गुन्हे विषयक
कोपरगावात कत्तलीसाठी जाणारा मोठा गोवंश जातीचा साठा जप्त

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल सायंकाळी ०६.२५ वाजेच्या सुमारास संजयनगर येथील अपना बेकरी कार्यालयाजवळ अवैध रित्या गोवंश जनावरे कत्तलीसाठी आपल्या ताब्यातील ठेवत असताना आरोपी मुजाकिर कुरेशी (वय-२२)(पूर्ण नाव उपलब्ध नाही) रा.संजयनगर व दुसरा आरोपी चम्मू हुसेन (वय-१९) रा.संजयनगर हे दोघे आढळून आले असून त्यांची एकूण किंमत ०२ लाख ५९ हजार रुपये असून त्यात १९ मोठ्या गायी व चार लहान वासरे असे १९ गोवंश जातीचे २३ जनावरांचा समावेश आहे.कोपरगाव शहर पोलिसानी या आरोपी विरुद्ध फिर्यादी पो.कॉ.रामकृष्ण गोरख खारतोडे (वय-३२) यांचे मार्फत गुन्हा दाखल केला आहे.तथापी घटना स्थळावरून आरोपी फरार झाले आहे.त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
सन-२०१४ मध्ये पुन्हा भाजप-शिवसेनेचे सरकार आले आणि केंद्राकडे पडून असलेल्या कायद्याचा पाठपुरावा सुरू झाला.अखेर तब्बल १९ वर्षांनी राष्ट्रपतींनी त्या कायद्यावर मान्यतेची मोहोर उमटवली.१९७६ च्या व आता अस्तित्वात आलेल्या कायद्यामध्ये काही मूलभूत बदल करण्यात आले आहेत.आधीच्या कायद्यात गाईच्या हत्येला प्रतिबंध करण्यात आला होता.या कायद्यात गाईबरोबर बैलाचा व वळूचा समावेश करण्यात आला.म्हणजे गोवंश हत्याबंदी करण्यात आली. मात्र हा कायद्याचे उल्लंघन वारंवार होताना दिसत आहे.
१९९५ मध्ये युती सरकारने विधिमंडळात प्राणिरक्षण सुधारणा विधेयक मंजूर करून घेतले.१९९६ मध्ये ते राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आले.पुढे राज्यात सत्ताबदल झाला,केंद्रातही राजकीय परिवर्तन झाले आणि हा कायदा काहीसा विस्मृतीच्या पडद्याआड गेला.परंतु २०१४ मध्ये पुन्हा भाजप-शिवसेनेचे सरकार आले आणि केंद्राकडे पडून असलेल्या कायद्याचा पाठपुरावा सुरू झाला.अखेर तब्बल १९ वर्षांनी राष्ट्रपतींनी त्या कायद्यावर मान्यतेची मोहोर उमटवली.१९७६ च्या व आता अस्तित्वात आलेल्या कायद्यामध्ये काही मूलभूत बदल करण्यात आले आहेत.आधीच्या कायद्यात गाईच्या हत्येला प्रतिबंध करण्यात आला होता.या कायद्यात गाईबरोबर बैलाचा व वळूचा समावेश करण्यात आला.म्हणजे गोवंश हत्याबंदी करण्यात आली.हा कायदा एवढय़ावरच थांबत नाही,तर आणखी काही कडक व कठोर र्निबध लादले आहेत.गाय,बैल,वळू यांची कत्तल करता येणार नाही,त्या हेतूने त्यांची खरेदी,विक्री करता येणार नाही,विल्हेवाट लावता येणार नाही.गाय,बैल,वळू यांचे मांस स्वत:च्या ताब्यात ठेवता येणार नाही.बाहेरील राज्यात कत्तल केलेली गाय,बैल,वळू यांचे मांस स्वत:च्या ताब्यात ठेवता येणार नाही.म्हणजेच एक प्रकारे गाय,बैल,वळू यांचे मांस सेवन करण्यासच प्रतिबंध करण्यात आला आहे.यापैकी कोणत्याही तरतुदीचे उल्लंघन केल्यास पाच वर्षांचा तुरुंगवास आणि दहा हजार रुपयांच्या दंडाच्या शिक्षेची तरतूद कायद्यात आहे.हा गुन्हा दखलपात्र आणि अजामीनपात्र ठरविण्यात आला असतानाही राज्यात सर्रास या प्राण्यांची कत्तल सुरु आहे.कोपरगाव तालुकाही त्याला अपवाद नाही.
कोपरगावात गत दोन वर्षांपूर्वी ऐन शिवरात्रीच्या दिवशी नगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी मोठी धाड टाकून संजयनगर येथील मोठे गोवंश हत्तेचे रॅकेट उघड केले होते.त्या नंतरही त्याचे वारंवार उल्लंघन होताना दिसत आहे.स्वतंत्र कत्तलखाना उभारूनही त्याचा उपयोग केला जात नाही,स्वतः नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी या बाबी वारंवार उघड करूनही त्याला पोलिसांना थांबवता आले नाही.कालही अशीच घटना उघड झाली असून त्यात मोठे घबाड सापडले आहे.गुप्त खबऱ्या मार्फत पोलिसांना खबर मिळाल्यावर पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा लावला असता त्या ठिकाणी हे सावज अलगत त्यांचा ताब्यात मिळाले आहे.त्यात १९ मोठ्या गायी व ०४ लहान वासरे असे एकूण २३ गोवंश जनावरे जप्त केले आहे.त्यांची बाजारातील आजची किंमत ०२ लाख ५९ हजार इतकी मोठी आहे.शहर पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचेसह पोलीस उपनिरीक्षक भरत दाते,पो.हे .कॉ.डी.आर.तिकोणे यांनी भेट दिली आहे.
या प्रकरणी आरोपी मुजाकिर कुरेशी व चम्मू हुसेन या दोघांवर कोपरगाव शहर पोलिसानी आपल्या दप्तरी गु.क्रं.२९८/२०२१ भा.द.वि.कलम ४२९,भारताच्या प्राण्यास निर्दयपणे वागविण्याचा अधिनियम १९६० चे कलम (ह)व महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा व सुधारणा अधिनियम १९९५ चे कलम ५(ब) ९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.डी.आर.तिकोणे हे करीत आहेत.