जाहिरात-9423439946
धार्मिक

..या गावात मूर्ती स्थापना वर्धापन दिन होणार साजरा

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

वाकडी-(प्रतिनिधी)

राज्य सरकारने नुकताच मंदिरे खुले करण्याचा निर्णय घेतला असून त्याचे वराहाता तालुक्यातील वाकडी येथील भाविकांनी स्वागत केले आहे.व या वर्षीचा खंडोबाची वाकडी येथील खंडेराय मूर्ती स्थापना वर्धापन सोहळा यावर्षी सायंकाळी न करता सकाळी आठ ते अकरा मर्यादित वेळेत संपन्न होणार आहे.

कोरोना साथीच्या आजारामुळे या वर्षीचा खंडोबा मूर्तीचा हा वर्धापन सोहळा रद्द केला होता. मात्र महाराष्ट्र सरकारच्या नुकत्याच झालेल्या निर्णया नुसार सोमवार पासून मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतल्याने या निर्णयाचा नागरिक व भाविक भक्त यांनी जोरदार स्वागत केले आहे.

कोरोना साथीच्या आजारामुळे या वर्षीचा खंडोबा मूर्तीचा हा वर्धापन सोहळा रद्द केला होता. मात्र महाराष्ट्र सरकारच्या नुकत्याच झालेल्या निर्णया नुसार सोमवार पासून मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतल्याने या निर्णयाचा नागरिक व भाविक भक्त यांनी जोरदार स्वागत केले आहे.व त्यामुळे हा सोहळा आता संपन्न होणार आहे. त्यामुळे वाकडी येथील तिसावा खंडोबा मूर्ती वर्धापन (भाऊबीज उत्सव) उत्सव सोमवार सोळा नोव्हेंबर रोजी सायंकाळ ऐवजी सकाळी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वाकडी येथील खंडेराय मंदिर मधील मूर्ती स्थापना वर्धापन सोहळा येथील रामनाथ बाबा कोते यांच्या संकल्पनेतुन दरवर्षी मोठया उत्साहात साजरा होत असतो.यावेळी हा उत्सव सायंकाळ ऐवजी सकाळी मर्यादित वेळेत होणार असल्यामुळे येणाऱ्या भाविकांनी तोंडाला मुखपट्या वापरून व सुरक्षित अंतर ठेऊन घट स्थापना करावी असे आवाहन दत्तात्रय रामनाथ कोते,खंडेराय देवस्थान ट्रस्ट,वाकडी ग्रामपंचायत सरपंच डॉ संपतराव शेळके,कोरोना समिती,भाऊबीज मित्र मंडळ,जय मल्हार प्रेस क्लब व वाकडी ग्रामस्थ यांच्याकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close