विशेष दिन
भारताची शिक्षण पद्धती जगात श्रेष्ठ असल्याचे प्रतिपादन- माजी कुलगुरू

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
भारताची शिक्षण पद्धती जगात उच्च व श्रेष्ठ प्रकारची असून विद्यार्थी विकसित होण्याचा मार्ग शिक्षण व्यवस्थेतूनच जात असल्याचे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.सर्जेराव निमसे यांनी नुकतेच कोपरगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“आदर्श शिक्षक हाच असतो जो विद्यार्थ्यांना आदर्श घडवतो.प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये व्यवसायाबद्दल अभिमान निर्माण करण्याचे कार्य शिक्षकच करत असतात.पूर्वीपेक्षा आजची शिक्षण व्यवस्था चांगली असली तरी शिक्षकांनी आपल्या पेशाची प्रतिष्ठा जपली पाहिजे”-ओमप्रकाश कोयटे,अध्यक्ष राज्य पतसंस्था फेडरेशन.
भारतीय संस्कृतीत आईनंतर सर्वांत महत्त्वाचे स्थान आहे ते गुरुला.आई जशी मुलांवर संस्कार करते, तसा गुरु हा मुलांना घडवण्याचे, त्यांना सक्षम करण्याचे काम गुरु करतो. जीवनाला दिशा देण्यात आणि आपली जडणघडण करण्यात गुरुचा वाटा खूप मोठा असतो.त्यामुळे शिक्षक दिनाला भारतीय संस्कृतीत अधिक महत्त्व असल्याचे ओळखून
समता चॅरिटेबल ट्रस्ट व कोपरगाव जेष्ठ नागरिक सेवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिन समता पतसंस्थेच्या समता सहकार सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला.
त्या वेळी ते बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश कोयटे होते.

सदर प्रसंगी जेष्ठ नागरिक सेवा मंचाचे अध्यक्ष सुधाभाभी ठोळे,उपाध्यक्ष दत्तात्रय कंगले,कार्याध्यक्ष विजय बंब,सचिव उत्तमभाई शहा,आश्विन व्यास,लेखिका शैलेजा रोहोम यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”आदर्श शिक्षक हाच असतो जो विद्यार्थ्यांना आदर्श घडवतो.प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये व्यवसायाबद्दल अभिमान निर्माण करण्याचे कार्य शिक्षकच करत असतात.पूर्वीपेक्षा आजची शिक्षण व्यवस्था चांगली असली तरी शिक्षकांनी आपल्या पेशाची प्रतिष्ठा जपली पाहिजे.शिक्षकच विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक कुतूहल निर्माण करून त्यांना योग्य मार्गदर्शन करत असतो.आज ए.आय.चे युग आले असेल तरी मानवी मूल्ये शिक्षकच जपू शकतात”असेही ते शेवटी म्हणाले आहे.
यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना कोयटे म्हणाले की,”शिक्षक हा समाजाचा खरा शिल्पकार आहे.पालक मुलांना जन्म देतात,पण त्यांना संस्कार,ज्ञान व जगण्याची दिशा देण्याचे काम शिक्षक करतात.म्हणूनच शिक्षकांचे समाजात स्थान श्रेष्ठ आहे.आज समाज बदलत आहे,तंत्रज्ञान वेगाने वाढत आहे,पण खरे परिवर्तन हे शिक्षकच घडवू शकतात.विद्यार्थी जर घडले तर देश आपोआप उज्वल होईल.समता पतसंस्थेच्या माध्यमातून आम्ही नेहमीच सामाजिक क्षेत्रात काम करतो आणि शिक्षकांचा सन्मान हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले आहे.
सदर प्रसंगी प्रास्ताविक जेष्ठ महिला समिती अध्यक्षा रजनीताई गुजराथी यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समता इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य समीर अत्तार यांनी केले.या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी समताचे कोपरगाव शाखाधिकारी योगेश मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.उपस्थितांचे आभार समता पतसंस्थेचे ठेव विभाग प्रमुख संजय पारखे यांनी मानले आहे.