालुक्यात काल २५ रुग्ण वाढीचा उच्चान्क वाढला असताना आज कोपरगाव तालुक्यात एकूण ५४ अँटीजन रॅपिड टेस्ट करण्यात आल्या असून त्यात ११ रुग्ण बाधित निघाले तर नगर येथील ११ अँटीजन रॅपिड टेस्ट मध्ये तपासणीत ६ तर खाजगी प्रयोग शाळेत ३ असे एकूण २० बाधित रुग्ण आढळले असून १७ संशयित रुग्णांना घरी सोडून दिले आहे. तपासणीत तर ४२ जण निरंक निघाल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी कृष्णा फुलसौन्दर यांनी दिली आहे.या खेरीज नगर येथे आज ५७ स्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा २२ हजार ४१५ वर जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत ३१० जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील १८ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत काही दिवसात अनेक प्रमुख मान्यवरांना आपले प्राण गमवावे लागले आहे. सलग प्रतिदिन मृत्यूची नोंद वाढत चालली आहे.त्यामुळे नागरिकांची चिंता वाढत चालली आहे.

आज आलेल्या यादीत शहरात बाधित रुग्णांची संख्या १९ तर ग्रामीण भागात ०१ असे वीस रुग्ण बाधित निघाले असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.दरम्यान आज आलेल्या बाधित रुग्णांत शहरात शिवाजी रोड एक पुरुष वय-७२,शिवाजीनगर पुरुष वय-६३,महिला वय-४८,धारणगाव रोड २ पुरुष वय-३२,५६, तर एक महिला वय-३५,लक्ष्मीनगर येथील पुरुष वय-५०,गोदाम गल्ली पुरुष वय-३५,जैन मंदिर पुरुष वय-१३,टाकळी नाका महिला वय-४५,भगवती कॉलनी पुरुष वय-५८,श्रद्धानगरी बालिका वय-०६,दत्तनगर येथील महिला वय-१८,टिळक नगर पुरुष वय-५५,महिला वय-२१,गांधीनगर पुरुष वय-२०,महिला-वय-४०,वाणी सोसायटी पुरुष वय-७२,तर महिला वय-४६,तर ग्रामीण भागात सुरेगाव येथे बालिका वय-१२ असे वीस जण बाधित निघाले आहे.

दरम्यान आज कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ९७० इतकी झाली आहे.त्यात १६२ रुग्ण सक्रिय आहेत,तर आज पर्यंत १८ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.८५ टक्के आहे.आतापर्यंत ०४ हजार ३९३ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला १७ हजार ५७२ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर २२.०८ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या ७९० इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ८१.४४ टक्के झाला आहे.दरम्यान या आकडेवारीमुळे नागरिकांत पुन्हा एकदा भीती निर्माण झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close