जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पुरस्कार,गौरव

…या पोलीस अधिकाऱ्यास ‘राष्ट्रपती पदक’ जाहीर !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयांतर्गत येणाऱ्या विभागातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय सेवांसाठी विविध पदके जाहीर केली आहेत.पोलिस दलातील अधिकारी,कर्मचाऱ्यांनादेखील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे ‘राष्ट्रपती पदक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.वर्तमानात हिंगोली येथील लाचलुचपत विभागातील पोलीस उपअधीक्षक अनिल कटके यांना अ.नगर गुन्हे शाखेत कार्यरत असताना कार्यगौरव म्हणून हा पुरस्कार जाहीर झाला आहे.त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोपरगावात काम करत असताना त्यांची पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी जिल्हा गुन्हे शाखा येथे नियुक्ती केली होती.
दरम्यान त्यांनी तीन वर्षाच्या कालखंडात संवत्सर येथील दरोड्यातील आरोपी चोवीस तासात जेरबंद केले होते.तर आपेगाव येथील वस्तीवर वृद्ध शेतकरी दांपत्याची हत्या झाली होती.त्यात त्यांनी आरोपी शोधून मोठी कामगिरी बजावली होती.या निमित्ताने त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले आहे.त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अनिल कटके हे शिरूर तालुक्यातील गोलेगाव येथील सुपुत्र आहेत.ते सन-१९९६च्या तुकडीचे फौजदार आहेत.त्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठातून कृषी विज्ञान यातून एम.एस्सी. हि पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.त्यांची त्याच वर्षी राज्य लोकसेवा आयोगातून ‘पोलीस उपनिरीक्षक’ पदावर नियुक्ती झाली होती.आपल्या प्रशिक्षणानंतर त्यांनी जवळपास १८ वर्ष मुंबई पोलीस दलात उपनिरीक्षक पदावर कार्य केले आहे.

दरम्यान त्यात मलबार हील,अग्नीपाडा,नागपाडा,ताडदेव,भायखळा,चेंबूर,गुन्हे शाखा व दहशतवाद विरोधी पथकात त्यांनी काम केले आहे.त्यानंतर यांची नियुक्ती नंदुरबार शहर,अक्कलकुवा आदी ठीकाणी काम केल्यावर त्यांची नियुक्ती सन-२०१७ साली नगर जिल्ह्यात आश्वी,शिर्डी,कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात झाली होती.कोपरगाव तालुक्यात काम करताना त्यांनी गुन्हेगारी दराचा आलेख मोठया प्रमाणावर कमी केला होता.कोपरगावात काम करत असताना त्यांची पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी जिल्हा गुन्हे शाखा येथे नियुक्ती केली होती.


दरम्यान त्यांनी तीन वर्षाच्या कालखंडात संवत्सर येथील दरोड्यातील आरोपी चोवीस तासात जेरबंद केले होते.तर आपेगाव येथील वस्तीवर वृद्ध शेतकरी दांपत्याची हत्या झाली होती.त्यात त्यांनी आरोपी शोधून मोठी कामगिरी बजावली होती.त्यानंतर त्यांची जळगाव येथे व त्यानंतर हिंगोली येथे बदली झाली आहे.वर्तमानात ते लाचलुचपत विभागात उपअधीक्षक या पदावर कार्यरत आहेत.त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल नगर जिल्ह्यासह पुणे,हिंगोली,नंदुरबार,जळगाव आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close