जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कृषी विभाग

पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

अहिल्यानगर,(प्रतिनिधी)


   कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन २०२४ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी,गहू,हरभरा,करडई व जवस या पिकांसाठी आयोजित पीक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत अर्ज करता येतील.जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे,असे आवाहन कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) रफिक नाईकवाडी यांनी केले आहे.

अर्जासोबत विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन,७/१२,८-अ चा उतारा,जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), स्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा आदी कागदपत्रे जोडावी.



   राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते.अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येते.

स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र सर्वसाधारणगटासाठी रक्कम रु.३०० व आदिवासी गटासाठी रक्कम रु.१५० असेल.स्पर्धेत भाग घेण्यासाठी  शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वत: कसत असणे आवश्यक आहे.स्पर्धेत भाग घेणाऱ्या  शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल.

पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेणाऱ्या शेतकऱ्याच्या स्वत:च्या शेतावर त्या पिकाखाली किमान ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.पीक स्पर्धा तालुका,जिल्हा व राज्यपातळीवर राबविण्यात येत आहे.

सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी  तालुका पातळीवर ५ हजार,३ हजार व २ हजार रुपये असे अनुक्रमे पहिले,दुसरे व तिसरे बक्षीस असेल.जिल्हा पातळीवर १० हजार,७ हजार व ५ हजार रुपये तर राज्यपातळीवर प्रथम ५० हजार द्वितीय ४० हजार तसेच तृतीय ३० हजार रुपये बक्षीस असेल.

या योजनेबाबत अधिक माहितीसाठी कृषी विभाग,महाराष्ट्र राज्य,संकेतस्थळ-www.krishi.maharashtra.gov.in किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा,असे आवाहनही श्री.नाईकवाडी यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close