जाहिरात-9423439946
कृषी विभाग

केंद्राकडून शेतकऱ्याच्या माथी अन्यायकारक कायदे-टीका

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना महात्मा फुले कृषी कर्ज माफी,अतिवृष्टी अनुदान,रखडलेले ठिबकचे अनुदान देऊन कोरोनाच्या संकटात देखील शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला.दुसरीकडे केंद्र सरकारकडून मात्र शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे अन्यायकारक कृषी कायदे शेतकऱ्यांच्या माथी मारले जात असल्याची टीका कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच एका कार्यक्रमात बोलताना केली आहे.

केंद्र शासन दरवर्षी विविध प्रकारच्या शेत मालाला किमान आधारभूत किंमत जाहीर करत असते.केंद्र शासनाच्या आधारभूत किंमतीनुसार मका हमी खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे.महाराष्ट्र शासन व मार्केटींग फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मका हमी भाव खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे.त्यानुसार मका या शेतमालाचा हमी भाव प्रति क्विंटल १ हजार ७६० रुपये हमी भाव आहे.

केंद्र शासन दरवर्षी विविध प्रकारच्या शेत मालाला किमान आधारभूत किंमत जाहीर करत असते.केंद्र शासनाच्या आधारभूत किंमतीनुसार मका हमी खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे.महाराष्ट्र शासन व मार्केटींग फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मका हमी भाव खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे.त्यानुसार मका या शेतमालाचा हमी भाव प्रति क्विंटल १ हजार ७६० रुपये हमी भाव आहे.सन-२०२०-२१ च्या बाजार हंगामासाठी खरीप पिकांच्या किमान हमी भावात केलेली ही वाढ ,केंद्रीय अर्थसंकल्प २०१८-१९ मध्ये घोषणा केल्याप्रमाणे अखिल भारतीय पातळीवरील सरासरी वजनी उत्पादन किंमतीच्या दीडपट हमीभाव देण्याच्या हेतूला अनुसरून आहे.कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शासकीय मका हमीभाव खरेदी केंद्राचे उदघाटन आ.आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,संचालक पद्माकांत कुदळे,हरिभाऊ शिंदे,विठ्ठलराव आसने,नारायण मांजरे,अशोकराव काळे,ज्ञानेश्वर मांजरे,पंचायत समिती उपसभापती अर्जुन काळे,सदस्य मधुकर टेके,कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संभाजी रक्ताटे,माजी उपसभापती राजेंद्र निकोले,माजी सदस्य भरत बोरणारे,सुधाकर गाढवे,माधवराव गोसावी,दादासाहेब टुपके,सुभाषराव गाडे,भाऊसाहेब शेळके,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगुले,राष्ट्रीय युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तुषार पोटे, युवक तालुकाध्यक्ष चारुदत्त सीनगर, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, मेहमूद सय्यद,गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार, रोहिदास होन,विद्यार्थी शहराध्यक्ष स्वप्नील पवार,महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, दिनकर खरे, रमेश गवळी,फकीर कुरेशी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नानासाहेब रनशूर,परशुराम सीनगर,विठ्ठल पवार,बाळासाहेब चांदगुडे,मनोज थोरात,शशिकांत लोखंडे,संजय जगझाप,प्रशांत कोपरे,संतोष मुरडनर आदींसह शेतकरी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की,सर्वसामान्य नागरिकांना व शेतकऱ्यांना सर्व शासकीय,निमशासकीय कार्यालयाकडून येत असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी जनता दरबाराच्या माध्यमातून शासकीय मका हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्याच्या सूचना कृषी उत्पन्न बाजार समितीला दिल्या असल्याचा दावा केला आहे.मका हमीभाव खरेदी केंद्र सुरु झाल्यामुळे शेतकऱ्यांची अडचण दूर होणार असून शासनाच्या निकषानुसार एफ.ए.क्यू.दर्जाची मका १८५० रुपये दराने शासन खरेदी केली जाणार आहे.त्यामुळे मागील पंधरा दिवसापासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहे.केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यानुसार शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची पैसे मिळतील याची हमी नाही.शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास शेतकऱ्यांना न्यायालयात दाद मागता येणार नाही.अशा प्रकारचे चुकीचे कायदे शेतकरी हिताचे नसून केंद्र सरकारला बाजार समित्यांचे अस्तित्व संपवायचे आहे का ? अशी शंका येते.शेतकऱ्यांनी मागितले नसतांना देखील नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांवर लादले जात आहे.त्याविरोधात देशभर शेतकरी आंदोलन करीत आहे.त्यामुळे केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे आंदोलन अजून चिघळू न देता हे कायदे तातडीने मागे घ्यावे असे मत आ.काळे यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close