नगर जिल्हा
महाआघाडी सरकार शेतकरी हिताचे-आ.काळे
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा कारभार चांगला झाला असून बाजार समित्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी शेतकऱ्यांच्या फायद्याचे निर्णय तातडीने घेतले जात असून राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीने असे निर्णय घेवून शेतकरी,व्यापारी,हमाल,मापारी आदी घटकांचे हित साधतांना चांगली कामगिरी केली असून या समितीचा कार्यभार चांगला असल्याचा दावा कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी केला आहे.
राहुरीचे व्यवस्थापन चांगले असून शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे वेळेवर देयके मिळतात.शेतमालाची घेवाण घेवाण लक्षवेधी आहे. हमाल मापाडी यांच्या समस्या नाहीत.हि बाजार समिती समृद्ध आहे-आ.काळे
आ.आशुतोष काळे यांनी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीला सदिच्छा भेट दिली.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य,व्यापारी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी त्यांनी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीने राबविलेल्या उपाय योजनांचा त्यांनी आढावा घेतला.शेतकरी,व्यापारी,हमाल,मापाडी यांचा कसा फायदा होत आहे याबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली.राहुरीचे व्यवस्थापन चांगले असून शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे वेळेवर देयके मिळतात.शेतमालाची घेवाण घेवाण व्यवस्थित आहे. हमाल मापाडी यांच्या समस्या नाहीत.एकूणच समृद्ध अशी कृषी उत्पन्न बाजार समिती असल्याचे आ.काळे यांनी म्हटले आहे.राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीप्रमाणे राबविलेल्या उपाय योजनांप्रमाणे कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने देखील अशा प्रकारच्या उपाय योजना राबविल्यास सर्वच घटकांना त्याचा फायदा मिळू शकतो. त्यासाठी यापुढील काळात कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीप्रमाणे शेतकरी, व्यापारी,हमाल,मापाडी यांचे दृष्टीने काही योजना राबविल्यास निश्चितपणे फायदा होईल असे आ.काळे यांनी शेवटी म्हटले आहे.