दळणवळण
…या तालुक्यात सुमारे २५ कोटीची कामे मंजूर !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील दळणवळणासाठी महत्वाच्या नऊ रस्त्यांच्या कामाच्या २४.८४ कोटीच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे मतदार संघातील इतर रस्त्यांप्रमाणे या नऊ रस्त्यांचे देखील भाग्य उजळणार असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

दरम्यान या रस्त्यात नैऋत्येकडील दुष्काळी तेरा गावातील महत्वाच्या रस्त्यांचा मात्र त्यात समावेश नसल्याने या भागातीलजवळके,धोंडेवाडी,अंजनापूर,बहादरपूर,रांजणगाव देशमुख,काकडी,मनेगाव,वेस सोयगाव आदी ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कोपरगाव तालुक्यातील विविध रस्त्याच्या कामाचा मोठा अनुशेष निर्माण झाला आहे.त्यामुळे तालुक्यातील रस्यासाठी मोठ्या निधीची गरज आहे.त्यासाठी तालुक्याचे आ.आशुतोष काळे यांनी निधी आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून त्या मोहिमेअंतर्गत त्यांनी रा.मा.७ ते धामोरी,बोलका,खोपडी रस्ता (प्रजिमा ४) मध्ये बोलकी करंजी रस्त्यामध्ये सुधारणा करणे.(२.६४ कोटी),रा.मा. ७ ते माहेगाव देशमुख रस्ता (ग्रा.मा.३०) मध्ये सुधारणा करणे (१.११ कोटी),नाशिक जिल्हा हद्द ते रा.मा. ६५ पोहेगाव,सावळीविहीर रस्ता (प्रजिमा ९८) मध्ये सोनेवाडी ते तालुका हद्द रस्ता सुधारणा करणे.(२.२८ कोटी,) रा.मा. ७ ते धामोरी ब्राह्मणगाव,पढेगाव, बोलका,खोपडी रस्ता (प्रजिमा ४) मध्ये दहेगाव ते लौकी रस्त्यामध्ये सुधारणा करणे (२.२६ कोटी),तोलारखिंड,कोतूळ,वैजापूर रस्ता (रा.मा. ६५) मध्ये शिरसगाव ते उक्कडगाव रस्त्यामध्ये सुधारणा करणे.(३.८९ कोटी), रा.म.मा.८ ते सावळीविहीर,वारी औरंगाबाद जिल्हा हद्द रस्ता (प्रजिमा२०३) मध्ये सडे बारहाते वस्ती ते वारी रस्ता सुधारणा करणे. (३.७१ कोटी),अंचलगाव,ओगदी,शिरसगाव रस्ता (प्रजिमा १३) मध्ये ओगदी ते शिरसगाव रस्त्यामध्ये सुधारणा करणे.(२.९७ कोटी), प्रजिमा ४ ते ब्राह्मणगाव,टाकळी,कोपरगाव, कोकमठाण,सडे,शिंगवे रस्ता (प्रजिमा ९९) मध्ये कोकमठाण ते सड़े रस्त्यामध्ये सुधारणा करणे (२.९९ कोटी), प्रजिमा ४ ते ब्राह्मणगाव,टाकळी,कोपरगाव,कोकमठाण,सडे,शिंगवे रस्ता (प्रजिमा ९९) मध्ये ब्राह्मणगाव ते खडकी (जुना टाकळी नाका) रस्त्यामध्ये सुधारणा करणे (२.९९ कोटी) या रस्त्यांचा समावेश असून लवकरच हे रस्ते चकाचक होणार असल्याचा दावा केला आहे.
दरम्यान या रस्त्यात नैऋत्येकडील दुष्काळी तेरा गावातील महत्वाच्या रस्त्यांचा मात्र त्यात समावेश नसल्याने या भागातील जवळके,धोंडेवाडी,अंजनापूर,बहादरपूर,रांजणगाव देशमुख,काकडी,मनेगाव,वेस सोयगाव आदी ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.