जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

…. या शहरात विविध विकास कामांचे भूमिपूजन!

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  कोपरगाव शहरात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणी प्रश्न मार्गी लागलेला नव्हता.तो प्रश्न आता सुटल्यात जमा आहे.रस्त्यांचा प्रश्न देखील मार्गी लागणार असून आगामी काळात आणखी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणून कोपरगाव शहर विकासाच्या बाबतीत अव्वल करायचे आहे असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी नाशिक येथे काही दिवसापूर्वी दिली आहे.त्यामुळे सर्वच पक्षांचे राजकीय नेते,कार्यकर्ते आदींचे कान वर झाले आहे तर अधिकारी,स्थानिक स्वराज्य संस्थाचे कर्मचारी कामाला लागले आहेत.यां नियोजनासाठी सर्वत्र ढोल आणि रणशिंग वाजू लागले असून घोडे,नाल,तंग,तोबरा होऊन “जागते रहो…! “ची हाळी झाली आहे.

  

  यासुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.त्यात राज्यातील स्थानिक संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर म्हणजेच ऑक्टोबर अखेरीस प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी नाशिक येथे काही दिवसापूर्वी दिली आहे.त्यामुळे सर्वच पक्षांचे राजकीय नेते,कार्यकर्ते आदींचे कान वर झाले आहे तर अधिकारी,स्थानिक स्वराज्य संस्थाचे कर्मचारी कामाला लागले आहेत.यां नियोजनासाठी सर्वत्र ढोल आणि रणशिंग वाजू लागले असून घोडे,नाल,तंग,तोबरा होऊन “जागते रहो…! “ची हाळी झाली आहे.त्यामुळे उद्घघाटने,भूमीपुजणे आदींना राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थात ऊत आला आहे. कोपरगाव शहरही त्याला अपवाद नाही.कोपरगाव शहरात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान (जिल्हास्तरीय) योजने अंतर्गत प्रभाग क्र. ११ मध्ये २६ लाख ९८ हजार रुपये निधीतून शिवा पंडोरे घर ते नाना चहावाले घर भूमिगत गटार करणे,अक्षय आंग्रे घराजवळ पेव्हिंग ब्लॉक बसविणे,राज टी हाऊस ते बल्लाळेश्वर मंदिर पेव्हिंग ब्लॉक बसविणे,राज टी हाऊस ते रशीद शेख वकील पेव्हिंग ब्लॉक बसविणे तसेच नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसुचित विशिष्ट नागरी सेवा सुविधा पुरविणे योजने अंतर्गत प्रभाग क्र. १० मध्ये ५९ लाख ९५ हजार रुपये निधीतून वाघ घर ते कन्या शाळा रस्ता व अंतर्गत रस्ता करणे आदी जवळपास ८७ लाखांच्या विकासकामांचा भूमिपूजन समारंभ नुकताच त्यांच्या हस्ते पार पडला याप्रसंगी ते बोलत होते.

सदर प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आजी-माजी नगरसेवक कार्यकर्ते व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की,” शहरातील पाणीपुरवठा,रस्ते,गटारी आणि इतर नागरी मूलभूत सुविधांच्या उभारणीसाठी सर्व विकासकामांना गती देणार आहे.शहरातील बहुतांश मुख्य रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत परंतु प्रत्येक प्रभागातील रस्त्यांची कामे पूर्ण करायची आहेत.त्या अनुषंगाने ही कामे हाती घेण्यात आली आहेत.कामे पूर्ण झाल्यानंतर नागरीकांच्या कित्येक वर्षापासूनच्या अडचणी कायमच्या दूर होणार आहेत.कोपरगाव शहराच्या विकासाला गती देण्याचा माझा संकल्प आहे.मागील काही वर्षांपासून पाणी प्रश्नाप्रमाणे प्रलंबित असलेली अनेक महत्वाची कामे यापुढील काळात निश्चितपणे मार्गी लागणार असल्याचे त्यांनी शेवटी म्हटले आहे.
  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close